शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

‘समृद्धी’वर बेफिकिरी ठरतेय घातक; काळजी घ्या, महामार्गावर १७ दिवसांत ५६ वाहनांना अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 05:29 IST

वाहनचालकांची ही बेफिकिरीच अपघातांना निमंत्रण देणारी ठरते आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क   

जालना : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे राज्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. परंतु, टकाटक असलेल्या या महामार्गावर काही वाहनचालक वेगमर्यादेपेक्षाही वेगाने वाहने चालवत आहेत. वाहनचालकांची ही बेफिकिरीच अपघातांना निमंत्रण देणारी ठरते आहे.   

समृद्धीवर गेल्या १७ दिवसांमध्येच ५६ वाहनांना अपघात झाला असून, दोन ठार तर २७ जखमी झाले आहेत.  दोन ठिकाणी वाहनांना आगीही लागल्या. शिवाय, १० वाहनांचे टायर फुटले. ७५ घटनांमध्ये वन्यप्राण्यांना दुखापत झाली असून ४० पेक्षा अधिक जनावरे जखमी, तर ३५ पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे, असे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.     

या वाहनांचे सर्वाधिक अपघात 

समृद्धी महामार्गावर गेल्या १७ दिवसांत ५६ अपघात झाले. यात सर्वाधिक अपघात हे कारचे होते. त्यानंतर कुलझर, ट्रक, आयशर आदी वाहनांचे अपघात झाले आहेत.   

कशामुळे होतात अपघात 

- वेगमर्यादेचे उल्लंघन - अचानक वन्यप्राणी समोर आल्याने - वाहनाचे टायर फुटणे - चालकाला झोप लागणे

या महामार्गावर १२० पर्यंत वेग

महामार्गावर १२० पर्यंत वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे; परंतु, लोक अतिवेगाने वाहने चालवतात. त्यामुळे समृद्धी महामार्गाने वाहने चालविताना वाहनधारकांनी वेगमर्यादेचे पालन करावे, असे आवाहन महामार्गाचे स.पो.नि. अभय बी. दंडगव्हाळ यांनी केले आहे. अपघातातील जखमींना तत्काळ मदत मिळावी, यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी टोल फ्री क्रमांकाचे फलक आहेत. वाहनधारकांनी १८००२३३२२३३ व ८१८१८१८१५५ यावर कॉल केला तर काही मिनिटांत मदत मिळते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात