शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात टँकरने गाठला द्विशतकाचा टप्पा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 01:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जालना जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईने रौद्ररूप धारण केले असून, फेब्रुवारीच्या मध्यातच जिल्ह्यात टँकरने व्दितशतक ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईने रौद्ररूप धारण केले असून, फेब्रुवारीच्या मध्यातच जिल्ह्यात टँकरने व्दितशतक गाठले आहे. यंदा पाणी टंचाईची गंंभीर स्थिती लक्षात घेता प्रशासनाने टंचाई निवारण्यासाठी ३८ कोटी रूपयांचा आराखडता तयार केला असून, आता पर्यंत जवळपास ११ कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने मोठी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पिकांसह यंदा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार ही शक्यता आता वास्तवात उरतले आहे. सध्या जालना शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाई आतापासून जाणवत आहे.एकीकडे या टंचाईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्या सारखा पैसा लागणार आहे, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने भूजल सर्वेक्षणाच्या अहवालानंतर कोट्यवधी रूपयांची तरतूद असणारा आराखडा तयार केला होता. मात्र, नंतर त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परत पाठवून तो केवळ ३८ कोटी रूपयांवर आणला. आता या मंजुर आराखड्यातून सध्या टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत असतांनाच जुन्या नळयोजनांची दुरूस्ती, नवीन नळ योजनांना मान्यता मिळवून त्या पूर्ण करणे, विहीर अधिग्रहण करण्यात येत आहे.या उपाय योजना आखूनही ही टंचाई दूर होईल असे चिन्ह नसून, टँकरव्दारे पाणीपुरवठा हा तात्पुरता उपाय असल्याचे सांगण्यात आले. कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी जलयुक्त शिवार ही योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जात असून, त्यातही यंदा कमी पाऊस झाल्याने पाणीसाठा पुरेसा साठला नाही. त्यामुळे ही योजनाही येथे अयशस्वी ठरली आहे.एकूणच सध्या ज्या गावांकडून टँकरचे प्रस्ताव येतात, त्यांची तातडीने छाननी करण्यात येत आहे. आता टँकर मंजुरीचे अधिकार हे उपविभागीय अधिका-यांना दिले आहेत.हातपंपाची दुरुस्ती गरजेचीजिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हातपंप घेण्यात आले आहेत. असे असताना ते हातपंप देखभाल दुरूस्तीअभावी बंद पडले आहेत. ते हातपंप दुरूस्त करून त्यात आणखी जादा लोखंडी पाइप टाकल्यास त्यातून हमखास पाणी मिळू शकेल. तसेच या हातपंपावर विद्युत मोटार बसवूनही त्यातून पाणी काढता येऊ शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.प्लास्टिक टाक्या कागदावरपाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरकारकडून प्लास्टिकच्या टाक्या गावाना देण्यात येण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही कुठल्याच गावांना या टाक्या मिळाल्या नसल्याचे सांगण्यात आले. ही प्लास्टिकची टाकी सार्वजनिक जागेवर ठेवून, त्यात टँकरचे पाणी ओतून त्याला तोटीव्दारे गावक-यांना देण्याची ही योजना आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकwater shortageपाणीटंचाई