शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

खांडवीच्या मजुरांचा पाच तास घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:31 IST

मंगळवारी मजुरांनी तालुक्यातील खांडवी येथील ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून पाच तास ग्रामपंचायत कार्यालयास घेराव घातला

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध करुन देण्यासाठी मंगळवारी मजुरांनी तालुक्यातील खांडवी येथील ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून पाच तास ग्रामपंचायत कार्यालयास घेराव घातला. सरकार दौऱ्यावर जनता वा-यावर या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.मागील सहा महिन्यापासून मनरेगा कामाची मागणी करणा-या मजुरांना कायद्यानुसार मनरेगा चे काम मिळाले नाही, प्रचंड दुष्काळ असतांना मजूरांच्या हाताला कुठेही काम नाही. केंद्रीय कायदा असूनही मनरेगाची कामे मिळत नाहीत. नेमकी दुष्काळात ग्रामसेवक व पंचायत समिती तसेच जिल्हा प्रशासनाने नियोजन न केल्यामुळे आज मजुरांच्या हाताला काम नाही.दुष्काळात किमान १५० दिवस काम देणे हे बंधनकारक आहे परंतु जालना जिल्ह्यात प्रशासनाने खांडवी सहीत एकाही गावात कामाचा साधा सेल्फ निर्माण केलेला नाही. यामुळे कामासाठी मजूरांना भटकंती करावी लागत आहे. तर अनेकजण कामाच्या शोधार्थ शहराकडे जात असल्याने गावच्या - गावे ओसाड पडत आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या जेसीबी मशिनला काम मिळते परंतु दुष्काळात होरपळणा-या मजुर व शेतकऱ्यांना रोजगारहमी चे काम मिळत नाही. सेल्फ मंजुर नसेल तर शेजारील गावात कामे द्यावे असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.मग ४० लाखाची कामे वरफळ मध्ये जेसीबी ने केली परंतु खांडवीतील ५०० मजुरांना काम दिले नाही. गुत्तेदाराच्या जेसीबी ला देऊन सरकार मजुरांना दुष्काळात उपाशी मारत आहे.यावेळी आबा बरकुले, प्रविण शेख, महादेव बरकुल,े शेसाबाई साबळे , उषा भारसाकळे ,चंद्रकला भारसाकळे, सविता भारसाकळे, रुख्मीन भारसाकळे, शारदा साबळे ,आशामती साळवे ,कौसाबाई बाभळकर आदींची उपस्थिती होती.परतूर : आंदोलन करुनही प्रशासनाचे दुर्लक्षखांडवी ते परतूर मजुरांनी पायी चालत मोर्चा काढण्यात आला. तसेच परतूर जालना येथे सतत आंदोलन केले. तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयासमोर अनेक वेळा आंदोलने केली. परंतु दुष्काळ असूनही प्रशासनाकडून मजुरांना कामे उलब्ध करुन देण्यात येत नाही.एकीकडे पालकमंत्री बबनराव लोणीकर सांगतात प्रशासनाला मनेरगाची कामे उपलब्ध करुन देण्याची आदेश दिले आहेत, मात्र याकडे कानाडोळा करण्यात येत ंआहे. संतप्त आंदोलन कर्त्यांची विस्तार अधिकारी युवराज परदेशी व ग्रामसेवक चौधरी यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यास आले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाMorchaमोर्चाdroughtदुष्काळ