शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात टँकरने गाठला द्विशतकाचा टप्पा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 01:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जालना जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईने रौद्ररूप धारण केले असून, फेब्रुवारीच्या मध्यातच जिल्ह्यात टँकरने व्दितशतक ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईने रौद्ररूप धारण केले असून, फेब्रुवारीच्या मध्यातच जिल्ह्यात टँकरने व्दितशतक गाठले आहे. यंदा पाणी टंचाईची गंंभीर स्थिती लक्षात घेता प्रशासनाने टंचाई निवारण्यासाठी ३८ कोटी रूपयांचा आराखडता तयार केला असून, आता पर्यंत जवळपास ११ कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने मोठी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पिकांसह यंदा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार ही शक्यता आता वास्तवात उरतले आहे. सध्या जालना शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाई आतापासून जाणवत आहे.एकीकडे या टंचाईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्या सारखा पैसा लागणार आहे, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने भूजल सर्वेक्षणाच्या अहवालानंतर कोट्यवधी रूपयांची तरतूद असणारा आराखडा तयार केला होता. मात्र, नंतर त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परत पाठवून तो केवळ ३८ कोटी रूपयांवर आणला. आता या मंजुर आराखड्यातून सध्या टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत असतांनाच जुन्या नळयोजनांची दुरूस्ती, नवीन नळ योजनांना मान्यता मिळवून त्या पूर्ण करणे, विहीर अधिग्रहण करण्यात येत आहे.या उपाय योजना आखूनही ही टंचाई दूर होईल असे चिन्ह नसून, टँकरव्दारे पाणीपुरवठा हा तात्पुरता उपाय असल्याचे सांगण्यात आले. कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी जलयुक्त शिवार ही योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जात असून, त्यातही यंदा कमी पाऊस झाल्याने पाणीसाठा पुरेसा साठला नाही. त्यामुळे ही योजनाही येथे अयशस्वी ठरली आहे.एकूणच सध्या ज्या गावांकडून टँकरचे प्रस्ताव येतात, त्यांची तातडीने छाननी करण्यात येत आहे. आता टँकर मंजुरीचे अधिकार हे उपविभागीय अधिका-यांना दिले आहेत.हातपंपाची दुरुस्ती गरजेचीजिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हातपंप घेण्यात आले आहेत. असे असताना ते हातपंप देखभाल दुरूस्तीअभावी बंद पडले आहेत. ते हातपंप दुरूस्त करून त्यात आणखी जादा लोखंडी पाइप टाकल्यास त्यातून हमखास पाणी मिळू शकेल. तसेच या हातपंपावर विद्युत मोटार बसवूनही त्यातून पाणी काढता येऊ शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.प्लास्टिक टाक्या कागदावरपाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरकारकडून प्लास्टिकच्या टाक्या गावाना देण्यात येण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही कुठल्याच गावांना या टाक्या मिळाल्या नसल्याचे सांगण्यात आले. ही प्लास्टिकची टाकी सार्वजनिक जागेवर ठेवून, त्यात टँकरचे पाणी ओतून त्याला तोटीव्दारे गावक-यांना देण्याची ही योजना आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकwater shortageपाणीटंचाई