शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

जोगलादेवी बंधाऱ्यातून पाणी झेपावले मंगरूळच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 01:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तीर्थपुरी : जायकवाडीच्या नाथसागर प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी रविवारी सकाळी घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी बंधा-यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : जायकवाडीच्या नाथसागर प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी रविवारी सकाळी घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी बंधा-यात पोहोचले. तेथून दीड हजार क्युसेसने हे पाणी मंगरुळ बंधा-याच्या दिशेने जात आहे.पैठण येथील नाथसागर प्रकल्पाची पाणी पातळी ९२ टक्के झाल्यानंतर स्वातंत्र्य दिनी १५ आॅगस्टपासून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोदावरीच्या पात्रातून हे पाणी घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथे असलेल्या बंधा-यात रविवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास आले. या बंधा-याचे दोन गेट उघडण्यात आले असून, यातून रविवारी दुपारी दीड हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले. हे पाणी मंगरूळ येथील मोठ्या बंधा-याच्या दिशेने जात आहे. सायंकाळपर्यंत तेथील बंधा-यातून हे पाणी खालील बंधा-याच्या दिशेने जाणार आहे. प्रारंभी लोणी सावंगी त्यानंतर शिवणगाव मंगरूळ व नंतर जोगलादेवी असे बंधारे पाण्याने भरले जाणार आहेत. पाण्याचा विसर्ग थोड्या थोड्या प्रमाणात वाढविण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता प्रशांत देशपांडे यांनी दिली.

टॅग्स :WaterपाणीDamधरणwater shortageपाणीकपात