शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

Jalana: अनुदान अन् पिकविमा तत्काळ द्या; शेतकऱ्यांचे गोदापात्रात जलसमाधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:57 IST

जलसमाधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोदाकाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आले आहेत.

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : अनुदान आणि पीकविमा तत्काळ खात्यात जमा करावे या प्रमुख मागण्यांसाठी अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांनी गोंदी येथील गोदावरी नदीपात्रामध्ये आज सकाळी ११ वाजेपासून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. तत्काळ सर्व मागण्या मान्य करण्याची मागणी करत आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

शेतकऱ्यांना व्हीके नंबर त्वरित द्यावे तसेच केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित अनुदान जमा करावे, मागील वर्षीचा पिकविमा जमा करावा, ज्या शेतकऱ्यांनी सोलरसाठी ऑनलाईन पेमेंट करून रिजेक्ट केले त्यांचे पैसे परत करावे, तसेच जुने मागील सोलर दुरुस्तीच्या सुविधा उपलब्ध करून द्यावी, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कार्यालयात नियमित हजर राहावे, पिकाच्या निकषाप्रमाणे पीक कर्ज वाटप करावे, थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांच्या खत्यावरील होल्ड काढावा, वीज पुरवठा सुरळी करावा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी गोदावरी नदीपात्रात सकाळी ११ वाजेपासून आंदोलन सुरू केले आहे. या पात्रालगत पोलिसांचा बंदोबस्त असून जलसमाधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोदाकाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आले आहेत.

मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बाहेर येणार नाहीआंदोलनात शरद सोळुंके, गजानन उगले,संभाजी मरकड, प्रमोद सोळुंके, अनिल मरकड, पांडुरंग गात, रवी नरवडे, कृष्णा साबळे, शिवम चव्हाण, सचिन चोरमले, लहू बोराडे, शैलेश मरकड, महेंद्र खरात आदी शेतकरी आहेत. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नदीपात्राच्या बाहेर येणार नाही असा पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनJalanaजालना