शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

Maharashtra Vidhan Sabha 2019 : सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 15:40 IST

शरद पवार यांची जालना येथे कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा 

ठळक मुद्देलोकांचे अश्रु पुसण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे महाजनादेश यात्रेत मग्न सोडून गेलेल्या नेत्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल

जालना : कर्जाचा बोजा सहन होत नसल्याने राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे सरकार उद्योग धार्जिणे असून असंवेदनशील आहे. या सरकारला आगामी निवडणुकीत जनतेने धडा शिकवावा. आमची सत्ता आल्यास सरसकट कर्जमाफी देऊ, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली. 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, कोल्हापुर, सांगली, गडचिरोली भागात पुराने थैमान घातले होते. त्यामुळे सामान्य माणूस अडचणीत सापडला होता. अशाही स्थितीत त्या भागात जाऊन लोकांचे अश्रु पुसण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे महाजनादेश यात्रेत मग्न होते. त्यावेळी किल्लारी येथे पहाटे चार वाजता भुकंप झाला होता. त्यावेळी आपण मुख्यमंत्री असताना सकाळी सात वाजता तेथे पोहोचून मदत कार्याला गती दिल्याचे पवार म्हणाले. 

सरकारचा गडकिल्ल्यांचा पर्यटन स्थळात रुपांतर करण्याचा निर्णय हास्यंपद आहे. या किल्ल्यांमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य इतिहास रचला होता. तेथे हे सरकार छमछम.. संस्कृती रुजू पाहत आहेत. ही खेदाची बाब असल्याचे ते म्हणाले.  केंद्र आणि राज्य सरकार उद्योजकांचे ८६ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी का ? करत नाही. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल, असेही ते म्हणाले. एकूणच सर्व आघाड्यांवर हे सरकार अपयशी असून, तरुणांना रोजगाराची संधीही उपलब्ध करुन देत नाही. केवळ फसव्या घोषणा करुन लोकांची दिशाभूल करत असल्याने आगामी निवडणुकीत सरकारला खाली खेचण्याचे आवाहन त्यांनी केले. विरोधी पक्ष नेते धनजंय मुंढे यांनीही सरकारवर चौफेर टिका करत सरकारचे धेय धोरण हे शेतकरी आणि तरुणांच्या हिताचे नसल्याचे ते म्हणाले. यावेळी आ. राजेश टोपे यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalanaजालनाFarmerशेतकरीagricultureशेती