शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याला मार्च एन्डचा फटका; ५० कोटीपेक्षा अधिकचा निधी परत गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 18:31 IST

संबंधित अधिका-यांच्या बेजबादारपणामुळे मिळालेला निधी परत गेल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे ४५ कोटी अन्य विभागाचे मिळून अडीच कोटी परत

- संजय देशमुखजालना : राज्य सरकारने आदेश देऊनही जालना जिल्ह्यातील बांधकाम विभाग तसेच नगररचना विभाग, वन विभाग आणि इतर विभागांचा जवळपास ५० कोटी रूपयांपेक्षा अधिकचा निधी परत गेल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. संबंधित अधिका-यांच्या बेजबादारपणामुळे मिळालेला निधी परत गेल्याचे दिसून येत आहे.

जालना येथील बांधकाम विभाग एक आणि विभाग क्रमांक दोनच्या माध्यमातून विविध रस्ते, पूल तसेच शासकीय इमारतींची उभारणी आणि देखभाल दुरूस्ती केली जाते. जालना जिल्ह्यातील विविध कंत्राटदार हे प्रारंभी टेंडर भरून काम मिळाल्यावर स्वत:च्या पैशातून ही कामे करतात. मार्च एन्डला ही बिले मिळतील या आशेवर हे कंत्राटदार कामे करतात. या कंत्राटदारांकडे जिल्ह्याचा विचार केल्यास पाच ते सात हजार मजुरांचा रोजगार अवंलबून असतो. यंदा ही देयके बीडीएस प्रणालीवर संबंधित विभागांनी २७ मार्च पूर्वी टाकणे बंधनकारक केले होते. असे असतांना अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे मिळालेला निधी परत गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

त्यात जालना विभाग क्रमांक एकचे जवळपास ४० कोटी आणि विभाग क्रमांक दोनचे ६ कोटी रूपये असे एकट्या बांधकाम विभागाचे ४६ कोटी रूपये तसेच या बांधकाम विभागा अंतर्गत येणाºया विद्युत विभागाचे सव्वा कोटी रूपये परत गेले आहेत. यामुळे कंत्राटदारांसह मजुरांवर आर्थिक संकट कोसळले असल्याचे सांगण्यात आले. हा बीडीएसवर परत गेलेला निधी मिळावा म्हणून दोन्ही विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांनी शासनाच्या अर्थ विभागाकडे पत्र व्यवहार केला आहे. परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परतूर येथील विभाग क्रमांक एकचे अभियंता तर पुणे येथून कार्यालयाचा पदभार चालवित असल्याचा आरोप आहे. या बाबत त्यांच्याशी शुक्रवारी परतूर येथील कार्यालयात संपर्क साधला असता, ते कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्याचे सांगण्यात आले. तर जालन्यातील कार्यकारी अभियंता चांडक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

बेजबाबदार अधिका-यावर कारवाईची मागणीबांधकाम विभागासह जिल्हा नगररचना विभागाचे ९४ लाख रूपये, वनविभागाचे २५ लाख रूपये देखील परत गेल्याचे सांगण्यात आले. एकीकडे निधी मिळवितांना कशी कसरत करावी लागते हे त्या विभागातील अधिकाºयांना चांगलेच ज्ञात आहे. असे असतांनाही केवळ बेफिकीरी वृत्तीमुळे जिल्ह्याला मिळालेला निधी परत गेल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, या प्रकरणी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी या बेजबादार अधिकाºयांवर कारवाईची मागणी होत आहे.

टॅग्स :JalanaजालनाfundsनिधीMONEYपैसा