शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट करिअर करणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:42 AM

केवळ डॉक्टर, इंजिनिअर केले म्हणजेच करिअर चांगले झाले, असे नाही. विद्यार्थ्यांनी त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यात झोकून देऊन परिश्रम केल्यास त्यातून ते यशस्वी नागरिक होऊ शकतात, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केवळ डॉक्टर, इंजिनिअर केले म्हणजेच करिअर चांगले झाले, असे नाही. विद्यार्थ्यांनी त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यात झोकून देऊन परिश्रम केल्यास त्यातून ते यशस्वी नागरिक होऊ शकतात, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी यांनी केले.त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी येथील जेईएस महाविद्यालयात जालना एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले केले होते. यावेळी जेइएस संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना धर्माधिकारी म्हणाले की, देवाने प्रत्येकाला बुध्दी ही समान दिली आहे. त्या बुध्दीचा तो कसा वापर करतो हे महत्वाचे ठरते.जीवनात यशस्वी होण्यासाठी युवकांनी ध्येय निश्चित करून, त्या मार्गाने मार्गक्रमण करण्याचा सल्ला त्यांनी दिला. आजच्या स्पर्धेच्या युगात सीईटी परीक्षेला महत्व दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याची तयारी केली पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होता येते. मात्र अधिकारी झाल्यावर त्याचा अहंकार बाळगू नये, तसेच गैरमार्गाने पैसा कमावणे हे उद्दिष्ट ठेवू नये असे ते म्हणाले. यश आणि अपयश हे जीवनात पदोपदी येत असते. त्यामुळे अपयश आल्यास खचून न जाता, हिंमतीने त्याला समारे जाण्याचे धाडस ठेवावे असे ते म्हणाले. भारतीय संस्कृती ही उच्च दर्जाची असल्याचे सांगून आईस्टाईन या शास्त्रज्ञाने देखील भगवद्गीतेचा अभ्यास केल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन सुरेश केसापूरकर यांनी केले.

टॅग्स :educationशैक्षणिकexamपरीक्षा