शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

आठ रूपयांपासून ते शंभर रूपयांपर्यंत विमा शेतकऱ्यांच्या हाती; पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 7:55 PM

काही शेतकऱ्यांच्या नावे अपेक्षित तर काहींना एक, आठ, शंभर, दोनशे, पाचशे, हजार रूपयांची तुटपुंजी रक्कम जमा होत असल्याचे उघडकीस आले आहे. 

- प्रकाश मिरगे

जाफराबाद (जालना ) : येथील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे निसर्गाच्या लहरीपणापासून संरक्षण व्हावे, म्हणून शंभर रूपयांपासून ते हजारो रूपयांपर्यंत पीक विम्याचा भरणा केला. त्यानूसार नूकसान भरपाई म्हणून बँकामध्ये पीक विम्याची रक्कम वाटप करण्यात येत आहे.  परंतु काही शेतकऱ्यांच्या नावे अपेक्षित तर काहींना एक, आठ, शंभर, दोनशे, पाचशे, हजार रूपयांची रक्कम जमा होत असल्याचे उघडकीस आले आहे. 

शेतकऱ्यांनी दिवसभर रांगेत उभे राहून पीक विम्याचा भरणा केला. भरणा केलेल्या रकमेपेक्षा किमान दोन पट रक्कम मिळणे आवश्यक असताना  ती रक्कम मिळत नसल्याने विमाधारक शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे. पीक विम्याच्या नावाखाली बँकांनी जवळपास ५६ हजार शेतकऱ्यांचा पीक विमा जमा केला. 

हिवराबळी येथील भाऊराव किसान लोखंडे यांनी चारशे आठ रूपयांचा विमा भरला. परंतु त्यांना फक्त आठ रूपयाचा विमा मिळाला. नळविहारा येथील भारत मोरे या शेतकऱ्यांनी पीक विमा म्हणून ६७७ रूपये भरले. त्यांच्याही खात्यात आठ रूपये जमा झाले.तसेच शरद मोरे यांनी ११८४ रूपयांचा विमा भरला त्यांच्या खात्यातर २०० रूपये जमा झाले. 

शेतकऱ्यांच्या बँकेत चकरा आठ, दहा, शंभर, दोनशे, पाचशे रूपये  बँकेच्या खात्यात जमा होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. विमा रक्कम कमी आली, याचा शोध घेण्यासाठी शेतकरी बँकेकडे चकरा मारत आहे. मात्र बँक अधिकारी शेतकऱ्यांना काहीच सांगत नसल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांना  विमा कंपनीकडून देण्यात येणाऱ्या विमा संरक्षण रकमेचा जाफराबाद तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना फटका बसला आहे.  

बँकांना आकड्यांचा ताळमेळ लागेनाजिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयकृत बँकेने शेतकऱ्यांचा किती पीकविमा स्वीकारला यांच्या आकड्यांचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याचा नेमका फायदा किती होणार याची आकडेवारी कुठेच मिळत नाही. जूनच्या पहिल्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करा अशा सूचना शासनाच्या वतीने बँकांना देण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही बँकांनी रक्कम जमा केली नाही. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र