शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

औरंगाबाद-पुणे महामार्ग 'समृद्धी'स जोडल्यास विदर्भ-मराठवाड्याला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 14:21 IST

आज घडीला औरंगाबाद ते पुणे तसेच नागपूर ते पुणे आणि नांदेड ते पुणे असे जवळपास दररोज २५ हजारपेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात.

जालना : केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद ते पुणे या नवीन दहा हजार कोटींच्या रस्त्याची घोषणा केली आहे. ती स्वागतार्ह आहे; परंतु हा महामार्ग जालन्यातील समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज पॉइंटला जोडल्यास त्याचा लाभ विदर्भासह मराठवाड्यातील जनतेस होईल, अशी मागणी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी नितीन गडकरींकडे केली आहे.

गडकरी हे नुकतेच औरंगाबाद दौऱ्यावर आले असताना त्यांनी औरंगाबाद ते पुणे या नवीन महामार्गाची घोषणा केली. हा महामार्ग नॅशनल हायवे ॲथोरटी ऑफ इंडियाकडून करण्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यानुसार या महामार्गासाठी दहा हजार कोटी रुपये लागणार असून, हा मार्ग पूर्ण झाल्यास औरंगाबाद ते पुणे हे अंतर केवळ दीड ते दाेन तासांत कापता येणे शक्य होणार असल्याचेही गडकरींनी सांगितले. आज घडीला औरंगाबाद ते पुणे तसेच नागपूर ते पुणे आणि नांदेड ते पुणे असे जवळपास दररोज २५ हजारपेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात. त्यामुळे भविष्याचा विचार करता गडकरींची यातून दूरदृष्टीच दिसून येते. परंतु, त्यांनी केवळ हा मार्ग औरंगाबाद ते पुणे असा प्रस्तावित केला आहे. तोच मार्ग जालन्यातील स्व. बाळासाहेब ठाकरे महामार्ग अर्थात समृद्धी महार्गाच्या जालन्यातील इंटरचेंज पाँईटला जोडल्यास तो अधिक लाभदायी होऊन नागरिकांना दिलासा मिळून त्यांच्या वेळेची बचत होईल, असेही खोतकरांनी गडकरींना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मेट्रोही जालन्यापर्यंत आणावीस्मार्टसिटी अंतर्गत शेंद्रा ते वाळूज हा मेट्रोमार्ग प्रस्तावित केला असून, त्याचे भूमिपूजनही झाले आहे. जालना हेदेखील एक औद्योगिक शहर असून, येथून मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात होते. तसेच मेट्रो जालन्यापर्यंत झाल्यास त्याचा मोठा लाभ प्रवाशांना होऊन इंधनाची मोठी बचत होण्यासह कमी खर्चात औरंगाबादला जालन्याहून जाता येईल. त्या दृष्टीनेही विचार होणे गरजेच असल्याचे खोतकर म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAurangabadऔरंगाबादArjun Khotkarअर्जुन खोतकरJalanaजालना