शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ॲड. आंबेडकर- जरांगे यांची भेट अन् जालन्यात महायुती-आघाडीत चलबिचल !

By विजय मुंडे  | Updated: March 28, 2024 19:30 IST

जरांगेंच्या भूमिकेकडे नजरा; माविआची चर्चा संपेना अन् उमेदवारही ठरेना

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मध्यरात्री भेट घेऊन लोकसभा निवडणुकीवर चर्चा केली. या चर्चेच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी ॲड. आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी थेट उमेदवारही जाहीर केले आहेत. जरांगेंशी चर्चा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वंचितचे उमेदवार जाहीर झाल्याने जिल्ह्यातील महायुती, माविआच्या गोटातही चलबिचल वाढली आहे. थेट होणारी लढत आता तिरंगी होणार की काय, अशी चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून, भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते शहरी, ग्रामीण भागात कामाला लागले आहेत. या निवडणुकीवर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका परिणाम करणार यावर आचारसंहिता लागू होण्यापूर्वीपासूनच अंदाज वर्तविले जात होते. त्यात माविआकडून कोणत्या पक्षाला जालन्याची जागा सुटणार आणि उमेदवार कोण राहणार हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यात आता जरांगे पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत प्रत्येक मतदारसंघात अपक्ष उमेदवार देणे आणि सर्व जाती-धर्मातील उमेदवारांना संधी देण्याबाबत चर्चा केली. याबाबत गावा-गावांत बैठका घेऊन तेथील निर्णय आल्यानंतर ३० मार्च रोजी निर्णय जाहीर करू अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. 

३० तारखेपर्यंत आमचा कोणालाही पाठिंबा नाही : जरांगे पाटीलआपण सर्व सूत्रे समाजाच्या हाती दिली आहेत. त्यामुळे समाजाच्या बैठकीतून जो निर्णय पुढे येईल, त्यानुसार आपण ३० तारखेला भूमिका स्पष्ट करणार आहोत. तोपर्यंत आपण कोणालाही पाठिंबा नाही आणि कोणताही उमेदवार नाही. आमच्या आंदोलनाला हलक्यात घेण्याची चूक केली. परंतु, आता निवडणुकीत आम्हाला हलक्यात घेण्याची चूक करू नका, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४