शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Vidhan Sabha 2019 : सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 15:40 IST

शरद पवार यांची जालना येथे कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा 

ठळक मुद्देलोकांचे अश्रु पुसण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे महाजनादेश यात्रेत मग्न सोडून गेलेल्या नेत्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल

जालना : कर्जाचा बोजा सहन होत नसल्याने राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे सरकार उद्योग धार्जिणे असून असंवेदनशील आहे. या सरकारला आगामी निवडणुकीत जनतेने धडा शिकवावा. आमची सत्ता आल्यास सरसकट कर्जमाफी देऊ, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली. 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, कोल्हापुर, सांगली, गडचिरोली भागात पुराने थैमान घातले होते. त्यामुळे सामान्य माणूस अडचणीत सापडला होता. अशाही स्थितीत त्या भागात जाऊन लोकांचे अश्रु पुसण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे महाजनादेश यात्रेत मग्न होते. त्यावेळी किल्लारी येथे पहाटे चार वाजता भुकंप झाला होता. त्यावेळी आपण मुख्यमंत्री असताना सकाळी सात वाजता तेथे पोहोचून मदत कार्याला गती दिल्याचे पवार म्हणाले. 

सरकारचा गडकिल्ल्यांचा पर्यटन स्थळात रुपांतर करण्याचा निर्णय हास्यंपद आहे. या किल्ल्यांमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य इतिहास रचला होता. तेथे हे सरकार छमछम.. संस्कृती रुजू पाहत आहेत. ही खेदाची बाब असल्याचे ते म्हणाले.  केंद्र आणि राज्य सरकार उद्योजकांचे ८६ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी का ? करत नाही. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल, असेही ते म्हणाले. एकूणच सर्व आघाड्यांवर हे सरकार अपयशी असून, तरुणांना रोजगाराची संधीही उपलब्ध करुन देत नाही. केवळ फसव्या घोषणा करुन लोकांची दिशाभूल करत असल्याने आगामी निवडणुकीत सरकारला खाली खेचण्याचे आवाहन त्यांनी केले. विरोधी पक्ष नेते धनजंय मुंढे यांनीही सरकारवर चौफेर टिका करत सरकारचे धेय धोरण हे शेतकरी आणि तरुणांच्या हिताचे नसल्याचे ते म्हणाले. यावेळी आ. राजेश टोपे यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalanaजालनाFarmerशेतकरीagricultureशेती