शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला; ८६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 19:54 IST

जालना तालुक्यातील एक लाख शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा 

ठळक मुद्दे तालुक्यात ९१ हजार ४२३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली.

जालना : मागील दोन महिन्यांपासून तालुक्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. १ लाख ६०० हजार ३२० शेतकऱ्यांची ८६ हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. 

सततच्या दुष्काळानंतर यंदा जूनच्या सुरूवातीलाच जोरदार पाऊस झाला. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी व लागवड उरकली. तालुक्यात ९१ हजार ४२३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. सतत पाऊस पडत राहिल्याने पिकेही जोमात आली. ऐन मूग व उडिद काढणीला आला अन् तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सतत दहा ते अकरा दिवस पाऊस झाल्याने मूग व उडिदाच्या शेंगांना कोंब फुटले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता.

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी महसूल व कृषी विभागास पंचनामे करण्याचे आदेश दिले.  त्यानंतर महसूल व कृषी विभागाच्या वतीने प्रत्यक्ष पंचनाम्यास सुरूवात करण्यात आली. मूग व उडिदाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन व कपाशी या पिकांवर मदार होती. परंतु, गत महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व कपाशीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जून व सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाने तालुक्यातील ८६ हजार ७१३ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. यात सोयाबीन २४३८५, कापूस ३१९९३, मका १५२०, ज्वारी २० हेक्टर, बाजरी १२९५, तूर ४९५७, मूग १६६८८, उडीद १०५२ तर १०५२ वरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

५८ कोटी रूपयांची मागणीवरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले. प्रतिहेक्टरी ठरवून दिलेल्या निकषानुसार मदतीच्या मागणीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसानीपोटी ५८ कोटी ९६ लाख ५० हजार ९८४ रूपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल, असे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी सांगितले. 

टॅग्स :RainपाऊसJalanaजालनाFarmerशेतकरी