शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
4
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
5
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
6
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
7
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
8
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
9
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
10
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
11
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
12
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
13
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
14
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
15
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
16
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
17
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
18
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
19
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
20
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...

जालना जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:54 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे जनावरांचा पाणीप्रश्नही मार्गी लागला आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान अद्यापही कायम आहे.जिल्ह्यात ज्या गावांमध्ये दमदार पाऊस झाला आहे त्यात प्रामुख्याने जालना तालुक्यातील रामनगर (६०), पाचन वडगाव (७०), बदनापूर तालुक्यातील दाभाडी (६५), सेलगाव (६५), भोकरदन (७७), राजूर (७९), परतूर (६३) आणि घनसावंगी महसूल मंडळात (६२) पाऊस झाला. कंसातील आकडे हे मिलीमीटरमध्ये पाऊस दर्शवितात. जिल्ह्यात एकूण ३२.५९ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. आजवर एकूण ३२१.२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तालुकानिहाय पाऊस पाहता जालना तालुक्यात ४० मिमी पाऊस झाला आहे. तर बदनापूर- ४५.२० ४० मिमी, भोकरदन- ३७.३८ मिमी, जाफ्राबाद १९.२० मिमी, परतूर- २५.१६ मिमी, मंठा- १८.७५ मिमी, अंबड- ४० मिमी, घनसावंगी तालुक्यात ३५. मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.दिलासा...भोकरदन, परतूर, बदनापूर, अंबडसह कुंभार पिंपळगाव, राजा टाकळी, देवी दहेगाव, भामनगाव, मूर्ती, लिंबी, जांब समर्थ, राजूर, हसनाबाद, पारधसह परिसरात दमदार पाऊस झाला. पावसामुळे या भागातील खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असून, सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

टॅग्स :RainपाऊसweatherहवामानNatureनिसर्ग