शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

जालना जिल्ह्यात टँकरने गाठला द्विशतकाचा टप्पा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 01:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जालना जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईने रौद्ररूप धारण केले असून, फेब्रुवारीच्या मध्यातच जिल्ह्यात टँकरने व्दितशतक ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईने रौद्ररूप धारण केले असून, फेब्रुवारीच्या मध्यातच जिल्ह्यात टँकरने व्दितशतक गाठले आहे. यंदा पाणी टंचाईची गंंभीर स्थिती लक्षात घेता प्रशासनाने टंचाई निवारण्यासाठी ३८ कोटी रूपयांचा आराखडता तयार केला असून, आता पर्यंत जवळपास ११ कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने मोठी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पिकांसह यंदा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार ही शक्यता आता वास्तवात उरतले आहे. सध्या जालना शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाई आतापासून जाणवत आहे.एकीकडे या टंचाईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्या सारखा पैसा लागणार आहे, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने भूजल सर्वेक्षणाच्या अहवालानंतर कोट्यवधी रूपयांची तरतूद असणारा आराखडा तयार केला होता. मात्र, नंतर त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परत पाठवून तो केवळ ३८ कोटी रूपयांवर आणला. आता या मंजुर आराखड्यातून सध्या टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत असतांनाच जुन्या नळयोजनांची दुरूस्ती, नवीन नळ योजनांना मान्यता मिळवून त्या पूर्ण करणे, विहीर अधिग्रहण करण्यात येत आहे.या उपाय योजना आखूनही ही टंचाई दूर होईल असे चिन्ह नसून, टँकरव्दारे पाणीपुरवठा हा तात्पुरता उपाय असल्याचे सांगण्यात आले. कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी जलयुक्त शिवार ही योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जात असून, त्यातही यंदा कमी पाऊस झाल्याने पाणीसाठा पुरेसा साठला नाही. त्यामुळे ही योजनाही येथे अयशस्वी ठरली आहे.एकूणच सध्या ज्या गावांकडून टँकरचे प्रस्ताव येतात, त्यांची तातडीने छाननी करण्यात येत आहे. आता टँकर मंजुरीचे अधिकार हे उपविभागीय अधिका-यांना दिले आहेत.हातपंपाची दुरुस्ती गरजेचीजिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हातपंप घेण्यात आले आहेत. असे असताना ते हातपंप देखभाल दुरूस्तीअभावी बंद पडले आहेत. ते हातपंप दुरूस्त करून त्यात आणखी जादा लोखंडी पाइप टाकल्यास त्यातून हमखास पाणी मिळू शकेल. तसेच या हातपंपावर विद्युत मोटार बसवूनही त्यातून पाणी काढता येऊ शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.प्लास्टिक टाक्या कागदावरपाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरकारकडून प्लास्टिकच्या टाक्या गावाना देण्यात येण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही कुठल्याच गावांना या टाक्या मिळाल्या नसल्याचे सांगण्यात आले. ही प्लास्टिकची टाकी सार्वजनिक जागेवर ठेवून, त्यात टँकरचे पाणी ओतून त्याला तोटीव्दारे गावक-यांना देण्याची ही योजना आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकwater shortageपाणीटंचाई