शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

‘समृद्धी’वर बेफिकिरी ठरतेय घातक; काळजी घ्या, महामार्गावर १७ दिवसांत ५६ वाहनांना अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 05:29 IST

वाहनचालकांची ही बेफिकिरीच अपघातांना निमंत्रण देणारी ठरते आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क   

जालना : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे राज्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. परंतु, टकाटक असलेल्या या महामार्गावर काही वाहनचालक वेगमर्यादेपेक्षाही वेगाने वाहने चालवत आहेत. वाहनचालकांची ही बेफिकिरीच अपघातांना निमंत्रण देणारी ठरते आहे.   

समृद्धीवर गेल्या १७ दिवसांमध्येच ५६ वाहनांना अपघात झाला असून, दोन ठार तर २७ जखमी झाले आहेत.  दोन ठिकाणी वाहनांना आगीही लागल्या. शिवाय, १० वाहनांचे टायर फुटले. ७५ घटनांमध्ये वन्यप्राण्यांना दुखापत झाली असून ४० पेक्षा अधिक जनावरे जखमी, तर ३५ पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे, असे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.     

या वाहनांचे सर्वाधिक अपघात 

समृद्धी महामार्गावर गेल्या १७ दिवसांत ५६ अपघात झाले. यात सर्वाधिक अपघात हे कारचे होते. त्यानंतर कुलझर, ट्रक, आयशर आदी वाहनांचे अपघात झाले आहेत.   

कशामुळे होतात अपघात 

- वेगमर्यादेचे उल्लंघन - अचानक वन्यप्राणी समोर आल्याने - वाहनाचे टायर फुटणे - चालकाला झोप लागणे

या महामार्गावर १२० पर्यंत वेग

महामार्गावर १२० पर्यंत वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे; परंतु, लोक अतिवेगाने वाहने चालवतात. त्यामुळे समृद्धी महामार्गाने वाहने चालविताना वाहनधारकांनी वेगमर्यादेचे पालन करावे, असे आवाहन महामार्गाचे स.पो.नि. अभय बी. दंडगव्हाळ यांनी केले आहे. अपघातातील जखमींना तत्काळ मदत मिळावी, यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी टोल फ्री क्रमांकाचे फलक आहेत. वाहनधारकांनी १८००२३३२२३३ व ८१८१८१८१५५ यावर कॉल केला तर काही मिनिटांत मदत मिळते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात