शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ४१ अंशांच्या वरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:51 IST

विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सावली देणारे वृक्ष जमीनदोस्त झाल्याने तापमानाचे चटके अधिक वाढत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एककीडे १३ कोटी वृक्ष लागवडीचा दावा केला जात आहे. असे असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरूच आहे. लावलेले वृक्ष जगविण्यासाठी कुठलीच प्रभावी यंत्रणा उभारण्यात शासनाला यश आले नाही. त्यामुळे वृक्षलागवड एक सोपस्कार बनली आहे. यामुळेच शहरासह ग्रामीण भागातील वन आच्छादित जमिनीचा टक्का लोप पावत आहे. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सावली देणारे वृक्ष जमीनदोस्त झाल्याने तापमानाचे चटके अधिक वाढत आहेत.गेल्या तीन महिन्यांचा जालना जिल्ह्याचा वाढत्या तापमानाचा आढावा घेतला असता साधारणपणे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासुनच उन्हाचे चटके वाढत गेले. यामुळे यंदा कधी नव्हे तो उन्हाळा जालनेकरांना असह्य झाला. या उन्हामुळे शीतपेयांच्या विक्रीसह कूलर, एसी, पंखे यांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.एकूणच हा उन्हाळा बाजारपेठेसाठी मात्र दिलासादायक ठरला. असे म्हणल्यास वावगे ठरू नये. उन्हाळ्याची चाहूल ही संक्रांतीनंतर हळूहळू सुरू होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच जालना जिल्ह्याचा पारा हा २८ अंशांच्यावर सरकला होता. मार्चमध्ये हा पारा ३५ ते ४० अंशच्या दरम्यान दिसून आला. परंतु, एप्रिलच्या प्रारंभापासूनच उन्हाच्या कडाक्याने जोर धरला. १ एप्रिलनंतर तर जालन्याचा पारा हा ४० ते ४३ अंश या दरम्यान राहिला. मध्यंतरी उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत बाजारपेठेत शुकशुकाट दिसून यायचा. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत असत.उन्हाळ्याचा सर्वात मोठा फटका ज्याप्रमाणे माणसांना बसला; त्यापेक्षा कितीतरी अधिक फटका हा मुक्या प्राण्यांना बसला. तीव्र उन्हामुळे पाणवठे आटल्याने हरीण, वानर हे मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणावर आले आहेत. काही गावांमध्ये तर मोर आणि पोपट तसेच अन्य पक्ष्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. परंतु, त्याची कुठे नोंद नसल्याने हा प्रश्न दुर्लक्षित राहिला. उन्हाचा फटका पिण्याच्या पाण्यालाही बसला. बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक वाढल्याने आहे ते जलसाठेही कोरडे पडले आहेत.वाढत्या उन्हाचा फटका माणसं, जनावरे यांना बसतोच बसतो. परंतु, शेती आणि फळबागांनाही या उन्हामुळे मोठा ताण सहन करावा लागतो. कृषी विज्ञान केंद्रात वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी तापमानाची दररोज नोंद ठेवली जाते.एप्रिलनंतर १५ मे पर्यंत सरासरी ४५ दिवसातील तापमानाचा आढावा घेतल्यास या दिवसात एखादा दोन दिवस वगळता तापमानाचा पारा हा ४० अंशांवर राहिला असल्याची माहिती कृषी अभियंता पंडित वासरे यांनी दिली.

टॅग्स :Sun strokeउष्माघातTemperatureतापमानweatherहवामानenvironmentवातावरण