शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

जालन्यात शिवसेनेचा बाण ‘कमळा’वर ताणलेलाच ! खोतकरांनी पुन्हा दानवेंवर साधला निशाणा

By विजय मुंडे  | Updated: March 29, 2024 19:38 IST

रावसाहेब दानवेंकडून शिवसैनिकांना सन्मानाची अपेक्षा !

जालना : महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या गोटातून मान-सन्मानावरून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यात वरिष्ठ स्तरावर काही जागांवर एकमत होत नसल्याने शिवसेनेची यादीही जाहीर होत नाहीत. त्यामुळे नेत्यांमध्येही खदखद आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका केली. याचवेळी त्यांनी भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या वागणुकीवरच थेट नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोट बांधली जावी, यासाठी काही दिवसांपूर्वी एकत्रित मेळावा घेण्यात आला. त्यानंतर मात्र विविध कार्यक्रमांत भाजपकडून मानसन्मान मिळत नसल्याची खंत शिवसैनिकांनी खोतकर यांच्याकडे व्यक्त केली होती. शिवसैनिकांना मान मिळत नसेल तर आपणही कार्यक्रमास जाणार नाही, अशी भूमिका घेत ‘नाराजी योग्य ठिकाणी व्यक्त केल्याचे’ संकेत खोतकरांनी दिले होते. परंतु, तद्नंतरही शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नसल्याचे दिसून येते. एकीकडे जिल्ह्यात भाजप- सेना कार्यकर्त्यांचे मनोमिलन दिसत नसताना दुसरीकडे राज्यात काही जागांचा तिढा आहे. शिवसेनेच्या जागांवर भाजपाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर खोतकरांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात शिवसैनिकांना सन्मान मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तरी आम्ही आमच्या बाजूने शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो. परंतु, त्यांच्या बोलण्या, वागण्यात बदल होत नाही, असे म्हणत दानवे यांच्याकडे बोट केले. असे असले तरी आम्ही शंभर टक्के महायुतीचे काम करणार असल्याचेही खोतकर यांनी सांगितले.

मागील लोकसभा निवडणुकीत होता तणाव यंदा तर महायुती...मागील लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणुकीत उतरण्याची तयारी केली होती. खोतकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपासून शिवसेनेच्या नेत्यांनाही प्रयत्न करावे लागले होते. वरिष्ठांनी मनधरणी केल्यानंतर खोतकर यांनी माघार घेतली होती. यंदाच्या निवडणुकीत महायुती असताना सन्मान मिळत नसल्याने शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे शिवसैनिकांची नाराजी भाजप कशी दूर करणार ? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

शिवसैनिकांनी फिरविली कार्यक्रमांकडे पाठभाजपकडून सन्मान मिळत नसल्याची तक्रार करीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही भाजपकडून होणाऱ्या कार्यक्रमांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. भाजपकडून निवडणुकीची तयारी सुरू असली तरी शिवसेनेच्या गोटात मात्र नाराजीचा सूर असल्याने लोकसभा निवडणुकीबाबत शांतताच दिसत आहे.

टॅग्स :Jalanaजालनाraosaheb danveरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा