शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
3
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
4
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
6
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
7
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
8
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
9
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
10
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
11
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
12
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
13
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
14
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
15
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
16
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जालना बाजारपेठेत नवीन तुरीची आवक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:06 IST

बाजारगप्पा : दुष्काळाचा मोठा फटका जिल्ह्यातील तुरीला बसलेला असून उत्पन्नात मोठी घट निर्माण झालेली आहे.

- संजय देशमुख, (जालना )

दुष्काळाचा मोठा फटका जिल्ह्यातील तुरीला बसलेला असून उत्पन्नात मोठी घट निर्माण झालेली आहे. असे असतानाही जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. मात्र ही आवक फक्त ५० पोते असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या खरीप आणि रबी हंगामात पूर्वीप्रमाणे ग्राहकी दिसून आली नाही. सोयाबीन वगळता अन्य पिकांचे उत्पादन हे प्रचंड प्रमाणात घटल्याने बाजारपेठेतील उलाढालीवर त्याचा परिणाम झाला आहे. नवीन तुरीची आवक नगण्य असून या तुरीला पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपये भाव मिळत आहे. हा भाव आठवडाभर तरी कायम राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मोसंबीची आवक ५० टक्क्यांनी घटली असून, आता पुढील बहार येईपर्यंत तुरळक आवक राहील. हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे वास्तव आहे. आॅनलाईन नोंदणीत  दोन हजार एकशे आठ शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग या पिकांची नोंदणी केली आहे. या केंद्रावर जालन्यातून मूग ६१०, उडीद १७८, सोयाबीनची नोंदणी केलेल्यांची संख्या ४९० एवढी असून, भोकरदन, अंबड, बदनापूर, तीर्थपुरी आणि परतूर, असे एकूण मूग १००६, उडीद ३६१ आणि सोयाबीनची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही ७४१ एवढी आहे. त्यामुळे आता लवकरच नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी दिली आहे.

दरम्यान सीसीआयकडून कापूस खरेदीचा शुभारंभ सोमवारी बाजार समितीचे सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते होणार आहे. सीसीआयकडून ही खरेदी सुरू करण्यात येणार असली तरी याला बराच उशीर झाल्याने या केंद्रावर किती शेतकरी कापूस विक्रीसाठी आणतात हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. जालना बाजारपेठेत कडधान्याच्या भावातील तेजी कायम असून, चना डाळ ५ हजार ८०० ते ६०००, तूर ६ हजार ४०० ते ७००० हजार, मूग डाळ ६ हजार ५०० ते ६ हजार ७०० रुपये, मसूर डाळ ५ हजार ते ५ हजार ४०० रुपये, गव्हाची आवक ही दररोजची शंभर पोती असून, २१०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

ज्वारीची मागणी कायम असली तरी त्याचा पुरवठा कमी असल्याने भावातील तेजी याही आठवड्यात कायम आहे. ज्वारीने दोन हजार रुपयांवरून उडी मारून २६०० ते ३ हजार ५०० रुपयांवर झेप घेतली आहे. बाजरीदेखील भाव खाऊन जात असून, सध्या थंडीचे दिवस असल्याने बाजरीला मोठी मागणी असून, भाव वाढले असल्याचे सांगण्यात आले. सध्या १ हजार ९०० ते २४०० रुपये क्विंटलवर भाव पोहोचले आहेत. मक्याची आवक तीन हजार पोती असून, मक्याचे भाव मात्र स्थिर आहेत. मक्याचे भाव क्विंटलमागे १ हजार ४०० ते १ हजार ५०० रुपयांवर आहेत. जालना बाजारपेठेत तुरीप्रमाणेच हरभऱ्याची आवक येत असून, ही आवक दररोज ३०० पोती असून, सध्या हरभऱ्याला ४ हजार ७०० रुपयांचा दर मिळत आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी