शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

भोकरदनला पुन्हा बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:57 IST

पावसामुळे भोकरदन तालुक्यातील रायघोळ, केळणा नदीला पूर आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात मंगळवारी रात्री व बुधवारी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे भोकरदन तालुक्यातील रायघोळ, केळणा नदीलापूर आला होता. धामणा प्रकल्पाच्या क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने नदीपात्राचे पाणी शेतशिवारात शिरले आहे. हा प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने धामणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.मागील काही दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास शहरासह परिसरात काही काळ मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात १०.८२ मिमी पाऊस झाला. यात जालना तालुक्यात ५.७५ मिमी, बदनापूर ०.८० मिमी, भोकरदन २.६३ मिमी, जाफराबाद (निरंक), परतूर १७.६० मिमी, मंठा २.५० मिमी, अंबड ३४ मिमी तर घनसावंगी तालुक्यात २३.२९ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मिमी असून, आजवर ४१५.७८ मिमी पावसाची नोंद प्रशासन दप्तरी झाली आहे.परतूर तालुका व परिसरात समाधानकारक पाऊस झाला. वालसावंगी, आष्टी, ढोणवाडी, आसनगाव, को. हादगाव, वाहेगावसह परिसरात पावसाने हजेरी लावली. भोकरदन तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. वालसावंगी परिसरात बुधवारी दुपारपर्यंत पाऊस झाला. येथील कवरलाल कोठारी यांच्या एका कापड दुकानाच्या गोडाऊनमध्ये पाणी घुसल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. आव्हाना परिसरातील शेतशिवारात पाणी घुसल्याने उडीद, मूग इ. पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्याच्या उत्तर भागातील जळगाव सपकाळ परिसरात पाऊस झाला. यामुळे धामणा धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणाखालील नदीपात्राच्या काठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पारध येथून वाहणाऱ्या रायघोळ नदीला पूर आला होता. गणेश नगर परिसरात पाणी घुसल्याने नागरिकांची गैरसोय झाली. याशिवाय जालना शहरासह तालुक्यातील उटवद व परिसरातही बुधवारी पाऊस झाला. घनसावंगी भागातील रांजणी परिसरातही पावसाने हजेरी लावली.धावडा : पावसाने दमदार हजेरी लावल्याने धावडा शिवारातील नदी-नाले तुडूंब वाहिले. गावातील मुख्य रस्त्यावर, चौका-चौकात पाणी साचले होते. गावच्या शिवारातील नदीच्या पुराचे पाणी मारूती मंदिरापर्यंत आले होते. यामुळे धावडा गाव व समतानगर भागाचा ८ तास संपर्क तुटला होता.सुदैवाने पाऊस थांबल्याने मोठे नुकसान टळले. तर खारोनी नदीला आलेल्या पुरामुळे अजिंठा, धावडा ते बुलडाणा संपर्क तुटला होता. शेतशिवारात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.भोकरदन : अनेक गावांचा संपर्क तुटलाभोकरदन : तालुक्यातील केळना नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पुलावरील पाण्यात गेलले दोघेजण वाहून जाता-जाता बालंबाल बचावले. पुलावरून पाणी आल्याने वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती.या पुरामुळे आलापूर, गोकुळ प्रल्हादपूर वाडी आदी गावाचा संपर्क तुटला होता. नदीचे पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.वालसावंगी शाळेला सुटीवालसावंगी : वालसावंगी परिसरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. गावापासून एक किलोमीटर अंतरावर शाळा असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गावापर्यंत नेऊन सोडले. यासाठी अनिल बोराडे, सुभाष गवळी, विजय पाटील, सपकाळ, चव्हाण यांच्यासह पालक नारायण हिवाळे, सतीश तेलंग्रे, राम म्हस्के, समाधान वैद्य यांनी मोठे परिश्रम घेतले.

टॅग्स :Rainपाऊसriverनदीfloodपूरweatherहवामान