शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी प्रकल्प ‘वरदान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:02 IST

शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनाने जागतिक बॅकेच्या साहाय्याने राज्यात २०१८ साली नानाजी देशमुख कृषी प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ ठरत असून, दोन वर्षात २६३६ लाभार्थ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनाने जागतिक बॅकेच्या साहाय्याने राज्यात २०१८ साली नानाजी देशमुख कृषी प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ ठरत असून, दोन वर्षात २६३६ लाभार्थ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे. या शेतकºयांना २० कोटी ७५ लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना दुष्काळास सामोरे जावे लागत असून, याचा भूगर्भातील पाणी साठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गत: क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहे. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अल्पभूधारक शेतकºयांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. हवामान बदलामुळे उध्दभवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास, शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यात जागतिक बँकेच्या साहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे.या प्रकल्पाअंतर्गत शेतक-यांना फळबाग, सामूहिक शेततळे, ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, इलेक्ट्रिक मोटार, पीव्हीसी पाईप, शेडनेट, रेशीम इ. बाबींवर अनुदान देण्यात येते. जालना जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पाचा लाभ अनेक शेतकरी घेत आहेत.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या तिस-या टप्प्यात १०८ गावांची निवड करण्यात आली. या गावात गाव समित्या स्थापन करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.तिसºया टप्प्यात बीबी, बोरगाव, खोलवाडी, पिंपळवाडी, सेवली, जळगाव, घाणेवाडी, गोकुळवाडी, निधोना, सारवाडी, नादापूर, देवनगर, कृष्णानगर, कोटी, देवळाई अंबड, राजेगाव, वालसावंगी, फत्तेपूर, पद्मावती, तपोवन, जयपूर, वझर सरकटे, तळेगाव, उस्वद, पांगरी इ. गावांची निवड करण्यात आली.या प्रकल्पासाठी प्रकल्प कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेषज्ञ नित्यानंद काळे, विशाल डेंगळे हे कामे करीत आहेत.उर्वरित अर्जावर पूर्वसंमतीदेण्याची प्रक्रिया सुरूनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी ३६३ गावांमधील १ लाख ६० शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील २१ हजार ६९९ अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली असून, २६३६ लाभार्थ्यांना प्रत्यक्षात अनुदान मिळाले आहे. उर्वरित अर्जांवर गाव समित्या व कृषी विभाग काम करत असून, या अर्जांनाही तातडीने पूर्वसंमती देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.शेतकरी गट व महिला बचत गटाला कृषी निगडीत व्यवसायासाठी दिले जाते ६० टक्के अनुदानसामूहिक शेततळ््यासाठी १०० टक्के अनुदानफळबागेसाठी १०० टक्के अनुदानविद्युत मोटार, पीव्हीसी पाईप ७० टक्के अनुदान, ठिबक व तुषारसाठी ८० टक्के अनुदान मिळते.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरीWorld Bankवर्ल्ड बँक