शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

जालना जिल्ह्यात यावर्षी १६ हजार झाडांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:07 AM

जालना जिल्ह्यात २० हेक्टर वनक्षेत्र परिसरात १६ हजार झाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

जालना : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजनेसाठी जालना जिल्ह्यामध्ये जोरदार तयारी करण्यात येत आहे. या योजनेतील वृक्ष लागवडीसाठी खड्डे घेण्यासह अन्य कामेही पूर्ण होत आली आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वन विभाग कामाला लागला आहे. जालना जिल्ह्यात २० हेक्टर वनक्षेत्र परिसरात १६ हजार झाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली आहे.वाढती लोकसंख्या, उद्योग, शेतीचा विस्तार, सिंचन व इतर प्रकल्प यामुळे मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. जंगल तोडीमुळे जगाला तापमानातील वाढ, हवामानात बदल व ऋतू बदलाचे परिणाम आताच दिसायला लागले आहेत. हे सर्व दृष्परिणाम टाळण्यासाठी राज्य शासनाने २०१७ ते २०१९ या कालावधीत ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील वर्षी १३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावर्षी ३३ कोटी वृक्षांची राज्यभरात लागवड होणार आहे.या पावसाळ्यात जिल्ह्यात वन विभागामार्फत १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान शहराजवळील २० हेक्टर क्षेत्रावर १६ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यासाठी ८०० खड्डे करण्याचे काम सुरु आहे. शहरातील नर्सरीमधून ही रोपे आणण्यात येणार असल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी एस. एन. गुरकुले यांनी दिली. दरम्यान, दरवर्षी वन विभागाकडून वृक्षांची लागवड करण्यात येते. परंतु, या वृक्षांना उन्हाळ््यात पाणी देण्यात येत नसल्याने ती पुन्हा करपून जातात. याकडे कोणाचेच लक्ष नसते. झाडे लावली जातात त्यांना जगविणे महत्वाचे आहे. याकडे संबधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Beedबीडforest departmentवनविभागState Governmentराज्य सरकार