शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
6
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
7
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
8
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
9
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
10
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
11
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
12
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
13
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
14
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
15
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
16
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
17
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
18
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
19
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
20
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...

पालिकेची वाढीव कर आकारणी; पाच दिवस चालणार तक्रारींची सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:35 IST

जालना पालिकेने गेल्यावर्षी मालमत्ताकर आणि पाणीपट्टीत मोठी वाढ केली आहे. ही वाढ मंजूर नसणाऱ्या जवळपास अडीच हजार नागरिकांनी या कर वाढीवर आक्षेप घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना पालिकेने गेल्यावर्षी मालमत्ताकर आणि पाणीपट्टीत मोठी वाढ केली आहे. ही वाढ मंजूर नसणाऱ्या जवळपास अडीच हजार नागरिकांनी या कर वाढीवर आक्षेप घेतले होते. या आक्षेपांची एक सुनावणी यापूर्वीच झाली. परंतु त्यातून काही हाती आले नाही. त्यामुळे आता दुसऱ्यांदा यावर सुनावणी घेऊन नागरिकांचे म्हणणे जाणून घेऊन त्यावर निर्णय अपेक्षित आहे.जालना पालिकेने गेल्यावर्षी मालमत्ताकर तसेच पाणीपट्टीत मोठी वाढ केली होती. ही वाढ करतांना पालिकेने एका खासगी कंपनीकडून जालन्यातील मालमत्ता कराचे सर्वेक्षण करून घेतले होते. त्या एजंसीने दिलेल्या आधारावर कारपेट एरिया निश्चित करून हा वाढीव कर जालन्यातील नागरिकांना लागू केला होता. यात साधारपणे दोन हजार ८०० रूपये मालमत्ता कर तस एक हजार ५०० ते एक हजार ८०० रूपये अशी पाणीपट्टीची आकारणी केली आहे. या दोन्ही वाढीवर नागरिकांनी तीव्र आक्षेप घेत सुनावणी घेण्याची मागणी जिल्हाधिका-यांकडे केली होती. गेल्यावर्षी निवडणुका असल्याने हा मुद्दा शिवसेनेने मोठ्या प्रमाणावर उचलूनही धरला होता. परंतु आता शिवसेना राज्याच्या सत्तेत असल्याने आता त्यांची या महत्वाच्या प्रकरणात कुठली भूमिका राहते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जालना पालिकेला हक्काचा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजेच शहरातील मालमत्ता करासह पाणीपट्टीतून येणारा महसूल हाच असतो. पालिकेला विकास कामे करण्यासाठी विविविध योजनांव्दारे निधी मिळत असतो. परंतु जो रोखीने मिळणारा निधी असतो तो या दोन्हींच्या कर आकारणीतूनच उपलब्ध होतो. ज्या खासगी एजंजीकडून हे सर्वेक्षण करून घेण्यात आाले, त्यांनी अनेकांचे सर्वेक्षण चुकीचे केल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे आक्षेप दाखल केलेल्या नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. दरम्यान सत्ताधा-यांकडून या करवाढीचे समर्थन केले जात आहे. ही करवाढ दहा ते बारा वर्षानंतर करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.जालना शहरातील वाढीव मालमत्ता तसेच पाणीपट्टीत जी वाढ केली होती. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतले. परंतु ज्या नागरिकांनी आक्षेप घेतले नाहीत, अशांचे यात नुकसान झाले आहे. त्यातील अनेकांनी वाढीव कर पालिकेकडे भरला आहे.दरम्यान सोमवारपासून सुरू होणा-या या सुनावणीसाठी जिल्हाधिकाºयांचे प्रतिनिधी म्हणून जालन्याचे उपविभागीय अधिकारी केशव नेटके, विशेष अधिकारी म्हणून नगररचना विभागाचे औरंगाबाद येथील वरिष्ठ अधिकारी खरवडकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतींचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदTaxकर