शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

समितीत जाणार नाही, दोन पावलं मागं येवू, पण...; जरांगे पाटील यांचा सरकारला थेट सवाल

By विजय मुंडे  | Updated: September 12, 2023 02:04 IST

...त्यामुळे मी द्विधामनावस्थेत आहे. मंगळवारी दुपारी बैठक घेवून, मी निर्णय कळवितो, अशी माहिती अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी दिली.

जालना : मी कोणाला दबत नाही. मी माझ्या समाजाला दबतो. सरकारच्या म्हणण्यानुसार मी दोन पावले मागं येतो. परंतु, त्यांना वेळ कशाला हवा? आम्हाला टिकणारे आरक्षण मिळणार का? ते सांगावे. माझं गाव भावनिक झालं आहे. महिला रडतायत. ते माझ्या काळजाला लागतेय. त्यामुळे मी द्विधामनावस्थेत आहे. मंगळवारी दुपारी बैठक घेवून, मी निर्णय कळवितो, अशी माहिती अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी दिली. मुंबईत सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर ते सोमवारी रात्री पत्रकारांसोबत बोलत होते. सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले असतील आणि अधिकाऱ्यांना निलंबीत केले असेल तर त्यांच्या निर्णयाचे स्वागत. शासकीय समिती मी आणि माझे सहकारी शासकीय समितीत जाणार नाहीत. आमच्या वतीने समितीत कोणी जाणार नाही. आम्हाला एकच मोह आहे. काही ही करा मराठा समाजाला आरक्षण द्या. आम्ही दोन पावलं मागे येवू. 

शासनाला वेळ हवा असेल तर तो कशाला हवा आहे आणि आम्हाला कायम टिकणारे आरक्षण मिळणार का हे त्यांनी सांगावे. त्याची उत्तरे मला मिळायला हवीत. गावकरी भावूक झाल्याने मी द्विधामनावस्थेत आहे. उद्या दुपारी सर्वांशी चर्चा करतो आणि सांगतो. समाजाचे भलं होत असेल, कायम टिकणारे आरक्षण मिळत असेल तर आपणही उपोषण लावून धरणार नाही. चर्चेनंतर निर्णय घेवू, असे जरांगे म्हणाले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणreservationआरक्षणState Governmentराज्य सरकार