शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

जालना जिल्ह्याकडे पावसाने फिरवली पाठ; भूजल पातळी ०.२२ मीटरने खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 19:42 IST

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने भूजल पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहेत.

ठळक मुद्देयावर्षी मोजण्यात आलेल्या भूजल पाणी पातळी ०.२२ मीटरने कमी झाली आहे

जालना : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने भूजल पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहेत. यावर्षी मोजण्यात आलेल्या भूजल पाणी पातळी ०.२२ मीटरने कमी झाली आहे. परिणामी, येणाऱ्या काळात चांगला पाऊस न झाल्यास ही पातळी आणखीच खोल जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जिल्ह्यावर गेल्या काही वर्षापासून वरुणराजा रुसला आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात केवळ दोन वर्ष चांगला पाऊस झाला. त्यामुळे पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. परिणामी आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात मागील वर्षी चांगला पाऊस झाला. तर यावर्षी अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. सध्या ०.२२ ने पाणी पातळीत घट झाली आहे.

यावर्षी भूजल सर्व्हेक्षण विभागाने ११० विहिरातून भूजल पाणी पातळी मोजली आहे. यात भोकरदन तालुक्यात सर्वाधिक ०.६१ मीटरने घट झाली. तर परतूरमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने ०.३ मीटरने घट झाली तसेच मंठ्यात ०. ०४ मीटरने घट झाली आहे. जिल्ह्यात चांगला पाऊस न झाल्यास ही भूजल पातळी आणखी खोल जाण्याची शक्यता भूजल सर्व्हेक्षण विभागाने वर्तवली आली.

पाऊस नसल्याने परिणाम झाला जिल्हाभरात जलयुक्त शिवाराची काम झाल्याने भूजल पाणी पातळीत मागील वर्षी वाढ झाली होती. परंतु, सध्या पाऊस नसल्याने भूजल पाणी पातळीत घट होत आहे. यासाठी चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे.- बी. एस. मेश्राम, वरिष्ठ भुवैज्ञानिक, भूजल संरक्षण आणि विकास यंत्रणा 

तालुकानिहाय भूजल पातळीतालुका     घट (मीटर)अबंड             ०.०१बदनापूर        ०.३४भोकरदन       ०.६१घनसावंगी     ०.२८जाफराबाद    ०.१५जालना         ०.३५मंठा              ०.०४परतूर          ०.०३

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRainपाऊसJalanaजालना