शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यावरील जलसंकट मानवनिर्मित; चोरीच्या पाण्यावर पोसतेय शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:58 IST

शहराचा पिच्छा करणारे जलसंकट हे मानवनिर्मित असल्याचेच वारंवार समोर येतेय.

ठळक मुद्देव्हॉल्व्ह फोडून असंख्य ठिकाणी दरोडा टाकला जात आहे. जलवाहिनीजवळील ११० ते दीडशे एकर शेती पोसली जाते

- संजय देशमुख 

जालना : स्टील आणि सीड्स उद्योगाबरोबर जालन्याचा पाणीप्रश्नही नेहमीच चर्चेत असतो. शहरावासीयांची वाढलेली तहान लक्षात घेऊन २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. पण, शहराचा पिच्छा करणारे जलसंकट हे मानवनिर्मित असल्याचेच वारंवार समोर येतेय. जालन्यासाठी जायकवाडी धरणातून पाणी आणण्यात आले. मात्र, पैठण ते  जालनादरम्यान  अंथरलेल्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह फोडून असंख्य ठिकाणी दरोडा टाकला जात आहे. याच चोरीच्या पाण्यावर जलवाहिनीजवळील ११० ते दीडशे एकर शेती पोसली जात असल्याचे भयावह वास्तव पालिकेच्या पथकाने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. 

जालना शहराला पाणीपुरवठा करणारा निजामकालीन घाणेवाडी तलाव हा वाढत्या लोकसंख्येपुढे अपुरा पडल्यामुळे १९८८ मध्ये जालना पालिकेने शहरागड येथे गोदावरीच्या पात्रात बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यात पुढे पैठण येथील जायकवाडी धरणातून दर महिन्याला काही ठरावीक रक्कम भरून गोदावरीत पाणी सोडण्यात  येते. हे पाणी शहागडला येईपर्यंत भरपूर नासाडी होत होती. तेथून शहागड ते जालना अशी जवळपास ५० किलोमीटरची पाइपलाईन अंथरली. 

शहागड येथील पंपहाऊसद्वारे ते जालन्यापर्यंत आणले जायचे. परंतु या पाइपलाईनलाही परिसरातील शेतकऱ्यांनी भगदाड पाडून शेती फुलवली. तिच गत आता पैठण ते जालना या नव्याने  अंथरण्यात आलेल्या जलवाहिनीचीही झाली आहे. जालना पालिकेने केलेल्या पाहणीत हादरवून टाकणाऱ्या बाबी  समोर आल्या. १८ शेतकऱ्यांनी पाईलाईनवर डल्ला मारत शेती आणि फळबाग फुलवल्या आहेत. सगळीकडे पाण्याचे दुर्भिक्ष असताना पैठण ते पाचोड मार्गावरील शेती मात्र, हिरवीगार आहे. त्याचा शोध घेतल्यानंतर  जलवाहिनीला भगदाड पाडून पाण्याच्या चोरीचा गोरखधंदा उजेडात आला. 

शेतकऱ्यांवर गुन्हे जलवाहिनीचे व्हॉल्व फोडून पाणी चोरी करणाऱ्या सर्व  शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासाठी नगराध्यक्षा  संगीता गोरंट्याल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी पुढाकार घेतला आहे. 

निवडणुकीच्या तयारीत समस्यांकडे दुर्लक्षलोकसभा निवडणुका दारावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे जालना शहर राजकीय हालचालींचे केंद्र बनले आहे. आठ दिवसांच्या अंतराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालन्यात येतात. परंतु पाणी, रस्ते तसेच दुष्काळावर ‘ब्र’ न काढता केवळ राजकीय समीकरणे जुळविताना दिसत आहेत. पुढाऱ्यांच्या ‘चलता है’ वृत्तीमुळे सर्वसामान्यांना जार आणि खासगी टँकर विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. एकूणच जालन्यात केवळ राजकीय फड रंगत असून, त्या फडापासून नागरी समस्या कोसोदूर आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरीwater shortageपाणीटंचाईJalana Muncipalityजालना नगरपरिषदJayakwadi Damजायकवाडी धरण