शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
2
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
3
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
4
कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य
5
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
6
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
7
मायेचं नातं! १२ वर्षांनंतर मुलीने पहिल्यांदाच ऐकला आईचा आवाज; डोळे पाणावणारा Video
8
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
9
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
10
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
11
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
12
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
13
काय सांगता? फक्त स्वत:ला पाहण्यासाठी नाही तर 'या' कारणांसाठी लिफ्टमध्ये असतो आरसा
14
सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
15
अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
16
"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त
17
श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीला हाताने भरवली 'जापानी डिश', व्हिडीओ व्हायरल
18
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
19
Gold Silver Price Today: चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
20
'मुंबई इंडियन्स'ने संघात घेताच कर्णधार शार्दुल ठाकूरचा धमाका; ७ चेंडूत घेतले ४ बळी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या बळकटीसाठी जालन्याला मंत्रीपद गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 01:02 IST

अनेक प्रलोभने येऊनही गोरंट्याल यांनी काँग्रेसची साथ न सोडता स्वत:च्या हिंमतीवर काँग्रेस जालन्यात जिवंत ठेवली. एवढे करूनही जर मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिले जात नसेल तिसऱ्यांदा आमदार होऊन उपयोग तो काय, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष अस्तित्वात ठेवण्यासाठी आ. कैलास गोरंट्याल यांनी केलेले प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहेत. अनेक प्रलोभने येऊनही गोरंट्याल यांनी काँग्रेसची साथ न सोडता स्वत:च्या हिंमतीवर काँग्रेस जालन्यात जिवंत ठेवली. एवढे करूनही जर मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिले जात नसेल तिसऱ्यांदा आमदार होऊन उपयोग तो काय, असा संतप्त सवालही जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.जालना शहरातील महेश भवन येथे शनिवारी दुपारी काँग्रेस पदाधिका-यांची बैठक झाली. या बैठकीत माजी आ. सुरेशकुमार जेथलिया म्हणाले, कुठलीही निवडणूक असो, कैलास गोरंट्याल हे नेहमीच काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी पुढे येतात. जालना शहर तसेच परतूरमध्येही त्यांनी काँग्रेसला मदत केली आहे. एक युवा नेता काँग्रेससाठी सर्वस्व अर्पण करून निवडून येतो. तर अशा नेत्याला मंत्रिमंडळात स्थान दिलेच पाहिजे, असे मतही सुरेशकुमार जेथलिया यांनी व्यक्त केले. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनीही कैलास गोरंट्याल यांच्याविषयी भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, कैलास गोरंट्याल हे आपले पती आहेत. असे असले तरी काँग्रेस पक्षाचा कुठलाही छोटा-मोठा कार्यक्रम असला तरी ते परिवारापेक्षा त्या कार्यक्रमाला जाण्यास महत्त्व देतात. त्यांनी तसेच आमच्या कुटुंबाने काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी संपूर्ण अयुष्य वेचले आहे. एवढे करूनही जर पक्षश्रेष्ठी दखल घेत नसतील तर ही खेदाची बाब म्हणावी लागेल.माजी जिल्हाध्यक्ष रामप्रसाद कुलवंत म्हणाले, गेल्या वीस वर्षात जिल्ह्यात काँग्रेसला प्रयत्न करूनही फारसे यश मिळत नाही. अशा स्थितीत पक्ष जिवंत ठेवण्याचे काम कैलास गोरंट्याल यांनी मोठ्या ताकदीने उभे केले आहे. एवढेच नाही तर युतीच्या लाटेतही त्यांनी जालन्यात विजय मिळवून जिल्ह्यात काँग्रेसचा एकमेव आमदार कायम ठेवण्यास मदत केली आहे.यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस कल्याण दळे, ज्ञानेश्वर भांदरगे, प्रभाकर पवार, सुषमा पायगव्हाणे, शहराध्यक्ष शेख महेमूद, बदर चाऊस, नवाब डांगे, गणेश राऊत, शेख रऊफ परसूवाले, विजय चौधरी, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, आनंद लोखंडे, विनोद यादव, शहराध्यक्षा शीतल तनपुरे, चंदाताई भांगडिया, मंगलताई खांडेभराड यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.पक्षाच्या नेतृत्वाला राजीनामे देऊन जागे करूजिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनीही गोरंट्याल यांच्या पक्षाप्रती असलेल्या निष्ठेवर बोलताना सांगितले की, गोरंट्याल यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांचा सन्मान व्हायला हवा होता. परंतु, तो न झाल्याने एकप्रकारे काँग्रेसचेच नुकसान होत आहे. गोरंट्याल यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्व ते प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.काँग्रेसचे नेते ज्ञानदेव पायगव्हाणे यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की, स्व. डॉ. शंकरराव राख यांच्या नंतर काँग्रेसला एकदाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. आता पक्षाला गोरंट्याल यांच्या रूपाने संधी देणे शक्य होते. परंतु तसे झालेले नाही. आता या पक्षाच्या नेतृत्वाला आम्ही राजीनामे देऊन जागे करण्याचा प्रयत्न करू, असेही पायगव्हाणे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :congressकाँग्रेसMLAआमदारnagaradhyakshaनगराध्यक्षResignationराजीनामाPoliticsराजकारण