शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

जालना बाजारपेठेत नवीन तुरीची आवक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:06 IST

बाजारगप्पा : दुष्काळाचा मोठा फटका जिल्ह्यातील तुरीला बसलेला असून उत्पन्नात मोठी घट निर्माण झालेली आहे.

- संजय देशमुख, (जालना )

दुष्काळाचा मोठा फटका जिल्ह्यातील तुरीला बसलेला असून उत्पन्नात मोठी घट निर्माण झालेली आहे. असे असतानाही जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. मात्र ही आवक फक्त ५० पोते असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या खरीप आणि रबी हंगामात पूर्वीप्रमाणे ग्राहकी दिसून आली नाही. सोयाबीन वगळता अन्य पिकांचे उत्पादन हे प्रचंड प्रमाणात घटल्याने बाजारपेठेतील उलाढालीवर त्याचा परिणाम झाला आहे. नवीन तुरीची आवक नगण्य असून या तुरीला पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपये भाव मिळत आहे. हा भाव आठवडाभर तरी कायम राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मोसंबीची आवक ५० टक्क्यांनी घटली असून, आता पुढील बहार येईपर्यंत तुरळक आवक राहील. हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे वास्तव आहे. आॅनलाईन नोंदणीत  दोन हजार एकशे आठ शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग या पिकांची नोंदणी केली आहे. या केंद्रावर जालन्यातून मूग ६१०, उडीद १७८, सोयाबीनची नोंदणी केलेल्यांची संख्या ४९० एवढी असून, भोकरदन, अंबड, बदनापूर, तीर्थपुरी आणि परतूर, असे एकूण मूग १००६, उडीद ३६१ आणि सोयाबीनची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही ७४१ एवढी आहे. त्यामुळे आता लवकरच नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी दिली आहे.

दरम्यान सीसीआयकडून कापूस खरेदीचा शुभारंभ सोमवारी बाजार समितीचे सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते होणार आहे. सीसीआयकडून ही खरेदी सुरू करण्यात येणार असली तरी याला बराच उशीर झाल्याने या केंद्रावर किती शेतकरी कापूस विक्रीसाठी आणतात हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. जालना बाजारपेठेत कडधान्याच्या भावातील तेजी कायम असून, चना डाळ ५ हजार ८०० ते ६०००, तूर ६ हजार ४०० ते ७००० हजार, मूग डाळ ६ हजार ५०० ते ६ हजार ७०० रुपये, मसूर डाळ ५ हजार ते ५ हजार ४०० रुपये, गव्हाची आवक ही दररोजची शंभर पोती असून, २१०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

ज्वारीची मागणी कायम असली तरी त्याचा पुरवठा कमी असल्याने भावातील तेजी याही आठवड्यात कायम आहे. ज्वारीने दोन हजार रुपयांवरून उडी मारून २६०० ते ३ हजार ५०० रुपयांवर झेप घेतली आहे. बाजरीदेखील भाव खाऊन जात असून, सध्या थंडीचे दिवस असल्याने बाजरीला मोठी मागणी असून, भाव वाढले असल्याचे सांगण्यात आले. सध्या १ हजार ९०० ते २४०० रुपये क्विंटलवर भाव पोहोचले आहेत. मक्याची आवक तीन हजार पोती असून, मक्याचे भाव मात्र स्थिर आहेत. मक्याचे भाव क्विंटलमागे १ हजार ४०० ते १ हजार ५०० रुपयांवर आहेत. जालना बाजारपेठेत तुरीप्रमाणेच हरभऱ्याची आवक येत असून, ही आवक दररोज ३०० पोती असून, सध्या हरभऱ्याला ४ हजार ७०० रुपयांचा दर मिळत आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी