शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

जालन्यावरील जलसंकट मानवनिर्मित; चोरीच्या पाण्यावर पोसतेय शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:58 IST

शहराचा पिच्छा करणारे जलसंकट हे मानवनिर्मित असल्याचेच वारंवार समोर येतेय.

ठळक मुद्देव्हॉल्व्ह फोडून असंख्य ठिकाणी दरोडा टाकला जात आहे. जलवाहिनीजवळील ११० ते दीडशे एकर शेती पोसली जाते

- संजय देशमुख 

जालना : स्टील आणि सीड्स उद्योगाबरोबर जालन्याचा पाणीप्रश्नही नेहमीच चर्चेत असतो. शहरावासीयांची वाढलेली तहान लक्षात घेऊन २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. पण, शहराचा पिच्छा करणारे जलसंकट हे मानवनिर्मित असल्याचेच वारंवार समोर येतेय. जालन्यासाठी जायकवाडी धरणातून पाणी आणण्यात आले. मात्र, पैठण ते  जालनादरम्यान  अंथरलेल्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह फोडून असंख्य ठिकाणी दरोडा टाकला जात आहे. याच चोरीच्या पाण्यावर जलवाहिनीजवळील ११० ते दीडशे एकर शेती पोसली जात असल्याचे भयावह वास्तव पालिकेच्या पथकाने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. 

जालना शहराला पाणीपुरवठा करणारा निजामकालीन घाणेवाडी तलाव हा वाढत्या लोकसंख्येपुढे अपुरा पडल्यामुळे १९८८ मध्ये जालना पालिकेने शहरागड येथे गोदावरीच्या पात्रात बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यात पुढे पैठण येथील जायकवाडी धरणातून दर महिन्याला काही ठरावीक रक्कम भरून गोदावरीत पाणी सोडण्यात  येते. हे पाणी शहागडला येईपर्यंत भरपूर नासाडी होत होती. तेथून शहागड ते जालना अशी जवळपास ५० किलोमीटरची पाइपलाईन अंथरली. 

शहागड येथील पंपहाऊसद्वारे ते जालन्यापर्यंत आणले जायचे. परंतु या पाइपलाईनलाही परिसरातील शेतकऱ्यांनी भगदाड पाडून शेती फुलवली. तिच गत आता पैठण ते जालना या नव्याने  अंथरण्यात आलेल्या जलवाहिनीचीही झाली आहे. जालना पालिकेने केलेल्या पाहणीत हादरवून टाकणाऱ्या बाबी  समोर आल्या. १८ शेतकऱ्यांनी पाईलाईनवर डल्ला मारत शेती आणि फळबाग फुलवल्या आहेत. सगळीकडे पाण्याचे दुर्भिक्ष असताना पैठण ते पाचोड मार्गावरील शेती मात्र, हिरवीगार आहे. त्याचा शोध घेतल्यानंतर  जलवाहिनीला भगदाड पाडून पाण्याच्या चोरीचा गोरखधंदा उजेडात आला. 

शेतकऱ्यांवर गुन्हे जलवाहिनीचे व्हॉल्व फोडून पाणी चोरी करणाऱ्या सर्व  शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासाठी नगराध्यक्षा  संगीता गोरंट्याल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी पुढाकार घेतला आहे. 

निवडणुकीच्या तयारीत समस्यांकडे दुर्लक्षलोकसभा निवडणुका दारावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे जालना शहर राजकीय हालचालींचे केंद्र बनले आहे. आठ दिवसांच्या अंतराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालन्यात येतात. परंतु पाणी, रस्ते तसेच दुष्काळावर ‘ब्र’ न काढता केवळ राजकीय समीकरणे जुळविताना दिसत आहेत. पुढाऱ्यांच्या ‘चलता है’ वृत्तीमुळे सर्वसामान्यांना जार आणि खासगी टँकर विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. एकूणच जालन्यात केवळ राजकीय फड रंगत असून, त्या फडापासून नागरी समस्या कोसोदूर आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरीwater shortageपाणीटंचाईJalana Muncipalityजालना नगरपरिषदJayakwadi Damजायकवाडी धरण