शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

सावरगाव, सोनदेव येथील शेतमजूर कुटुंबावर आस्मानी संकटाचा घाला; दोन्ही गावावर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:26 IST

शेतमजुरांनी पावसापासून बचावासाठी झाडाचा आधार घेतला. मात्र, विजेच्या रूपात आस्मानी संकट कोसळले आणि सावरगाव भागडे, सेवली येथील तिघा शेतमजुरांचा मृत्यू झाला.

सुभाष शेटे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेवली : शेतातील सोयाबीनची कापणी सुरू असताना अचानक विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला. शेतमजुरांनी पावसापासून बचावासाठी झाडाचा आधार घेतला. मात्र, विजेच्या रूपात आस्मानी संकट कोसळले आणि सावरगाव भागडे, सेवली येथील तिघा शेतमजुरांचा मृत्यू झाला. या घटनेने दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे.गयाबाई गजानन नाईकनवरे (३८ रा. सावरगाव भागडे), मंदाबाई नागोराव चाफले (४३), संदीप शंकर पवार (३५ दोघे रा. सेवली ता. जि. जालना) अशी मयतांची नावे आहेत. नाईकनवरे यांच्या शेतात रविवारी दुपारी ही घटना घडली. दुष्काळामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे शेतमजूर मिळेल तेथे कामाला जाऊन मजुरी करीत होते. मात्र, रविवारी नियतीने घाला घातला आणि कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचे प्राण गेले. सावरगाव भागडे येथील गयाबाई नाईकनवरे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तर संदीप पवार यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, वडील असा परिवार आहे. पवार यांचा मुलगा मंगेशही या घटनेत गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर मयत मंदाबाई चाफले यांच्या पश्चात दोन मुलं आहेत.घटनेनंतर सेवली प्राथमिक आरोग्य केंद्रात मयताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. मयतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, सेवली येथील मयत मंदाबाई चाफले यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, तालुक्यातील माळ सोनदेव शिवारातही वीज पडली. या घटनेत मंगल बद्रीनाथ पालवे (२३), शबानाबी शेख गुलाब (३०) व सुहाना शेख (१६) या तीन महिला मजूर जखमी झाल्या. मंगल पालवे, शबानाबी शेख यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर सुहाना शेख यांना उपचारासाठी सिंदखेडराजा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा रूग्णालयात उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी दिली.

टॅग्स :RainपाऊसDeathमृत्यू