शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जालना बाजारपेठेत नवीन तुरीची आवक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:06 IST

बाजारगप्पा : दुष्काळाचा मोठा फटका जिल्ह्यातील तुरीला बसलेला असून उत्पन्नात मोठी घट निर्माण झालेली आहे.

- संजय देशमुख, (जालना )

दुष्काळाचा मोठा फटका जिल्ह्यातील तुरीला बसलेला असून उत्पन्नात मोठी घट निर्माण झालेली आहे. असे असतानाही जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. मात्र ही आवक फक्त ५० पोते असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या खरीप आणि रबी हंगामात पूर्वीप्रमाणे ग्राहकी दिसून आली नाही. सोयाबीन वगळता अन्य पिकांचे उत्पादन हे प्रचंड प्रमाणात घटल्याने बाजारपेठेतील उलाढालीवर त्याचा परिणाम झाला आहे. नवीन तुरीची आवक नगण्य असून या तुरीला पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपये भाव मिळत आहे. हा भाव आठवडाभर तरी कायम राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मोसंबीची आवक ५० टक्क्यांनी घटली असून, आता पुढील बहार येईपर्यंत तुरळक आवक राहील. हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे वास्तव आहे. आॅनलाईन नोंदणीत  दोन हजार एकशे आठ शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग या पिकांची नोंदणी केली आहे. या केंद्रावर जालन्यातून मूग ६१०, उडीद १७८, सोयाबीनची नोंदणी केलेल्यांची संख्या ४९० एवढी असून, भोकरदन, अंबड, बदनापूर, तीर्थपुरी आणि परतूर, असे एकूण मूग १००६, उडीद ३६१ आणि सोयाबीनची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही ७४१ एवढी आहे. त्यामुळे आता लवकरच नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी दिली आहे.

दरम्यान सीसीआयकडून कापूस खरेदीचा शुभारंभ सोमवारी बाजार समितीचे सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते होणार आहे. सीसीआयकडून ही खरेदी सुरू करण्यात येणार असली तरी याला बराच उशीर झाल्याने या केंद्रावर किती शेतकरी कापूस विक्रीसाठी आणतात हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. जालना बाजारपेठेत कडधान्याच्या भावातील तेजी कायम असून, चना डाळ ५ हजार ८०० ते ६०००, तूर ६ हजार ४०० ते ७००० हजार, मूग डाळ ६ हजार ५०० ते ६ हजार ७०० रुपये, मसूर डाळ ५ हजार ते ५ हजार ४०० रुपये, गव्हाची आवक ही दररोजची शंभर पोती असून, २१०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

ज्वारीची मागणी कायम असली तरी त्याचा पुरवठा कमी असल्याने भावातील तेजी याही आठवड्यात कायम आहे. ज्वारीने दोन हजार रुपयांवरून उडी मारून २६०० ते ३ हजार ५०० रुपयांवर झेप घेतली आहे. बाजरीदेखील भाव खाऊन जात असून, सध्या थंडीचे दिवस असल्याने बाजरीला मोठी मागणी असून, भाव वाढले असल्याचे सांगण्यात आले. सध्या १ हजार ९०० ते २४०० रुपये क्विंटलवर भाव पोहोचले आहेत. मक्याची आवक तीन हजार पोती असून, मक्याचे भाव मात्र स्थिर आहेत. मक्याचे भाव क्विंटलमागे १ हजार ४०० ते १ हजार ५०० रुपयांवर आहेत. जालना बाजारपेठेत तुरीप्रमाणेच हरभऱ्याची आवक येत असून, ही आवक दररोज ३०० पोती असून, सध्या हरभऱ्याला ४ हजार ७०० रुपयांचा दर मिळत आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी