शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
3
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
4
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
5
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
8
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
9
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
10
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
11
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
12
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
13
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
14
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
15
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
16
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
17
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
18
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
19
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
20
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यातील पाणवठे कोरडेठाक...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:54 IST

पाण्याअभावी वन्यप्राण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वनपरिक्षेत्रात वनविभागाच्यावतीने पाणवठे तयार करण्यात आले आहे. मात्र, पानवठ्यात पाणी टाकण्यात आले नसल्याने पानवठे कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी येणाऱ्या काळात पाण्याअभावी वन्यप्राण्याची गैरसोय होणार असून, याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : नैसर्गिक स्त्रोतातही जेमतेम पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाण्याअभावी वन्यप्राण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वनपरिक्षेत्रात वनविभागाच्यावतीने पाणवठे तयार करण्यात आले आहे. मात्र, पानवठ्यात पाणी टाकण्यात आले नसल्याने पानवठे कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी येणाऱ्या काळात पाण्याअभावी वन्यप्राण्याची गैरसोय होणार असून, याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.जिल्ह्यात १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर वनक्षेत्र पसरले आहे. पाणझडी वनक्षेत्र असलेल्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात हरिण, निलगाई, लांडगे, तडस, मोर, रानडूकर, सारस, वानर आदी प्राण्यांची मोठी संख्या आहे. वन्यप्राण्यांना जीवंत राहण्यासाठी खाद्यासह पाणी महत्वाचा घटक असतो. मात्र जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात लाखो रूपये खर्च करून आठही तालुक्यांतील वनपरिक्षेत्रात ठिकठिकाणी २७ सिमेंटचे पानवठे तयार करण्यात आलेले आहेत. परंतु, यावर्षी जिल्ह्यात पाऊस न पडल्याने पाठवडे कोरडे पडले आहे. तर काही पाणवठ्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल इतकेच पाणी आहे. त्यामुळे येणाºया काळात पाण्यासाठी वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागणार आहे. त्यातच पडलेल्या पावसाचे पाण्याचे योग्य नियोजनाअभावी पाणी अडविण्यात आले नाहीत. नैसर्गिक स्त्रोतातील पाणीही एक महिनाभरच पुरेल. परिणामी, पावसाळ््यातच वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागत आहे. मात्र, याकडे वनविभागाचे कायम दुर्लक्ष होत असल्याने वन्यप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे.जालना : वनविभागाने लक्ष देण्याची गरजदिवसेंदिवस वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्याने प्राण्यांची कमतरता जाणवत असल्याने प्राण्याअभावी पर्यावरणावरही परिणाम होत आहे. याकडे वनविभागाने गांर्भीयाने लक्ष देऊन जिल्ह्यातील वनसंपदा जपण्याची मागणी वन्यप्रेमींसह पर्यावरणावाद्यांकडून केली जात आहे.सध्या पाऊस नसल्यामुळे सर्वत्रच पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे वन परिसरातही पाणी नसल्यामुळे वन्य प्राणी शेताकडे पाण्याच्या शोधात जात आहे. परिणामी, हे प्राणी लागवड केल्या पिकाचे नुकसान करत आहे.वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढणारजिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात आतापासूनच पाण्यासाठी प्राण्यांना भटकंती करावी लागत आहे. यामुळे पाण्याच्या शोधात अनेक हिस्त्र प्राणी गावात येण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहेत. यामुळे वनपरिक्षेत्र परिसरात असलेल्या गावांमध्ये नेहमीच भितीचे वातावरण असते. यामुळे पाणवठ्यात पाण्याची सोय करण्याची गरज आहे.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाईforest departmentवनविभाग