शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

जालना जिल्ह्याकडे पावसाने फिरवली पाठ; भूजल पातळी ०.२२ मीटरने खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 19:42 IST

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने भूजल पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहेत.

ठळक मुद्देयावर्षी मोजण्यात आलेल्या भूजल पाणी पातळी ०.२२ मीटरने कमी झाली आहे

जालना : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने भूजल पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहेत. यावर्षी मोजण्यात आलेल्या भूजल पाणी पातळी ०.२२ मीटरने कमी झाली आहे. परिणामी, येणाऱ्या काळात चांगला पाऊस न झाल्यास ही पातळी आणखीच खोल जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जिल्ह्यावर गेल्या काही वर्षापासून वरुणराजा रुसला आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात केवळ दोन वर्ष चांगला पाऊस झाला. त्यामुळे पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. परिणामी आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात मागील वर्षी चांगला पाऊस झाला. तर यावर्षी अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. सध्या ०.२२ ने पाणी पातळीत घट झाली आहे.

यावर्षी भूजल सर्व्हेक्षण विभागाने ११० विहिरातून भूजल पाणी पातळी मोजली आहे. यात भोकरदन तालुक्यात सर्वाधिक ०.६१ मीटरने घट झाली. तर परतूरमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने ०.३ मीटरने घट झाली तसेच मंठ्यात ०. ०४ मीटरने घट झाली आहे. जिल्ह्यात चांगला पाऊस न झाल्यास ही भूजल पातळी आणखी खोल जाण्याची शक्यता भूजल सर्व्हेक्षण विभागाने वर्तवली आली.

पाऊस नसल्याने परिणाम झाला जिल्हाभरात जलयुक्त शिवाराची काम झाल्याने भूजल पाणी पातळीत मागील वर्षी वाढ झाली होती. परंतु, सध्या पाऊस नसल्याने भूजल पाणी पातळीत घट होत आहे. यासाठी चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे.- बी. एस. मेश्राम, वरिष्ठ भुवैज्ञानिक, भूजल संरक्षण आणि विकास यंत्रणा 

तालुकानिहाय भूजल पातळीतालुका     घट (मीटर)अबंड             ०.०१बदनापूर        ०.३४भोकरदन       ०.६१घनसावंगी     ०.२८जाफराबाद    ०.१५जालना         ०.३५मंठा              ०.०४परतूर          ०.०३

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRainपाऊसJalanaजालना