शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्टोबरच्या नुकसानीची पाहणी मार्चमध्ये; विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अक्कल गहाण ठेवू नये, कृषिमंत्री दादा भुसे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 13:17 IST

अनेक मुद्यांवरून कृषिमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

जालना : गोपीनाथ मुंडे अपघात विमा, मार्च महिन्यात ऑक्टोबर महिन्यात शेडनेटचे नुकसान झाल्याची तक्रार आल्यावर त्याची पाहणी मार्च महिन्यात करणे यासह अन्य मुद्यांवरून कृषिमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करतांना तो पूर्ण गाळप केला जाईल, असे नियोजन शासन स्तरावरून केले जात असल्याची माहिती कृषिमंत्री भुसे यांनी शुक्रवारी येथे आयोजित आढावा बैठकीत दिली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हा परिषदेचे सीईओ मनूज जिंदल, वरिष्ठ कृषी अधिकारी डी. एल. जाधव, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, विस्तार अधिकारी भीमराव रणदिवे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थित होती.

या बैठकीत तीनही जिल्ह्यांतील खरिपाचे क्षेत्र, पर्जन्यमान, लागणारे बियाणे, खते यांचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, या बैठकीत गोपीनाथ मुंडे अपघात विम्याचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहेत. यावरून भुसे जाम चिडले होते. त्यांनी बैठकीतच विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना उठवून चांगलीच कानउघाडणी केली. तसेच अक्कल गहाण ठेवून कामे न करण्याच्या सूचना दिल्याने बैठकीत एकच खळबळ उडाली. यासह बदनापूर तालुक्यातील एका महिलेने शेडनेट बाबत दिलेल्या तक्रारीवरूनही अधिकाऱ्यांना खडसावले. तसेच संबंधितांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाईचे निर्देश दिले.

शिल्लक उसाचे नियोजनयावेळी शिल्लक उसाचे नियोजन केले असून, शेतकऱ्यांनी धीर न सोडण्याचे आवाहन त्यांनी केले. जालन्यातील सीड्स पार्कचा प्रस्ताव मार्गी लागणार असल्याचे सांगून कापूस, सोयाबीनच्या क्लस्टरसाठी एक हजार कोटींची तरतूद आहे. त्याची अंमलबजावणी या खरीप हंगामापासून केली जाईल, असे सांगितले. ओवा, तुळस आदी पिकांकडेही शेतकरी आता वळत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. हिंगोली जिल्ह्यातील हळद प्रकल्पासह औरंगाबाद जिल्ह्यातील पंतप्रधान अन्न सुरक्षा योजनेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :agricultureशेतीJalanaजालनाFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा