शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

...तर बँकेतील पैसे राहणार नाहीत, प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 18:57 IST

सरकार हे झिंगलेल्या लोकांसारखे निर्णय घेत असून, रिझर्व्ह बँकेच्या पैशावरही त्यांनी डोळा ठेवला आहे. त्यामुळे हे सरकार पुन्हा आले तर तुमचे बँकेतील पैसे गेले म्हणून समजा

जालना - सरकार हे झिंगलेल्या लोकांसारखे निर्णय घेत असून, रिझर्व्ह बँकेच्या पैशावरही त्यांनी डोळा ठेवला. सरकारने बँकेतील एक लाखावरील डिपॉझिटची हमी नाकारली आहे. त्यामुळे हे सरकार पुन्हा आले तर तुमचे बँकेतील पैसे गेले म्हणून समजा, अशी बोचरी टिका, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकावर केली. बेराजगारी, मंदी, आरक्षणासह इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी चळवळीतून आलेल्या लोकांच्या हती सत्ता हावी आणि म्हणूनच आपण वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उभा केल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.जालना शहरातील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात शुक्रवारी दुपारी आयोजित बलुतेदार- अलुतेदार सत्ता संपादन निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला. यावेळी आंबेडकर यांनी केंद्र, राज्य सरकारवर टिकेची झोड उठविली. सरकारने औद्योगिकीकरण करताना बलुतेदार-आलुतेदारांचा विचार केला गेला नाही. त्यामुळे आज अनेकांचे व्यवसाय मोडीत निघाले असून, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. संशोधकांनी स्वत:च्या नावाऐवजी बलुतेदार- आलुतेदारांच्या कलेचा विकास व्हावा, यासाठी संशोधन करावे. तसे झाले प्रत्येकाच्या हाताला काम मिळून बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. देशात टाटा, अंबानी हे नवे सावकार झाले असून, सत्तेत कोणाला बसवायचे हे ते निर्णय घेत आहेत. ही परिस्थिती केवळ बलुतेदार, अलुतेदार, कारागिरांची सत्ता बदलू शकते.कलम ३०७ चा गवगवा करणा-या शासनाने हा निर्णय घेत पाकव्याप्त काश्मिर पाकिस्तानला दान केल्याचा आरोप करीत पाकव्याप्त काश्मिर मिळविण्याचे माध्यम सरकारने कापून टाकल्याचे ते म्हणाले. आपण सत्तेत आल्यानंतर जातीची जनजणना करणे, सरकारी बढतीत आरक्षण लागू करणे, केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण मोफत देणे आदी विविध योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव गोविंद दळवे, भिमराव दळे, जिल्हाध्यक्ष दीपक डोके यांच्यासह विविध बारा बलुतेदार, आलुतेदारांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले.‘त्या’ टाळीची किंमत कापूस उत्पादक भरणारभाजपावाले आपला टीआरपी वाढविण्यासाठी मोदींनी ट्रम्प यांना टाळी दिल्याचे सांगत प्रचार करीत आहेत. मात्र, अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षानंतर अमेरिकेतील कापूस भारतात विकण्यासाठी ती टाळी होती. ४ हजार रूपये क्विंटलने अमेरिकेचा जिनिंगचा कापूस भारतात आला आहे. त्यामुळे शासनाने कापसाला साडेपाच हजार रूपये क्विंटल दर दिला असला तरी व्यापारी कमी किंमतीत कापूस खरेदी करणार असून, ट्रम्प यांच्या ‘त्या’ टाळीची किंमत देशातील कापूस उत्पादकांना भरावी लागणार असल्याचे आंबेडकर म्हणाले.पाणी वाटपाची मांडणी लवकरचमहाराष्ट्रात पाणी कमी नाही. मात्र, पाणी वाटपाचे योग्य नियोजन झालेले नाही. मराठवाडा हा सतत दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. ओल्या भागातील पाणी मराठवाड्यात वळविणे गरजेचे आहे. तसे झाले तर दुष्काळ कायमचा मार्गी लागणार असून, पाणी वाटपाची मांडणी आपण लवकरच करणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले.तर जलील यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावीबाळासाहेब आंबेडकर यांनी डोक्यावर हात ठेवल्याने एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार झाले. जागा आपल्यामुळेच आली असे वाटत असेल तर इम्तियाज जलील यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, असे खुले आव्हान वंचित बहुजन आघाडीचे डॉ. शरदचंद्र वानखेडे यांनी यावेळी दिले. गणेश विसर्जनानंतर आता केंद्र, राज्य सरकारला विसर्जित करण्याची वेळ आली असून, समाजातील सर्व घटकांनी वंचितच्या पाठीशी रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBanking Sectorबँकिंग क्षेत्रBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी