शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी कोकणाचे पाणी आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:26 IST

मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्यासाठी कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भोकरदन येथे महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित सभेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्यासाठी कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भोकरदन येथे महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित सभेत दिली. येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना विरोधी पक्षनेत्यासाठी लागणा-या जागा सुध्दा मिळणार नाहीत, असा दावाही फडणवीस यांनी यावेळी केला.भाजपाची महाजनादेश यात्रा सिल्लोड येथून बुधवारी दुपारी ४़४० वाजता भोकरदन शहरात दाखल झाली. मुख्यमंत्री विराजमान असलेल्या रथाची शहरातून ढोलताशाच्या गजरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी खा़ किरीट सोमय्या, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, निर्मला दानवे, विलासराव अडगावकर, कौतिकराव जगताप, आशा पांडे, रेणुताई दानवे, राजेंद्र देशमुख, गोविंदराव पंडित, साहेबराव कानडजे, शालिकराम म्हस्के, मुकेश पांडे, गणेश फुके, दीपक पाटील, विजयसिंह परिहार, संतोष लोखंडे यांची उपस्थिती होती़ यावेळी आमदार संतोष दानवे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले़मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ वर्षाच्या सत्तेच्या काळात २० हजार कोटींची मदत मिळाली. आम्ही ५ वर्षाच्या काळात ५० हजार कोटी रूपयांची मदत केली आहे. शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे मराठवाडा गेल्या तीन-चार वर्षापासून दुष्काळाशी सामना करीत आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी आम्ही कोकणातील १६७ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार आहोत. पिण्याच्या पाण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रेड योजनेच्या माध्यमातून ६४ हजार किलो मीटर पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी ४ हजार कोटींच्या कामाची निविदासुध्दा निघाली आहे.केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून भोकरदन -जाफराबाद मतदार संघाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. गेल्या ३५ वर्षापासून तुम्ही मला साथ दिली आहे. येणाºया काळात सुध्दा तुम्ही भाजपाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहावे, असेही ते म्हणाले. जाफराबाद शहरासाठी सिल्लोड भोकरदन संयुक्त पाणी पुरवठा योजनेतून पाणी देण्यात यावे, शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभारावा, महिला बचत गटांना बचत भवनाचे बांधकाम करून द्यावे व औद्योगिक वसाहती मध्ये उद्योगांना चालना द्यावी अशी मागणी केली. यावेळी आमदार नारायण कुचे, आशा पांडे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी डॉ. चंद्रकांत साबळे, सुभाष देशमुख, मुकेश चिने, पंढरीनाथ खरात, राजेश चव्हाण, दत्तू पंडित, आशा माळी, सुनीता सपकाळ, शोभा मतकर, निर्मला बलरावत, दीपक जाधव, सतीश रोकडे, रमेश पांडे, सेनेचे नवनाथ दौड, सुरेश तळेकर, भूषण शर्मा आदींची उपस्थिती होती. संचालन गजानन तांदुळजे यांनी केले. उध्दव दुनगहु यांनी आभार मानले़बाप से बेटा सवाईसंतोष दानवे हा सर्वात तरूण आमदार असून, या भागातील विकास काम घेऊनच तो माझ्याकडे येतो व काम झाल्यावर उठतो. त्यामुळे त्यांनी पाच वर्षाच्या काळात आणलेल्या सर्वच विकासाच्या कामांना आपण मंजुरी दिली आहे. एक प्रकारे तो बाप से बेटा सवाईच निघाला आहे.त्याचे वडील केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणार आहे. त्यामुळे संतोष दानवे यांना येणाºया निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. जाफराबादचा पाणीप्रश्न निकाली काढणार असून, बचत गटांना सुध्दा बचत भवन बांधून देण्याचा कायदा करू, असे त्यांनी सांगितले़

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राChief Ministerमुख्यमंत्रीRaosaheb Danweरावसाहेब दानवेBJPभाजपा