शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात तीन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना ट्रकने उडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:43 IST

महाविद्यालयातील विद्यार्थिंनी दुचाकीवरून जात असताना त्यांना औद्योगिक वसहातीच्या तिसऱ्या टप्प्याजवळील एका वळणावर ट्रकने जोरदार धडक दिली. यात या तिघी जणी जखमी झाल्या

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयातील विद्यार्थिंनी दुचाकीवरून जात असताना त्यांना औद्योगिक वसहातीच्या तिसऱ्या टप्प्याजवळील एका वळणावर ट्रकने जोरदार धडक दिली. यात या तिघी जणी जखमी झाल्या आहेत. त्यातील निकिता किशोर शिंदे या विद्यार्थिंनीच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिला औरंगाबादेतील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.बारवाले महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान औरंगाबाद मार्गावर गेल्या होत्या. त्या नेमक्या कुठल्या कारणासाठी गेल्या होत्या, याचे स्पष्टीकरण कळू शकले नाही. एकाच दुचाकीवर एमएच २१, एक्स, ६४१६ यावर तिघीजणी होत्या. सनराईज ढाब्याजवळील वळण रस्त्यावर औद्योगिक वसाहतीकडून येणाºया भरधाव ट्रकने त्यांना जोराची धडक दिली.ही धडक लागल्याने मुलींच्या किंकाळ्या ऐकून सनराईज ढाब्याचे मालक मोहन इंगळे, रोषण इंगळे तसेच तेथील कर्मचारी अक्षय चिपकले, आनंद मगरे, विलास अंभोरे, रामेश्वर गव्हाड, दीपक खोमणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी लगेचच त्यांच्या कारमधून या तिन्ही जखमी मुलींना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. जखमी झालेल्यांमध्ये प्रिया भाग्यवंत, निकिता किशोर शिंदे, शर्मिन घंची यांचा समावेश आहे. या सर्वजणी बारवाले महाविद्यालयातील बीएसी तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. यातील निकिता शिंदेच्या डोक्याला जबर मार लागल्याने ती बेशुध्द पडली होती.तिला अधिक उपचारासाठी औरंगाबादेतील एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले असून, तिच्यावर रात्री उशिरापर्यंत शस्त्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.दरम्यान, निकिता शिंदे वगळता अन्य दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाºयांनी दिली. या अपघाताची नोंद चंदनझिरा पोलीसांनी घेतली असून, या प्रकरणी ट्रक चालक गजानन जिजाभाऊ शिंदे याला ताब्यात घेतले आहे. या अपघामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर प्राचार्य तसेच तसेच अन्य प्राध्यापकांनी रूग्णालयात जाऊन जमखींची चौकशी करून भेट घेतल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघातbikeबाईक