शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला; ८६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 19:54 IST

जालना तालुक्यातील एक लाख शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा 

ठळक मुद्दे तालुक्यात ९१ हजार ४२३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली.

जालना : मागील दोन महिन्यांपासून तालुक्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. १ लाख ६०० हजार ३२० शेतकऱ्यांची ८६ हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. 

सततच्या दुष्काळानंतर यंदा जूनच्या सुरूवातीलाच जोरदार पाऊस झाला. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी व लागवड उरकली. तालुक्यात ९१ हजार ४२३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. सतत पाऊस पडत राहिल्याने पिकेही जोमात आली. ऐन मूग व उडिद काढणीला आला अन् तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सतत दहा ते अकरा दिवस पाऊस झाल्याने मूग व उडिदाच्या शेंगांना कोंब फुटले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता.

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी महसूल व कृषी विभागास पंचनामे करण्याचे आदेश दिले.  त्यानंतर महसूल व कृषी विभागाच्या वतीने प्रत्यक्ष पंचनाम्यास सुरूवात करण्यात आली. मूग व उडिदाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन व कपाशी या पिकांवर मदार होती. परंतु, गत महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व कपाशीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जून व सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाने तालुक्यातील ८६ हजार ७१३ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. यात सोयाबीन २४३८५, कापूस ३१९९३, मका १५२०, ज्वारी २० हेक्टर, बाजरी १२९५, तूर ४९५७, मूग १६६८८, उडीद १०५२ तर १०५२ वरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

५८ कोटी रूपयांची मागणीवरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले. प्रतिहेक्टरी ठरवून दिलेल्या निकषानुसार मदतीच्या मागणीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसानीपोटी ५८ कोटी ९६ लाख ५० हजार ९८४ रूपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल, असे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी सांगितले. 

टॅग्स :RainपाऊसJalanaजालनाFarmerशेतकरी