शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

'...कायदा सुवस्था गृहमंत्री फडणवीस चांगली राहू देत नाहीत'; बदलापूर घटनेवरून जरांगेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 19:08 IST

सरकारचं लक्ष जनतेच्या समस्यांवर आहे की सत्तेच्या जुगाडावर, हेच ठरवायचं आहे: मनोज जरांगे

वडीगोद्री( जालना ) : मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी बदलापूर येथील दुर्दैवी घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, सरकारचं लक्ष गोरगरीब जनतेवर नसून फक्त आणि फक्त सत्तेवर केंद्रित आहे. "त्या छोट्या लेकरांना काही कळत नाही अन् कायदा सुव्यवस्था गृहमंत्री फडणवीस चांगली राहू देत नाहीत," अशी खरमरीत टीका जरांगे पाटील यांनी केली.

पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करून नेत्यांच्या पुरोगामी भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "सरकारचं लक्ष जनतेच्या समस्यांवर आहे की सत्तेच्या जुगाडावर, हेच ठरवायचं आहे," असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच मराठा, दलित आणि मुस्लिम समाजांच्या एकत्र येण्याचा उल्लेख करत जरांगे यांनी इशारा दिला की, सरकारला या समाजांवर होणाऱ्या अन्यायाची किंमत चुकवावी लागेल. "पाच वर्षांत काहीच न करणारे, आता निवडणुकीच्या तोंडावर वचनं देतात," असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. आमचे घोंगडी खाली हात गुंतलेले आहेत, असं त्यांच्यातले लोक आम्हाला सांगताय, कोणाला ही फडणवीस आरोप करायला लावताय. संघर्ष आणि लढाई वेगळा भाग आहे आणि आरक्षण वेगळा भाग आहे. माणसाचे मन जिंकावे लागतात तेव्हा सत्ता येते. आमच्या गोरगरिबांच्या हातात सत्ता आली तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांना कधीच गुंतवणार नाही. तुम्ही राजीनामा देऊ नका, गोरगरिबांचे प्रश्न सोडवा, असे आवाहन जरांगे यांनी केले.

दरम्यान, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे बंधू अशोक मुंढे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, ज्यामध्ये २० मिनिटे चर्चा झाली. अशोक मुंढे हे गेवराई मतदार संघातून इच्छुक असल्याचं बोललं जात आहे, परंतु त्यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस