शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

फौजदार होता होता राहिलो म्हणून खासदार झालो; रावसाहेब दानवेंनी सांगितला भन्नाट किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 17:24 IST

नोकरीसाठी वशीला लावणाऱ्यांना रावसाहेब दानवेंनी सांगितला स्वत:चा किस्सा

- दिलीप सारडाबदनापूर ( जालना) : खासगी तसेच सरकारी नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर मुलाखतीच्या आधीच अनेकजण पुढाऱ्यांकडे वशिला लावण्यासाठी जातात. सन १९७७ साली पोलीस दलात निघालेल्या भरतीत मी फॉर्म भरला होता. त्याला कॉल आल्यावर मीसुद्धा तेव्हाचे खासदार पुंडलिकराव दानवे यांच्याकडे जाऊन गृहमंत्र्यांना फोन लावून वशिला लावण्याची मागणी केली होती. तेव्हा पुंडलिकराव दानवे यांनी तू आमदार, खासदार व्हावं. फौजदार कसला होतोस, असे म्हणाले होते. पुढे नियतीचा काय खेळ झाला आणि आमदार, खासदार झालो. कोणाच्या बोलण्याने काय होईल हे सांगता येत नाही, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बदनापूर येथील रोजगार मेळाव्यात आपल्या वशिल्याचा किस्सा युवकांना सांगितला. 

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, देशात नोकरीची कमी नाही. पण कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेकजण परीक्षा व मुलाखतीची तयारी न करता फॉर्म भरला की पुढाऱ्याकडे जातात. मी प्रथम गावचा सरपंच झालो व नंतर आमदार, खासदार आणि आता मंत्री असा चढत चढत वरपर्यंत गेलो. त्यामुळे संयम ठेवा. मेहनत करा असा सल्लाही रावसाहेब दानवे यांनी युवकांना दिला. जिथे नोकरी कराल ती नोकरी इमानदारीने करा. नोकरी मिळत नसेल तर कर्ज घेऊन व्यवसाय करा. कर्ज फेडा नसता शेती उत्तम पर्याय आहे. पण शेतीवरचा भार कमी करण्यासाठी तुम्ही रोजगारासाठी घराबाहेर पडा, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. 

या वेळी आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, भाऊसाहेब घुगे, बद्रीनाथ पठाडे, वसंत जगताप, जगन्नाथ बारगजे, हरिश्चंद्र शिंदे, देविदास कुचे, शीतल कुचे, प्राचार्या भगुरे, उपनगराध्यक्ष शेख समीर, नगरसेवक सत्यनारायण गेल्डा, पद्माकर जऱ्हाड, विलास जऱ्हाड, प्रदीप साबळे, भगवान मात्रे, अनिल कोलते, राजेंद्र तापडिया, निवृत्ती डाके, शेख युनूस, सुधीर पवार यांची उपस्थित होती.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेJalanaजालनाPoliceपोलिस