शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सोने तारण ठेवून मजूर शहराकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:50 IST

यंदा दुष्काळ असल्याने ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधात अनेक कुटूंब हे स्थलांतर करून मोठ्या शहरात जात आहेत.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा दुष्काळ असल्याने ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधात अनेक कुटूंब हे स्थलांतर करून मोठ्या शहरात जात आहेत. जवळ जे काही सोने-नाणे आहे, ते सोबत घेऊन जाण्यापेक्षा ते बँकेत तारण ठेवून त्यावर गोल्डलोन काढून रोख पैसे घेण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष करून राष्ट्रीयीकृत बँक आणि खासगी वित्तीय संस्थांकडे सोने तारण ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे.सोने हा मौल्यवान धातू असल्याने त्याला मोठी मागणी आणि तेवढीच त्याची किंमत जास्त आहे. आपल्याकड सोन्याला रोखीपेक्षाही मोठे महत्व असते. तो वाहून नेण्यास सोपा असण्यासह त्याची किंमत क्वचितच कमी होते. त्यामुळे सोन्याला अनन्य महत्व भारतींयामध्ये आहे. गरीबातील गरीबही सोने खरेदीसाठी जिवाचे रान करून बचत करतो, आणि त्यातून थोडे का होईना सोने हे खरेदी करतो.महिलांमध्ये तर या धातूची आवड त्याचे महत्व हे त्या जाणून असतात. अर्ध्यारात्री कामा येणारे सोने म्हणूनच त्याला संबोधले जाते.जालना जिल्ह्यात दुष्काळी वातावरण असल्याने आज ग्रामीण भागात हाताला काम नसल्याने अनेक कुंटुंब हे उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे, तसेच अन्य मोठ्या शहरात स्थलांतर करत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे असलेले थोडेबहूत सोने हे बँकांमध्ये तारण ठेवून गोल्डलोन घेण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात आले. जालन्यातील काही राष्ट्रीयकृत बँकांकडे सोने ठेवण्यासाठी लॉकर कमी पडत असल्याचे एका राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापकाने नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर सांगितले. सोने तारण योजनेचे अनेक फायदे असून, त्यावर काढलेले कर्ज हे परतफेड करताना त्याचा कालावधी जास्त असून, व्याजदरही कमी आहेत.पूर्वी खासगी सावकाराकडे शेतजमिन गहाण ठेवण्याचे प्रमाण होते, परंतु आता खासगी सावकाराचे व्याजाचे दर हे न परडवणारे नसून, त्यांची पठाणी वसुली ही देखील गंभीर बाब असल्याने लोकांचा कल हा बँकांकडे वाढल्याचेही सांगण्यात आले.स्थलांतराची माहिती देत नाहीतआज दुष्काळामुळे अनेकजण गावातून शहराकडे जात आहेत. मात्र हे कुटुंब बाहेरगावी जाताना त्यांनी त्याची माहिती ही संबंधित ग्रामपंचायतला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र याची तसदी कोणी घेत नसून, आम्ही रोजगाराच्या शोधात जात आहोत, हे कारण सांगणेदेखील सामाजिकदृष्ट्या चांगली बाब नसल्याने अनेक जण पूर्वकल्पना न देताच गाव सोडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. एकूणच शहरात गेल्यावर तेथे निवासाचा मोठा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होतो.

टॅग्स :Migrationस्थलांतरणdroughtदुष्काळ