शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धोकादायक वर्गखोल्यांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:42 IST

जिल्हा परिषद शाळांमधील धोकादायक, मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या आणि पाणीटंचाईचा प्रश्न स्थायी समितीच्या सभेत चांगलाच गाजला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषद शाळांमधील धोकादायक, मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या आणि पाणीटंचाईचा प्रश्न स्थायी समितीच्या सभेत चांगलाच गाजला. स्थायी समिती सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर यांनी तातडीने वर्गखोल्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. तर बंद करण्यात आलेल्या टँकरचा मुद्दाही अनेकांनी उचलून धरीत ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी केली.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी क्षिरसागर, सभापती जिजाबाई कळंबे यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पंधराशे शाळा आहे. त्यापैकी ३७५ शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक झाल्या आहे. त्यातील ७०४ वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहे. अशा वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यावे, असा प्रश्न जयमंगल जाधव यांनी उपस्थित केला.एकीकडे राज्य सरकार जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे प्रशासन शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. मागील पंधरा दिवसांपासून वर्तमान पत्रांमध्ये वर्गखोल्या संदर्भात बातम्या येत आहे. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. सध्या जिल्ह्यात १००८ वर्गखोल्यांची गरज आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी जयमंगल जाधव यांनी केली.यावर उत्तर देताना अध्यक्ष अनिरुध्द खोतकर म्हणाले, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वर्गखोल्या संदर्भात विचारले होते. त्यांनी मोडकळीस आलेल्या सर्व वर्गखोल्यांचे प्रस्ताव तयार करण्याबाबत सांगितले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने येत्या आठ दिवसांमध्ये वर्गखोल्यांचे प्रस्ताव तयार करावे, असे आदेश त्यांनी दिले. तसेच जिल्ह्यात अंगणवाड्यांची गरज आहे. यासाठी आपण अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे गेले होतो. तेव्हा त्यांनी अंगणवाड्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे सांगितल्याचे खोतकर म्हणाले. तसेच पाऊस समाधानकारक नसतानाही टँकर बंद करण्यात आले आहेत. गावा-गावातील पाणीटंचाई पाहता टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी उपस्थित सदस्यांनी यावेळी केली. या सभेला स्थायी समितीचे सदस्य, सर्व विभागाचे प्रमुख व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदSchoolशाळाwater shortageपाणीटंचाई