शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

जालना जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:54 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे जनावरांचा पाणीप्रश्नही मार्गी लागला आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान अद्यापही कायम आहे.जिल्ह्यात ज्या गावांमध्ये दमदार पाऊस झाला आहे त्यात प्रामुख्याने जालना तालुक्यातील रामनगर (६०), पाचन वडगाव (७०), बदनापूर तालुक्यातील दाभाडी (६५), सेलगाव (६५), भोकरदन (७७), राजूर (७९), परतूर (६३) आणि घनसावंगी महसूल मंडळात (६२) पाऊस झाला. कंसातील आकडे हे मिलीमीटरमध्ये पाऊस दर्शवितात. जिल्ह्यात एकूण ३२.५९ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. आजवर एकूण ३२१.२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तालुकानिहाय पाऊस पाहता जालना तालुक्यात ४० मिमी पाऊस झाला आहे. तर बदनापूर- ४५.२० ४० मिमी, भोकरदन- ३७.३८ मिमी, जाफ्राबाद १९.२० मिमी, परतूर- २५.१६ मिमी, मंठा- १८.७५ मिमी, अंबड- ४० मिमी, घनसावंगी तालुक्यात ३५. मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.दिलासा...भोकरदन, परतूर, बदनापूर, अंबडसह कुंभार पिंपळगाव, राजा टाकळी, देवी दहेगाव, भामनगाव, मूर्ती, लिंबी, जांब समर्थ, राजूर, हसनाबाद, पारधसह परिसरात दमदार पाऊस झाला. पावसामुळे या भागातील खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असून, सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

टॅग्स :RainपाऊसweatherहवामानNatureनिसर्ग