शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

धोकादायक वर्गखोल्यांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:42 IST

जिल्हा परिषद शाळांमधील धोकादायक, मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या आणि पाणीटंचाईचा प्रश्न स्थायी समितीच्या सभेत चांगलाच गाजला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषद शाळांमधील धोकादायक, मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या आणि पाणीटंचाईचा प्रश्न स्थायी समितीच्या सभेत चांगलाच गाजला. स्थायी समिती सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर यांनी तातडीने वर्गखोल्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. तर बंद करण्यात आलेल्या टँकरचा मुद्दाही अनेकांनी उचलून धरीत ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी केली.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी क्षिरसागर, सभापती जिजाबाई कळंबे यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पंधराशे शाळा आहे. त्यापैकी ३७५ शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक झाल्या आहे. त्यातील ७०४ वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहे. अशा वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यावे, असा प्रश्न जयमंगल जाधव यांनी उपस्थित केला.एकीकडे राज्य सरकार जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे प्रशासन शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. मागील पंधरा दिवसांपासून वर्तमान पत्रांमध्ये वर्गखोल्या संदर्भात बातम्या येत आहे. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. सध्या जिल्ह्यात १००८ वर्गखोल्यांची गरज आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी जयमंगल जाधव यांनी केली.यावर उत्तर देताना अध्यक्ष अनिरुध्द खोतकर म्हणाले, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वर्गखोल्या संदर्भात विचारले होते. त्यांनी मोडकळीस आलेल्या सर्व वर्गखोल्यांचे प्रस्ताव तयार करण्याबाबत सांगितले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने येत्या आठ दिवसांमध्ये वर्गखोल्यांचे प्रस्ताव तयार करावे, असे आदेश त्यांनी दिले. तसेच जिल्ह्यात अंगणवाड्यांची गरज आहे. यासाठी आपण अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे गेले होतो. तेव्हा त्यांनी अंगणवाड्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे सांगितल्याचे खोतकर म्हणाले. तसेच पाऊस समाधानकारक नसतानाही टँकर बंद करण्यात आले आहेत. गावा-गावातील पाणीटंचाई पाहता टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी उपस्थित सदस्यांनी यावेळी केली. या सभेला स्थायी समितीचे सदस्य, सर्व विभागाचे प्रमुख व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदSchoolशाळाwater shortageपाणीटंचाई