शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:24 AM

उष्णतेमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा न करता पशुंना होणारे आजार, त्रास यावर लक्ष ठेवून उपचार करावे, जर कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई करण्यात येईल, अशा इशारा जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी अधिका-यांना दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, मुक्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू शकते. जर पाणी मिळाले तर ते दूषित असण्याची शक्यता असते. तसेच उष्णतेमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा न करता पशुंना होणारे आजार, त्रास यावर लक्ष ठेवून उपचार करावे, जर कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई करण्यात येईल, अशा इशारा जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी अधिका-यांना दिला.गुरुवारी अध्यक्ष खोतकर यांनी जिल्ह्यातील पशुधनविकास अधिकारी, सहाय्यक पशुधन अधिकारी व पशुनधन पर्यवेक्षकांची बैठक घेतली. याप्रसंगी त्यांनी अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले.जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तीव्र पाणीटंचाई भासत असून, जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. जर पाणी मिळाले तर ते दूषित असते. तसेच उष्णतेमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असल्याने पशुधनविकास अधिकारी, सहायक पशुधन अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांनी कोणताही निष्काळजीपणा न करता पशुंना होणारे आजार व त्रास यावर लक्ष ठेवून उपचार करावेत. दुष्काळी परिस्थितीच्या काळात अधिका-यांनी दिवसभर दवाखान्यातच राहावे. अधिकारी दवाखान्यात उपलब्ध नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी खोतकर म्हणाले.दुष्काळी परिस्थिती जनावरांना पाणी, चाराटंचाई भासू नये, तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिका-यांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने भरारी पथक नेमण्यात येणार आहे. या काळात जर अधिका-यांनी कामात निष्काळजीपणा केल्यास त्या अधिका-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदHealthआरोग्य