शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सगळ्या गावांना दिले, मग आम्हालाच का वगळलं; अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांचा सवाल

By महेश गायकवाड  | Updated: April 3, 2023 17:04 IST

खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक पाण्यात गेले होते.

जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक या महसूल मंडळातील २२ गावांना शासनाने अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळले.  शेतीपिकांचे नुकसान होऊनही सरकार करत असलेल्या अन्यायाच्या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत आपल्या व्यथा मांडल्या. येणाऱ्या सात दिवसांच्या आत अनुदानाच्या यादीत आमचा समावेश करा, नसता आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा उपस्थित शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिला.

खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक पाण्यात गेले होते. वरुड बुद्रुक मंडळात पडलेल्या पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रात चुकीची झाल्याने या महसूल मंडळातील ९ हजार ७८५ बाधित शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे राजकीय हेतू बाजूला ठेवून सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येत तहसील कार्यालयावर नुकसानभरपाईसाठी मोर्चा काढला. शासनाने अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली. या यादीत तालुक्यातील पाच मंडळांपैकी वरुड बुद्रुकचा समावेश करण्यात आला नाही. पर्जन्यमापक यंत्रातील आकडेवारीवरून शासनाने या मंडळातील शेतकऱ्यांना अनुदानातून वगळले. दुसऱ्या मंडळातील शेतकऱ्यांची जमीन वरुड मंडळात असताना त्यांना अनुदान मिळत आहे; मात्र या मंडळातील शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले आहे. ही शासनाच्या यंत्रातील चुकीचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसला आहे.वरुड बुद्रुक मंडळातील अनेक गावे ही डोंगराळ भागाला जोडून असल्याने सततच्या अतिवृष्टीमुळे पिकं वाहून गेली होती. शेतात पाणी साचल्याने शेतातील पिके सडून गेली होती. ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यावर अतिवृष्टीची नाेंद होते. प्रत्यक्षात पीक पाण्याखाली तरी यंत्रात नोंद होत असेल तर त्याच्यात आमचा काय दोष, असा प्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी माजी सभापती रमेश गव्हाड, मयूर बोर्डे, गजानन लोखंडे, एल. बी. शिंदे, मंगेश गव्हाड, राजेंद्र सोनवणे, गजानन शिंदे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसJalanaजालनाagricultureशेती