शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भोकरदनला पुन्हा बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:57 IST

पावसामुळे भोकरदन तालुक्यातील रायघोळ, केळणा नदीला पूर आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात मंगळवारी रात्री व बुधवारी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे भोकरदन तालुक्यातील रायघोळ, केळणा नदीलापूर आला होता. धामणा प्रकल्पाच्या क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने नदीपात्राचे पाणी शेतशिवारात शिरले आहे. हा प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने धामणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.मागील काही दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास शहरासह परिसरात काही काळ मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात १०.८२ मिमी पाऊस झाला. यात जालना तालुक्यात ५.७५ मिमी, बदनापूर ०.८० मिमी, भोकरदन २.६३ मिमी, जाफराबाद (निरंक), परतूर १७.६० मिमी, मंठा २.५० मिमी, अंबड ३४ मिमी तर घनसावंगी तालुक्यात २३.२९ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मिमी असून, आजवर ४१५.७८ मिमी पावसाची नोंद प्रशासन दप्तरी झाली आहे.परतूर तालुका व परिसरात समाधानकारक पाऊस झाला. वालसावंगी, आष्टी, ढोणवाडी, आसनगाव, को. हादगाव, वाहेगावसह परिसरात पावसाने हजेरी लावली. भोकरदन तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. वालसावंगी परिसरात बुधवारी दुपारपर्यंत पाऊस झाला. येथील कवरलाल कोठारी यांच्या एका कापड दुकानाच्या गोडाऊनमध्ये पाणी घुसल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. आव्हाना परिसरातील शेतशिवारात पाणी घुसल्याने उडीद, मूग इ. पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्याच्या उत्तर भागातील जळगाव सपकाळ परिसरात पाऊस झाला. यामुळे धामणा धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणाखालील नदीपात्राच्या काठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पारध येथून वाहणाऱ्या रायघोळ नदीला पूर आला होता. गणेश नगर परिसरात पाणी घुसल्याने नागरिकांची गैरसोय झाली. याशिवाय जालना शहरासह तालुक्यातील उटवद व परिसरातही बुधवारी पाऊस झाला. घनसावंगी भागातील रांजणी परिसरातही पावसाने हजेरी लावली.धावडा : पावसाने दमदार हजेरी लावल्याने धावडा शिवारातील नदी-नाले तुडूंब वाहिले. गावातील मुख्य रस्त्यावर, चौका-चौकात पाणी साचले होते. गावच्या शिवारातील नदीच्या पुराचे पाणी मारूती मंदिरापर्यंत आले होते. यामुळे धावडा गाव व समतानगर भागाचा ८ तास संपर्क तुटला होता.सुदैवाने पाऊस थांबल्याने मोठे नुकसान टळले. तर खारोनी नदीला आलेल्या पुरामुळे अजिंठा, धावडा ते बुलडाणा संपर्क तुटला होता. शेतशिवारात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.भोकरदन : अनेक गावांचा संपर्क तुटलाभोकरदन : तालुक्यातील केळना नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पुलावरील पाण्यात गेलले दोघेजण वाहून जाता-जाता बालंबाल बचावले. पुलावरून पाणी आल्याने वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती.या पुरामुळे आलापूर, गोकुळ प्रल्हादपूर वाडी आदी गावाचा संपर्क तुटला होता. नदीचे पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.वालसावंगी शाळेला सुटीवालसावंगी : वालसावंगी परिसरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. गावापासून एक किलोमीटर अंतरावर शाळा असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गावापर्यंत नेऊन सोडले. यासाठी अनिल बोराडे, सुभाष गवळी, विजय पाटील, सपकाळ, चव्हाण यांच्यासह पालक नारायण हिवाळे, सतीश तेलंग्रे, राम म्हस्के, समाधान वैद्य यांनी मोठे परिश्रम घेतले.

टॅग्स :Rainपाऊसriverनदीfloodपूरweatherहवामान