शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

औरंगाबाद-पुणे महामार्ग 'समृद्धी'स जोडल्यास विदर्भ-मराठवाड्याला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 14:21 IST

आज घडीला औरंगाबाद ते पुणे तसेच नागपूर ते पुणे आणि नांदेड ते पुणे असे जवळपास दररोज २५ हजारपेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात.

जालना : केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद ते पुणे या नवीन दहा हजार कोटींच्या रस्त्याची घोषणा केली आहे. ती स्वागतार्ह आहे; परंतु हा महामार्ग जालन्यातील समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज पॉइंटला जोडल्यास त्याचा लाभ विदर्भासह मराठवाड्यातील जनतेस होईल, अशी मागणी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी नितीन गडकरींकडे केली आहे.

गडकरी हे नुकतेच औरंगाबाद दौऱ्यावर आले असताना त्यांनी औरंगाबाद ते पुणे या नवीन महामार्गाची घोषणा केली. हा महामार्ग नॅशनल हायवे ॲथोरटी ऑफ इंडियाकडून करण्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यानुसार या महामार्गासाठी दहा हजार कोटी रुपये लागणार असून, हा मार्ग पूर्ण झाल्यास औरंगाबाद ते पुणे हे अंतर केवळ दीड ते दाेन तासांत कापता येणे शक्य होणार असल्याचेही गडकरींनी सांगितले. आज घडीला औरंगाबाद ते पुणे तसेच नागपूर ते पुणे आणि नांदेड ते पुणे असे जवळपास दररोज २५ हजारपेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात. त्यामुळे भविष्याचा विचार करता गडकरींची यातून दूरदृष्टीच दिसून येते. परंतु, त्यांनी केवळ हा मार्ग औरंगाबाद ते पुणे असा प्रस्तावित केला आहे. तोच मार्ग जालन्यातील स्व. बाळासाहेब ठाकरे महामार्ग अर्थात समृद्धी महार्गाच्या जालन्यातील इंटरचेंज पाँईटला जोडल्यास तो अधिक लाभदायी होऊन नागरिकांना दिलासा मिळून त्यांच्या वेळेची बचत होईल, असेही खोतकरांनी गडकरींना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मेट्रोही जालन्यापर्यंत आणावीस्मार्टसिटी अंतर्गत शेंद्रा ते वाळूज हा मेट्रोमार्ग प्रस्तावित केला असून, त्याचे भूमिपूजनही झाले आहे. जालना हेदेखील एक औद्योगिक शहर असून, येथून मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात होते. तसेच मेट्रो जालन्यापर्यंत झाल्यास त्याचा मोठा लाभ प्रवाशांना होऊन इंधनाची मोठी बचत होण्यासह कमी खर्चात औरंगाबादला जालन्याहून जाता येईल. त्या दृष्टीनेही विचार होणे गरजेच असल्याचे खोतकर म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAurangabadऔरंगाबादArjun Khotkarअर्जुन खोतकरJalanaजालना