शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

जालना जिल्ह्याकडे पावसाने फिरवली पाठ; भूजल पातळी ०.२२ मीटरने खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 19:42 IST

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने भूजल पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहेत.

ठळक मुद्देयावर्षी मोजण्यात आलेल्या भूजल पाणी पातळी ०.२२ मीटरने कमी झाली आहे

जालना : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने भूजल पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहेत. यावर्षी मोजण्यात आलेल्या भूजल पाणी पातळी ०.२२ मीटरने कमी झाली आहे. परिणामी, येणाऱ्या काळात चांगला पाऊस न झाल्यास ही पातळी आणखीच खोल जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जिल्ह्यावर गेल्या काही वर्षापासून वरुणराजा रुसला आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात केवळ दोन वर्ष चांगला पाऊस झाला. त्यामुळे पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. परिणामी आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात मागील वर्षी चांगला पाऊस झाला. तर यावर्षी अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. सध्या ०.२२ ने पाणी पातळीत घट झाली आहे.

यावर्षी भूजल सर्व्हेक्षण विभागाने ११० विहिरातून भूजल पाणी पातळी मोजली आहे. यात भोकरदन तालुक्यात सर्वाधिक ०.६१ मीटरने घट झाली. तर परतूरमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने ०.३ मीटरने घट झाली तसेच मंठ्यात ०. ०४ मीटरने घट झाली आहे. जिल्ह्यात चांगला पाऊस न झाल्यास ही भूजल पातळी आणखी खोल जाण्याची शक्यता भूजल सर्व्हेक्षण विभागाने वर्तवली आली.

पाऊस नसल्याने परिणाम झाला जिल्हाभरात जलयुक्त शिवाराची काम झाल्याने भूजल पाणी पातळीत मागील वर्षी वाढ झाली होती. परंतु, सध्या पाऊस नसल्याने भूजल पाणी पातळीत घट होत आहे. यासाठी चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे.- बी. एस. मेश्राम, वरिष्ठ भुवैज्ञानिक, भूजल संरक्षण आणि विकास यंत्रणा 

तालुकानिहाय भूजल पातळीतालुका     घट (मीटर)अबंड             ०.०१बदनापूर        ०.३४भोकरदन       ०.६१घनसावंगी     ०.२८जाफराबाद    ०.१५जालना         ०.३५मंठा              ०.०४परतूर          ०.०३

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRainपाऊसJalanaजालना