शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह

By विजय मुंडे  | Updated: May 8, 2024 21:58 IST

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले

विजय मुंडे, जालना: एकीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार करणारी इंडिया आघाडी आहे. तर दुसरीकडे २३ वर्षांपासून एकही सुटी न घेता भारतमातेची सेवा करणारे नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्यावर २५ पैशांच्या भ्रष्टाचाराचा आरोप कोणी लावू शकत नाही. आमच्याकडे नेता, नीती आणि पुढील २५ वर्षांतील देशाच्या विकासाचा कार्यक्रम तयार आहे. विरोधकांकडे ना नेता आहे, ना नीती आहे, असा हल्लाबोल भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर केला.

महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ बुधवारी रात्री जालना येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कऱ्हाड, पालकमंत्री अतुल सावे, हरिभाऊ बागडे, अजित गोपछडे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

"नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित, समृद्ध बनविले असून, जगभरात देशाचा सन्मान वाढविला आहे. काँग्रेसच्या काळात राममंदिराचा प्रश्न अनेक वर्षांपासून तसाच होता. मोदी यांनी पाच वर्षांतच केस जिंकली. भूमिपूजन केले आणि २२ जानेवारीस प्राणप्रतिष्ठापना केली. इंदिरा गांधी या गरिबी हटाओचा नारा देऊन गेल्या. कोण्या काँग्रेसी नेत्याने ते वचन पूर्ण केले नाही. परंतु, ८० कोटी जनतेचा जीवनस्तर वाढविण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केल्याचेही ते म्हणाले. इंडिया आघाडीची सत्ता असताना महाराष्ट्राला केवळ १ लाख ९१ हजार कोटी रुपये दिले होते. परंतु, मोदी सरकार आले आणि फडणवीस मुख्यमंत्री बनले. १० वर्षांत मोदीजी यांनी ९ लाख ८० हजार कोटी रुपये दिले. राज्याला आणि देशाला केवळ नरेंद्र मोदी पुढे नेऊ शकतात. त्यामुळे आपण भाजपच्या, नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पाकिस्तानचा अजेंडा काँग्रेस पक्ष देशात वाढवतोय!

पाकिस्तान राहुल गांधींवर खूश आहे. मोदीजी सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक करतात. नक्षलवादी, आतंकवाद्यांना मारतात. सीएए आणतात आणि राहुल गांधी या सर्व बाबींना विरोध करतात. पाकिस्तानचा अजेंडा भारत देशात कोण वाढवत असेल तर ते राहुल गांधी यांची काँग्रेस पार्टी वाढवितेय, असा घणाघाती आरोपही अमित शाह यांनी केला. 

...तर जालन्याला सर्वच क्षेत्रांत टॉपवर नेऊ

जालन्याचे स्टील राज्याची, देशाची शान आहे. ड्रायपोर्टमुळे येथील स्टील जगभरात जाणार आहे. दोनवेळा आमदार, पाचवेळा खासदार राहून रावसाहेब दानवे यांनी जालन्याचा विकास केला आहे. आपण सहाव्यावेळा दानवे यांना खासदार केले तर ते खूप मोठे होतील. नरेंद्र मोदी जालन्याला सर्व क्षेत्रांत टॉपवर आणण्याचे काम करतील, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.

मराठवाडा दुष्काळमुक्त करू : देवेंद्र फडणवीस

या निवडणुकीत रावसाहेब दानवे सर्व रेकॉर्ड मोडून विजयी होतील. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राज्याचे चित्र बदलण्याचे काम होत आहे. समृद्धी महामार्गामुळे जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्रातील उद्योगाचे मॅग्नेट होतील, असा विश्वास होता आणि तो आज खरा होताना दिसत आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पश्चिमी वाहिन्यांचे वाहून जाणारे पाणी आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करू. वॉटरग्रीड, रस्त्यांचे जाळे उभे करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यासाठी रावसाहेब दानवे आणि भाजपसोबत मतदारांनी राहावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Amit Shahअमित शाहjalna-pcजालनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसraosaheb danveरावसाहेब दानवेbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४