शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

Maharashtra Vidhan Sabha 2019 : सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 15:40 IST

शरद पवार यांची जालना येथे कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा 

ठळक मुद्देलोकांचे अश्रु पुसण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे महाजनादेश यात्रेत मग्न सोडून गेलेल्या नेत्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल

जालना : कर्जाचा बोजा सहन होत नसल्याने राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे सरकार उद्योग धार्जिणे असून असंवेदनशील आहे. या सरकारला आगामी निवडणुकीत जनतेने धडा शिकवावा. आमची सत्ता आल्यास सरसकट कर्जमाफी देऊ, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली. 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, कोल्हापुर, सांगली, गडचिरोली भागात पुराने थैमान घातले होते. त्यामुळे सामान्य माणूस अडचणीत सापडला होता. अशाही स्थितीत त्या भागात जाऊन लोकांचे अश्रु पुसण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे महाजनादेश यात्रेत मग्न होते. त्यावेळी किल्लारी येथे पहाटे चार वाजता भुकंप झाला होता. त्यावेळी आपण मुख्यमंत्री असताना सकाळी सात वाजता तेथे पोहोचून मदत कार्याला गती दिल्याचे पवार म्हणाले. 

सरकारचा गडकिल्ल्यांचा पर्यटन स्थळात रुपांतर करण्याचा निर्णय हास्यंपद आहे. या किल्ल्यांमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य इतिहास रचला होता. तेथे हे सरकार छमछम.. संस्कृती रुजू पाहत आहेत. ही खेदाची बाब असल्याचे ते म्हणाले.  केंद्र आणि राज्य सरकार उद्योजकांचे ८६ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी का ? करत नाही. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल, असेही ते म्हणाले. एकूणच सर्व आघाड्यांवर हे सरकार अपयशी असून, तरुणांना रोजगाराची संधीही उपलब्ध करुन देत नाही. केवळ फसव्या घोषणा करुन लोकांची दिशाभूल करत असल्याने आगामी निवडणुकीत सरकारला खाली खेचण्याचे आवाहन त्यांनी केले. विरोधी पक्ष नेते धनजंय मुंढे यांनीही सरकारवर चौफेर टिका करत सरकारचे धेय धोरण हे शेतकरी आणि तरुणांच्या हिताचे नसल्याचे ते म्हणाले. यावेळी आ. राजेश टोपे यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalanaजालनाFarmerशेतकरीagricultureशेती