शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

कृषी संजीवनी प्रकल्प ‘वरदान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:02 IST

शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनाने जागतिक बॅकेच्या साहाय्याने राज्यात २०१८ साली नानाजी देशमुख कृषी प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ ठरत असून, दोन वर्षात २६३६ लाभार्थ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनाने जागतिक बॅकेच्या साहाय्याने राज्यात २०१८ साली नानाजी देशमुख कृषी प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ ठरत असून, दोन वर्षात २६३६ लाभार्थ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे. या शेतकºयांना २० कोटी ७५ लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना दुष्काळास सामोरे जावे लागत असून, याचा भूगर्भातील पाणी साठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गत: क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहे. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अल्पभूधारक शेतकºयांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. हवामान बदलामुळे उध्दभवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास, शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यात जागतिक बँकेच्या साहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे.या प्रकल्पाअंतर्गत शेतक-यांना फळबाग, सामूहिक शेततळे, ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, इलेक्ट्रिक मोटार, पीव्हीसी पाईप, शेडनेट, रेशीम इ. बाबींवर अनुदान देण्यात येते. जालना जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पाचा लाभ अनेक शेतकरी घेत आहेत.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या तिस-या टप्प्यात १०८ गावांची निवड करण्यात आली. या गावात गाव समित्या स्थापन करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.तिसºया टप्प्यात बीबी, बोरगाव, खोलवाडी, पिंपळवाडी, सेवली, जळगाव, घाणेवाडी, गोकुळवाडी, निधोना, सारवाडी, नादापूर, देवनगर, कृष्णानगर, कोटी, देवळाई अंबड, राजेगाव, वालसावंगी, फत्तेपूर, पद्मावती, तपोवन, जयपूर, वझर सरकटे, तळेगाव, उस्वद, पांगरी इ. गावांची निवड करण्यात आली.या प्रकल्पासाठी प्रकल्प कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेषज्ञ नित्यानंद काळे, विशाल डेंगळे हे कामे करीत आहेत.उर्वरित अर्जावर पूर्वसंमतीदेण्याची प्रक्रिया सुरूनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी ३६३ गावांमधील १ लाख ६० शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील २१ हजार ६९९ अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली असून, २६३६ लाभार्थ्यांना प्रत्यक्षात अनुदान मिळाले आहे. उर्वरित अर्जांवर गाव समित्या व कृषी विभाग काम करत असून, या अर्जांनाही तातडीने पूर्वसंमती देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.शेतकरी गट व महिला बचत गटाला कृषी निगडीत व्यवसायासाठी दिले जाते ६० टक्के अनुदानसामूहिक शेततळ््यासाठी १०० टक्के अनुदानफळबागेसाठी १०० टक्के अनुदानविद्युत मोटार, पीव्हीसी पाईप ७० टक्के अनुदान, ठिबक व तुषारसाठी ८० टक्के अनुदान मिळते.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरीWorld Bankवर्ल्ड बँक