शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

ऑक्टोबरच्या नुकसानीची पाहणी मार्चमध्ये; विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अक्कल गहाण ठेवू नये, कृषिमंत्री दादा भुसे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 13:17 IST

अनेक मुद्यांवरून कृषिमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

जालना : गोपीनाथ मुंडे अपघात विमा, मार्च महिन्यात ऑक्टोबर महिन्यात शेडनेटचे नुकसान झाल्याची तक्रार आल्यावर त्याची पाहणी मार्च महिन्यात करणे यासह अन्य मुद्यांवरून कृषिमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करतांना तो पूर्ण गाळप केला जाईल, असे नियोजन शासन स्तरावरून केले जात असल्याची माहिती कृषिमंत्री भुसे यांनी शुक्रवारी येथे आयोजित आढावा बैठकीत दिली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हा परिषदेचे सीईओ मनूज जिंदल, वरिष्ठ कृषी अधिकारी डी. एल. जाधव, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, विस्तार अधिकारी भीमराव रणदिवे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थित होती.

या बैठकीत तीनही जिल्ह्यांतील खरिपाचे क्षेत्र, पर्जन्यमान, लागणारे बियाणे, खते यांचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, या बैठकीत गोपीनाथ मुंडे अपघात विम्याचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहेत. यावरून भुसे जाम चिडले होते. त्यांनी बैठकीतच विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना उठवून चांगलीच कानउघाडणी केली. तसेच अक्कल गहाण ठेवून कामे न करण्याच्या सूचना दिल्याने बैठकीत एकच खळबळ उडाली. यासह बदनापूर तालुक्यातील एका महिलेने शेडनेट बाबत दिलेल्या तक्रारीवरूनही अधिकाऱ्यांना खडसावले. तसेच संबंधितांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाईचे निर्देश दिले.

शिल्लक उसाचे नियोजनयावेळी शिल्लक उसाचे नियोजन केले असून, शेतकऱ्यांनी धीर न सोडण्याचे आवाहन त्यांनी केले. जालन्यातील सीड्स पार्कचा प्रस्ताव मार्गी लागणार असल्याचे सांगून कापूस, सोयाबीनच्या क्लस्टरसाठी एक हजार कोटींची तरतूद आहे. त्याची अंमलबजावणी या खरीप हंगामापासून केली जाईल, असे सांगितले. ओवा, तुळस आदी पिकांकडेही शेतकरी आता वळत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. हिंगोली जिल्ह्यातील हळद प्रकल्पासह औरंगाबाद जिल्ह्यातील पंतप्रधान अन्न सुरक्षा योजनेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :agricultureशेतीJalanaजालनाFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा