शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सावरगाव, सोनदेव येथील शेतमजूर कुटुंबावर आस्मानी संकटाचा घाला; दोन्ही गावावर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:26 IST

शेतमजुरांनी पावसापासून बचावासाठी झाडाचा आधार घेतला. मात्र, विजेच्या रूपात आस्मानी संकट कोसळले आणि सावरगाव भागडे, सेवली येथील तिघा शेतमजुरांचा मृत्यू झाला.

सुभाष शेटे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेवली : शेतातील सोयाबीनची कापणी सुरू असताना अचानक विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला. शेतमजुरांनी पावसापासून बचावासाठी झाडाचा आधार घेतला. मात्र, विजेच्या रूपात आस्मानी संकट कोसळले आणि सावरगाव भागडे, सेवली येथील तिघा शेतमजुरांचा मृत्यू झाला. या घटनेने दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे.गयाबाई गजानन नाईकनवरे (३८ रा. सावरगाव भागडे), मंदाबाई नागोराव चाफले (४३), संदीप शंकर पवार (३५ दोघे रा. सेवली ता. जि. जालना) अशी मयतांची नावे आहेत. नाईकनवरे यांच्या शेतात रविवारी दुपारी ही घटना घडली. दुष्काळामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे शेतमजूर मिळेल तेथे कामाला जाऊन मजुरी करीत होते. मात्र, रविवारी नियतीने घाला घातला आणि कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचे प्राण गेले. सावरगाव भागडे येथील गयाबाई नाईकनवरे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तर संदीप पवार यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, वडील असा परिवार आहे. पवार यांचा मुलगा मंगेशही या घटनेत गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर मयत मंदाबाई चाफले यांच्या पश्चात दोन मुलं आहेत.घटनेनंतर सेवली प्राथमिक आरोग्य केंद्रात मयताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. मयतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, सेवली येथील मयत मंदाबाई चाफले यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, तालुक्यातील माळ सोनदेव शिवारातही वीज पडली. या घटनेत मंगल बद्रीनाथ पालवे (२३), शबानाबी शेख गुलाब (३०) व सुहाना शेख (१६) या तीन महिला मजूर जखमी झाल्या. मंगल पालवे, शबानाबी शेख यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर सुहाना शेख यांना उपचारासाठी सिंदखेडराजा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा रूग्णालयात उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी दिली.

टॅग्स :RainपाऊसDeathमृत्यू