शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खोतकर म्हणजे जालन्याचे लालूप्रसाद - दानवेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 11:52 IST

शिसवेसेना मंत्री अर्जुन खोतकर म्हणजे जालन्याचे लालू प्रसाद आहेत, अशी टीका करत रावसाहेब दानवें यांनी पलटवार केला आहे.

मुंबई :  शिसवेसेना मंत्री अर्जुन खोतकर म्हणजे जालन्याचे लालू प्रसाद आहेत, अशी टीका करत रावसाहेब दानवें यांनी पलटवार केला आहे. जालन्यातील विकासकामावरुन दानवे-खोतकर यांच्यामध्ये मागिल काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी एका प्रसारमाध्यमांशी बोलताना खोतकर यांनी दानवे यांना सत्तेचा माज, मस्ती आणि गुर्मी आहे. माझ्या धाकामुळे त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर आहे, असा घणाघात केला होता. दानवे यांनी यावर खोतकर यांचा खरपूस  समाचार घेत प्रत्युत्तर दिले आहे. 

शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर आहेत. काँग्रेसमधील काही लोकांसोबत त्यांच्या बैठका सुरु आहेत. लवकरच खोतकर काँग्रेसमध्ये प्रवेश करतील हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असा गौप्यस्फोट यावेळी दानवे यांनी केला आहे. खोतकरांच्या या हालचालीबाबत 'मातोश्री'वरही माहिती आहे. माझ्यावर शिवसेना संपवण्याचे आरोप करणारे खोतकर स्वतःच शिवसेना संपवायला निघाले आहेत. असेही यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आत्मविश्वासाने सांगितले.  पुढे  अर्जुन खोतकरांचं 'मातोश्री'वर इतकंही वजन नाही, की ते मला बंदी घालू शकतील. उलट त्यांनाच मातोश्रीवर भेटीसाठी तीन-चार तास वाट बघावी लागते, असा दावाही दानवेंनी केला.

काय म्हणाले होते खोतकर - 

  • भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सत्तेचा माज, मस्ती आणि गुर्मी आहे. माझ्या धाकामुळे त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर आहे. 
  • दानवे आणि त्यांच्या कुटुंबाकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. 
  • रावसाहेब दानवेंचा जालन्यातील सरकारी आधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव असून सर्वच आधिकाऱी त्यांच्या दहशतीखाली आहेत. 
  • दानवे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना तासनतास आपल्या कक्षाबाहेर उभं करतात, त्यांना घर गड्यासारखं वागवत.   
  • भाजपाध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी दरम्यान रावसाहेब दानवे यांना डावलण्यात खुद भाजपाच्या नेत्यांचाच हात होता.
  •  दानवे शिवसेना संपवायला निघाले. 
टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकरBJPभाजपाShiv Senaशिवसेना