शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

औरंगाबाद-पुणे महामार्ग 'समृद्धी'स जोडल्यास विदर्भ-मराठवाड्याला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 14:21 IST

आज घडीला औरंगाबाद ते पुणे तसेच नागपूर ते पुणे आणि नांदेड ते पुणे असे जवळपास दररोज २५ हजारपेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात.

जालना : केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद ते पुणे या नवीन दहा हजार कोटींच्या रस्त्याची घोषणा केली आहे. ती स्वागतार्ह आहे; परंतु हा महामार्ग जालन्यातील समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज पॉइंटला जोडल्यास त्याचा लाभ विदर्भासह मराठवाड्यातील जनतेस होईल, अशी मागणी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी नितीन गडकरींकडे केली आहे.

गडकरी हे नुकतेच औरंगाबाद दौऱ्यावर आले असताना त्यांनी औरंगाबाद ते पुणे या नवीन महामार्गाची घोषणा केली. हा महामार्ग नॅशनल हायवे ॲथोरटी ऑफ इंडियाकडून करण्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यानुसार या महामार्गासाठी दहा हजार कोटी रुपये लागणार असून, हा मार्ग पूर्ण झाल्यास औरंगाबाद ते पुणे हे अंतर केवळ दीड ते दाेन तासांत कापता येणे शक्य होणार असल्याचेही गडकरींनी सांगितले. आज घडीला औरंगाबाद ते पुणे तसेच नागपूर ते पुणे आणि नांदेड ते पुणे असे जवळपास दररोज २५ हजारपेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात. त्यामुळे भविष्याचा विचार करता गडकरींची यातून दूरदृष्टीच दिसून येते. परंतु, त्यांनी केवळ हा मार्ग औरंगाबाद ते पुणे असा प्रस्तावित केला आहे. तोच मार्ग जालन्यातील स्व. बाळासाहेब ठाकरे महामार्ग अर्थात समृद्धी महार्गाच्या जालन्यातील इंटरचेंज पाँईटला जोडल्यास तो अधिक लाभदायी होऊन नागरिकांना दिलासा मिळून त्यांच्या वेळेची बचत होईल, असेही खोतकरांनी गडकरींना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मेट्रोही जालन्यापर्यंत आणावीस्मार्टसिटी अंतर्गत शेंद्रा ते वाळूज हा मेट्रोमार्ग प्रस्तावित केला असून, त्याचे भूमिपूजनही झाले आहे. जालना हेदेखील एक औद्योगिक शहर असून, येथून मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात होते. तसेच मेट्रो जालन्यापर्यंत झाल्यास त्याचा मोठा लाभ प्रवाशांना होऊन इंधनाची मोठी बचत होण्यासह कमी खर्चात औरंगाबादला जालन्याहून जाता येईल. त्या दृष्टीनेही विचार होणे गरजेच असल्याचे खोतकर म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAurangabadऔरंगाबादArjun Khotkarअर्जुन खोतकरJalanaजालना