शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’वर बेफिकिरी ठरतेय घातक; काळजी घ्या, महामार्गावर १७ दिवसांत ५६ वाहनांना अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 05:29 IST

वाहनचालकांची ही बेफिकिरीच अपघातांना निमंत्रण देणारी ठरते आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क   

जालना : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे राज्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. परंतु, टकाटक असलेल्या या महामार्गावर काही वाहनचालक वेगमर्यादेपेक्षाही वेगाने वाहने चालवत आहेत. वाहनचालकांची ही बेफिकिरीच अपघातांना निमंत्रण देणारी ठरते आहे.   

समृद्धीवर गेल्या १७ दिवसांमध्येच ५६ वाहनांना अपघात झाला असून, दोन ठार तर २७ जखमी झाले आहेत.  दोन ठिकाणी वाहनांना आगीही लागल्या. शिवाय, १० वाहनांचे टायर फुटले. ७५ घटनांमध्ये वन्यप्राण्यांना दुखापत झाली असून ४० पेक्षा अधिक जनावरे जखमी, तर ३५ पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे, असे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.     

या वाहनांचे सर्वाधिक अपघात 

समृद्धी महामार्गावर गेल्या १७ दिवसांत ५६ अपघात झाले. यात सर्वाधिक अपघात हे कारचे होते. त्यानंतर कुलझर, ट्रक, आयशर आदी वाहनांचे अपघात झाले आहेत.   

कशामुळे होतात अपघात 

- वेगमर्यादेचे उल्लंघन - अचानक वन्यप्राणी समोर आल्याने - वाहनाचे टायर फुटणे - चालकाला झोप लागणे

या महामार्गावर १२० पर्यंत वेग

महामार्गावर १२० पर्यंत वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे; परंतु, लोक अतिवेगाने वाहने चालवतात. त्यामुळे समृद्धी महामार्गाने वाहने चालविताना वाहनधारकांनी वेगमर्यादेचे पालन करावे, असे आवाहन महामार्गाचे स.पो.नि. अभय बी. दंडगव्हाळ यांनी केले आहे. अपघातातील जखमींना तत्काळ मदत मिळावी, यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी टोल फ्री क्रमांकाचे फलक आहेत. वाहनधारकांनी १८००२३३२२३३ व ८१८१८१८१५५ यावर कॉल केला तर काही मिनिटांत मदत मिळते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात