शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सोने तारण ठेवून मजूर शहराकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:50 IST

यंदा दुष्काळ असल्याने ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधात अनेक कुटूंब हे स्थलांतर करून मोठ्या शहरात जात आहेत.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा दुष्काळ असल्याने ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधात अनेक कुटूंब हे स्थलांतर करून मोठ्या शहरात जात आहेत. जवळ जे काही सोने-नाणे आहे, ते सोबत घेऊन जाण्यापेक्षा ते बँकेत तारण ठेवून त्यावर गोल्डलोन काढून रोख पैसे घेण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष करून राष्ट्रीयीकृत बँक आणि खासगी वित्तीय संस्थांकडे सोने तारण ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे.सोने हा मौल्यवान धातू असल्याने त्याला मोठी मागणी आणि तेवढीच त्याची किंमत जास्त आहे. आपल्याकड सोन्याला रोखीपेक्षाही मोठे महत्व असते. तो वाहून नेण्यास सोपा असण्यासह त्याची किंमत क्वचितच कमी होते. त्यामुळे सोन्याला अनन्य महत्व भारतींयामध्ये आहे. गरीबातील गरीबही सोने खरेदीसाठी जिवाचे रान करून बचत करतो, आणि त्यातून थोडे का होईना सोने हे खरेदी करतो.महिलांमध्ये तर या धातूची आवड त्याचे महत्व हे त्या जाणून असतात. अर्ध्यारात्री कामा येणारे सोने म्हणूनच त्याला संबोधले जाते.जालना जिल्ह्यात दुष्काळी वातावरण असल्याने आज ग्रामीण भागात हाताला काम नसल्याने अनेक कुंटुंब हे उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे, तसेच अन्य मोठ्या शहरात स्थलांतर करत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे असलेले थोडेबहूत सोने हे बँकांमध्ये तारण ठेवून गोल्डलोन घेण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात आले. जालन्यातील काही राष्ट्रीयकृत बँकांकडे सोने ठेवण्यासाठी लॉकर कमी पडत असल्याचे एका राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापकाने नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर सांगितले. सोने तारण योजनेचे अनेक फायदे असून, त्यावर काढलेले कर्ज हे परतफेड करताना त्याचा कालावधी जास्त असून, व्याजदरही कमी आहेत.पूर्वी खासगी सावकाराकडे शेतजमिन गहाण ठेवण्याचे प्रमाण होते, परंतु आता खासगी सावकाराचे व्याजाचे दर हे न परडवणारे नसून, त्यांची पठाणी वसुली ही देखील गंभीर बाब असल्याने लोकांचा कल हा बँकांकडे वाढल्याचेही सांगण्यात आले.स्थलांतराची माहिती देत नाहीतआज दुष्काळामुळे अनेकजण गावातून शहराकडे जात आहेत. मात्र हे कुटुंब बाहेरगावी जाताना त्यांनी त्याची माहिती ही संबंधित ग्रामपंचायतला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र याची तसदी कोणी घेत नसून, आम्ही रोजगाराच्या शोधात जात आहोत, हे कारण सांगणेदेखील सामाजिकदृष्ट्या चांगली बाब नसल्याने अनेक जण पूर्वकल्पना न देताच गाव सोडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. एकूणच शहरात गेल्यावर तेथे निवासाचा मोठा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होतो.

टॅग्स :Migrationस्थलांतरणdroughtदुष्काळ