शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

खांडवीच्या मजुरांचा पाच तास घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:31 IST

मंगळवारी मजुरांनी तालुक्यातील खांडवी येथील ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून पाच तास ग्रामपंचायत कार्यालयास घेराव घातला

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध करुन देण्यासाठी मंगळवारी मजुरांनी तालुक्यातील खांडवी येथील ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून पाच तास ग्रामपंचायत कार्यालयास घेराव घातला. सरकार दौऱ्यावर जनता वा-यावर या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.मागील सहा महिन्यापासून मनरेगा कामाची मागणी करणा-या मजुरांना कायद्यानुसार मनरेगा चे काम मिळाले नाही, प्रचंड दुष्काळ असतांना मजूरांच्या हाताला कुठेही काम नाही. केंद्रीय कायदा असूनही मनरेगाची कामे मिळत नाहीत. नेमकी दुष्काळात ग्रामसेवक व पंचायत समिती तसेच जिल्हा प्रशासनाने नियोजन न केल्यामुळे आज मजुरांच्या हाताला काम नाही.दुष्काळात किमान १५० दिवस काम देणे हे बंधनकारक आहे परंतु जालना जिल्ह्यात प्रशासनाने खांडवी सहीत एकाही गावात कामाचा साधा सेल्फ निर्माण केलेला नाही. यामुळे कामासाठी मजूरांना भटकंती करावी लागत आहे. तर अनेकजण कामाच्या शोधार्थ शहराकडे जात असल्याने गावच्या - गावे ओसाड पडत आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या जेसीबी मशिनला काम मिळते परंतु दुष्काळात होरपळणा-या मजुर व शेतकऱ्यांना रोजगारहमी चे काम मिळत नाही. सेल्फ मंजुर नसेल तर शेजारील गावात कामे द्यावे असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.मग ४० लाखाची कामे वरफळ मध्ये जेसीबी ने केली परंतु खांडवीतील ५०० मजुरांना काम दिले नाही. गुत्तेदाराच्या जेसीबी ला देऊन सरकार मजुरांना दुष्काळात उपाशी मारत आहे.यावेळी आबा बरकुले, प्रविण शेख, महादेव बरकुल,े शेसाबाई साबळे , उषा भारसाकळे ,चंद्रकला भारसाकळे, सविता भारसाकळे, रुख्मीन भारसाकळे, शारदा साबळे ,आशामती साळवे ,कौसाबाई बाभळकर आदींची उपस्थिती होती.परतूर : आंदोलन करुनही प्रशासनाचे दुर्लक्षखांडवी ते परतूर मजुरांनी पायी चालत मोर्चा काढण्यात आला. तसेच परतूर जालना येथे सतत आंदोलन केले. तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयासमोर अनेक वेळा आंदोलने केली. परंतु दुष्काळ असूनही प्रशासनाकडून मजुरांना कामे उलब्ध करुन देण्यात येत नाही.एकीकडे पालकमंत्री बबनराव लोणीकर सांगतात प्रशासनाला मनेरगाची कामे उपलब्ध करुन देण्याची आदेश दिले आहेत, मात्र याकडे कानाडोळा करण्यात येत ंआहे. संतप्त आंदोलन कर्त्यांची विस्तार अधिकारी युवराज परदेशी व ग्रामसेवक चौधरी यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यास आले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाMorchaमोर्चाdroughtदुष्काळ