शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

जालना जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:54 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे जनावरांचा पाणीप्रश्नही मार्गी लागला आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान अद्यापही कायम आहे.जिल्ह्यात ज्या गावांमध्ये दमदार पाऊस झाला आहे त्यात प्रामुख्याने जालना तालुक्यातील रामनगर (६०), पाचन वडगाव (७०), बदनापूर तालुक्यातील दाभाडी (६५), सेलगाव (६५), भोकरदन (७७), राजूर (७९), परतूर (६३) आणि घनसावंगी महसूल मंडळात (६२) पाऊस झाला. कंसातील आकडे हे मिलीमीटरमध्ये पाऊस दर्शवितात. जिल्ह्यात एकूण ३२.५९ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. आजवर एकूण ३२१.२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तालुकानिहाय पाऊस पाहता जालना तालुक्यात ४० मिमी पाऊस झाला आहे. तर बदनापूर- ४५.२० ४० मिमी, भोकरदन- ३७.३८ मिमी, जाफ्राबाद १९.२० मिमी, परतूर- २५.१६ मिमी, मंठा- १८.७५ मिमी, अंबड- ४० मिमी, घनसावंगी तालुक्यात ३५. मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.दिलासा...भोकरदन, परतूर, बदनापूर, अंबडसह कुंभार पिंपळगाव, राजा टाकळी, देवी दहेगाव, भामनगाव, मूर्ती, लिंबी, जांब समर्थ, राजूर, हसनाबाद, पारधसह परिसरात दमदार पाऊस झाला. पावसामुळे या भागातील खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असून, सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

टॅग्स :RainपाऊसweatherहवामानNatureनिसर्ग