शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला; ८६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 19:54 IST

जालना तालुक्यातील एक लाख शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा 

ठळक मुद्दे तालुक्यात ९१ हजार ४२३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली.

जालना : मागील दोन महिन्यांपासून तालुक्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. १ लाख ६०० हजार ३२० शेतकऱ्यांची ८६ हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. 

सततच्या दुष्काळानंतर यंदा जूनच्या सुरूवातीलाच जोरदार पाऊस झाला. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी व लागवड उरकली. तालुक्यात ९१ हजार ४२३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. सतत पाऊस पडत राहिल्याने पिकेही जोमात आली. ऐन मूग व उडिद काढणीला आला अन् तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सतत दहा ते अकरा दिवस पाऊस झाल्याने मूग व उडिदाच्या शेंगांना कोंब फुटले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता.

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी महसूल व कृषी विभागास पंचनामे करण्याचे आदेश दिले.  त्यानंतर महसूल व कृषी विभागाच्या वतीने प्रत्यक्ष पंचनाम्यास सुरूवात करण्यात आली. मूग व उडिदाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन व कपाशी या पिकांवर मदार होती. परंतु, गत महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व कपाशीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जून व सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाने तालुक्यातील ८६ हजार ७१३ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. यात सोयाबीन २४३८५, कापूस ३१९९३, मका १५२०, ज्वारी २० हेक्टर, बाजरी १२९५, तूर ४९५७, मूग १६६८८, उडीद १०५२ तर १०५२ वरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

५८ कोटी रूपयांची मागणीवरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले. प्रतिहेक्टरी ठरवून दिलेल्या निकषानुसार मदतीच्या मागणीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसानीपोटी ५८ कोटी ९६ लाख ५० हजार ९८४ रूपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल, असे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी सांगितले. 

टॅग्स :RainपाऊसJalanaजालनाFarmerशेतकरी