शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यातील पाणवठे कोरडेठाक...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:54 IST

पाण्याअभावी वन्यप्राण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वनपरिक्षेत्रात वनविभागाच्यावतीने पाणवठे तयार करण्यात आले आहे. मात्र, पानवठ्यात पाणी टाकण्यात आले नसल्याने पानवठे कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी येणाऱ्या काळात पाण्याअभावी वन्यप्राण्याची गैरसोय होणार असून, याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : नैसर्गिक स्त्रोतातही जेमतेम पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाण्याअभावी वन्यप्राण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वनपरिक्षेत्रात वनविभागाच्यावतीने पाणवठे तयार करण्यात आले आहे. मात्र, पानवठ्यात पाणी टाकण्यात आले नसल्याने पानवठे कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी येणाऱ्या काळात पाण्याअभावी वन्यप्राण्याची गैरसोय होणार असून, याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.जिल्ह्यात १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर वनक्षेत्र पसरले आहे. पाणझडी वनक्षेत्र असलेल्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात हरिण, निलगाई, लांडगे, तडस, मोर, रानडूकर, सारस, वानर आदी प्राण्यांची मोठी संख्या आहे. वन्यप्राण्यांना जीवंत राहण्यासाठी खाद्यासह पाणी महत्वाचा घटक असतो. मात्र जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात लाखो रूपये खर्च करून आठही तालुक्यांतील वनपरिक्षेत्रात ठिकठिकाणी २७ सिमेंटचे पानवठे तयार करण्यात आलेले आहेत. परंतु, यावर्षी जिल्ह्यात पाऊस न पडल्याने पाठवडे कोरडे पडले आहे. तर काही पाणवठ्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल इतकेच पाणी आहे. त्यामुळे येणाºया काळात पाण्यासाठी वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागणार आहे. त्यातच पडलेल्या पावसाचे पाण्याचे योग्य नियोजनाअभावी पाणी अडविण्यात आले नाहीत. नैसर्गिक स्त्रोतातील पाणीही एक महिनाभरच पुरेल. परिणामी, पावसाळ््यातच वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागत आहे. मात्र, याकडे वनविभागाचे कायम दुर्लक्ष होत असल्याने वन्यप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे.जालना : वनविभागाने लक्ष देण्याची गरजदिवसेंदिवस वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्याने प्राण्यांची कमतरता जाणवत असल्याने प्राण्याअभावी पर्यावरणावरही परिणाम होत आहे. याकडे वनविभागाने गांर्भीयाने लक्ष देऊन जिल्ह्यातील वनसंपदा जपण्याची मागणी वन्यप्रेमींसह पर्यावरणावाद्यांकडून केली जात आहे.सध्या पाऊस नसल्यामुळे सर्वत्रच पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे वन परिसरातही पाणी नसल्यामुळे वन्य प्राणी शेताकडे पाण्याच्या शोधात जात आहे. परिणामी, हे प्राणी लागवड केल्या पिकाचे नुकसान करत आहे.वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढणारजिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात आतापासूनच पाण्यासाठी प्राण्यांना भटकंती करावी लागत आहे. यामुळे पाण्याच्या शोधात अनेक हिस्त्र प्राणी गावात येण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहेत. यामुळे वनपरिक्षेत्र परिसरात असलेल्या गावांमध्ये नेहमीच भितीचे वातावरण असते. यामुळे पाणवठ्यात पाण्याची सोय करण्याची गरज आहे.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाईforest departmentवनविभाग