शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यातील पाणवठे कोरडेठाक...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:54 IST

पाण्याअभावी वन्यप्राण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वनपरिक्षेत्रात वनविभागाच्यावतीने पाणवठे तयार करण्यात आले आहे. मात्र, पानवठ्यात पाणी टाकण्यात आले नसल्याने पानवठे कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी येणाऱ्या काळात पाण्याअभावी वन्यप्राण्याची गैरसोय होणार असून, याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : नैसर्गिक स्त्रोतातही जेमतेम पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाण्याअभावी वन्यप्राण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वनपरिक्षेत्रात वनविभागाच्यावतीने पाणवठे तयार करण्यात आले आहे. मात्र, पानवठ्यात पाणी टाकण्यात आले नसल्याने पानवठे कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी येणाऱ्या काळात पाण्याअभावी वन्यप्राण्याची गैरसोय होणार असून, याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.जिल्ह्यात १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर वनक्षेत्र पसरले आहे. पाणझडी वनक्षेत्र असलेल्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात हरिण, निलगाई, लांडगे, तडस, मोर, रानडूकर, सारस, वानर आदी प्राण्यांची मोठी संख्या आहे. वन्यप्राण्यांना जीवंत राहण्यासाठी खाद्यासह पाणी महत्वाचा घटक असतो. मात्र जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात लाखो रूपये खर्च करून आठही तालुक्यांतील वनपरिक्षेत्रात ठिकठिकाणी २७ सिमेंटचे पानवठे तयार करण्यात आलेले आहेत. परंतु, यावर्षी जिल्ह्यात पाऊस न पडल्याने पाठवडे कोरडे पडले आहे. तर काही पाणवठ्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल इतकेच पाणी आहे. त्यामुळे येणाºया काळात पाण्यासाठी वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागणार आहे. त्यातच पडलेल्या पावसाचे पाण्याचे योग्य नियोजनाअभावी पाणी अडविण्यात आले नाहीत. नैसर्गिक स्त्रोतातील पाणीही एक महिनाभरच पुरेल. परिणामी, पावसाळ््यातच वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागत आहे. मात्र, याकडे वनविभागाचे कायम दुर्लक्ष होत असल्याने वन्यप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे.जालना : वनविभागाने लक्ष देण्याची गरजदिवसेंदिवस वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्याने प्राण्यांची कमतरता जाणवत असल्याने प्राण्याअभावी पर्यावरणावरही परिणाम होत आहे. याकडे वनविभागाने गांर्भीयाने लक्ष देऊन जिल्ह्यातील वनसंपदा जपण्याची मागणी वन्यप्रेमींसह पर्यावरणावाद्यांकडून केली जात आहे.सध्या पाऊस नसल्यामुळे सर्वत्रच पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे वन परिसरातही पाणी नसल्यामुळे वन्य प्राणी शेताकडे पाण्याच्या शोधात जात आहे. परिणामी, हे प्राणी लागवड केल्या पिकाचे नुकसान करत आहे.वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढणारजिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात आतापासूनच पाण्यासाठी प्राण्यांना भटकंती करावी लागत आहे. यामुळे पाण्याच्या शोधात अनेक हिस्त्र प्राणी गावात येण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहेत. यामुळे वनपरिक्षेत्र परिसरात असलेल्या गावांमध्ये नेहमीच भितीचे वातावरण असते. यामुळे पाणवठ्यात पाण्याची सोय करण्याची गरज आहे.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाईforest departmentवनविभाग