शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

कृषी संजीवनी प्रकल्प ‘वरदान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:02 IST

शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनाने जागतिक बॅकेच्या साहाय्याने राज्यात २०१८ साली नानाजी देशमुख कृषी प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ ठरत असून, दोन वर्षात २६३६ लाभार्थ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनाने जागतिक बॅकेच्या साहाय्याने राज्यात २०१८ साली नानाजी देशमुख कृषी प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ ठरत असून, दोन वर्षात २६३६ लाभार्थ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे. या शेतकºयांना २० कोटी ७५ लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना दुष्काळास सामोरे जावे लागत असून, याचा भूगर्भातील पाणी साठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गत: क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहे. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अल्पभूधारक शेतकºयांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. हवामान बदलामुळे उध्दभवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास, शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यात जागतिक बँकेच्या साहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे.या प्रकल्पाअंतर्गत शेतक-यांना फळबाग, सामूहिक शेततळे, ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, इलेक्ट्रिक मोटार, पीव्हीसी पाईप, शेडनेट, रेशीम इ. बाबींवर अनुदान देण्यात येते. जालना जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पाचा लाभ अनेक शेतकरी घेत आहेत.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या तिस-या टप्प्यात १०८ गावांची निवड करण्यात आली. या गावात गाव समित्या स्थापन करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.तिसºया टप्प्यात बीबी, बोरगाव, खोलवाडी, पिंपळवाडी, सेवली, जळगाव, घाणेवाडी, गोकुळवाडी, निधोना, सारवाडी, नादापूर, देवनगर, कृष्णानगर, कोटी, देवळाई अंबड, राजेगाव, वालसावंगी, फत्तेपूर, पद्मावती, तपोवन, जयपूर, वझर सरकटे, तळेगाव, उस्वद, पांगरी इ. गावांची निवड करण्यात आली.या प्रकल्पासाठी प्रकल्प कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेषज्ञ नित्यानंद काळे, विशाल डेंगळे हे कामे करीत आहेत.उर्वरित अर्जावर पूर्वसंमतीदेण्याची प्रक्रिया सुरूनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी ३६३ गावांमधील १ लाख ६० शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील २१ हजार ६९९ अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली असून, २६३६ लाभार्थ्यांना प्रत्यक्षात अनुदान मिळाले आहे. उर्वरित अर्जांवर गाव समित्या व कृषी विभाग काम करत असून, या अर्जांनाही तातडीने पूर्वसंमती देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.शेतकरी गट व महिला बचत गटाला कृषी निगडीत व्यवसायासाठी दिले जाते ६० टक्के अनुदानसामूहिक शेततळ््यासाठी १०० टक्के अनुदानफळबागेसाठी १०० टक्के अनुदानविद्युत मोटार, पीव्हीसी पाईप ७० टक्के अनुदान, ठिबक व तुषारसाठी ८० टक्के अनुदान मिळते.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरीWorld Bankवर्ल्ड बँक