शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Jalana: धामणा व पद्मावती वगळता जुई, जीवरेखा, बाणेगाव धरणांतील पाणीप्रश्न मिटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 19:43 IST

पाचपैकी तीन प्रकल्पांत पाच टक्क्यांपर्यंत पाणीसाठा वाढला, मात्र दोन प्रकल्प ‘जैसे थे’

जालना : जिल्हाभरात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भोकरदन-जाफराबाद तालुक्यांतील लघु-मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये बाष्पीभवनामुळे या धरणातील पाणीपातळीत मोठी घट झाली होती. परिणामी, मे आणि जून महिन्यात नागरिकांवर पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. कारण, जुई प्रकल्पात १७, तर धामणा २३, पद्मावती २०, बाणेगाव ३७ आणि जीवरेखा धरणात ११ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता; परंतु मे महिन्यात झालेल्या पावसामुळे धामणा आणि पद्मावती वगळता तीन धरणांत १ ते ५ टक्के पाणीसाठा वाढला असून, पाणीटंचाई टळल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई, सेलूद येथील धामणा, राजूर परिसरातील बाणेगाव, पद्मावती येथील पद्मावती आणि जाफराबाद तालुक्यांतील अकोला देव परिसरातील जीवरेखा धरणावर दोन तालुक्यांची मदार आहे. उन्हाळ्यात या धरणातील पाणीसाठ्यात घट झाली होती. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील काही गावांत टँकर सुरू केले होते; परंतु या अवकाळी पावसामुळे धामणा आणि पद्मावती वगळता तीन धरणांत १ ते ५ टक्के पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

जुई धरणाचे भोकरदनसह बारा गावांना पाणीदानापूर परिसरातील जुई धरणात एप्रिल महिन्यात तापमान ४२ अंशावर गेल्याने पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला होता; परंतु मे महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणात केवळ एक टक्के वाढ झाली असून, भोकरदनसह बारा गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे.- किरण कतोरे, मोजणीदार.

धरणातील मे आणि जून महिन्यातील पाणीसाठा टक्केवारीमध्येप्रकल्प गाव मेमधील टक्केवारी जूनची टक्केवारी रिकामेजुई -दानापूर-१७-०१-८२धामणा- शेलूद-२३-२३-७७पद्मावती- पद्मावती-२०-२०-८०जीवरेखा-अकोला देव-११-१७-८३बाणेगाव- बाणेगाव-३६-४०-६०

सध्या पाणीटंचाईचे संकट उद्भवणार नाहीजाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्प हा सर्वांत मोठा मध्यम प्रकल्प आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात धरण कोरडेठाक पडल्याने शेतकऱ्यांनी धरणातून मोठ्या प्रमाणात गाळ काढून नेला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात तीन ते पाच टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या तरी परिसरातील गावांवर पाणीटंचाईचे संकट उद्भवणार नाही.- बी. आर. जगदाळे, मोजणीदार, जीवरेखा धरण.

टॅग्स :JalanaजालनाDamधरणRainपाऊस