शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

जगण्याच्या हुंकाराचे साहित्य चिरकाल टिकते - रावसाहेब ढवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 12:59 AM

सामान्य माणसाच्या जीवनाचे अन जगण्याचे हुंकार ज्या साहित्यातून उमटतात तेच साहित्य चिरकाल टिकते, असे प्रतिपादन समीक्षक डॉ. रावसाहेब ढवळे यांनी शनिवारी आयोजित कविसंमेलनात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सामान्य माणसाच्या जीवनाचे अन जगण्याचे हुंकार ज्या साहित्यातून उमटतात तेच साहित्य चिरकाल टिकते, असे प्रतिपादन समीक्षक डॉ. रावसाहेब ढवळे यांनी शनिवारी आयोजित कविसंमेलनात केले.अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशदिनानिमित्त जि. प. शिक्षक सहकारी पतसंस्थेत निमंत्रितांचे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवीसंमेलनाचे उद्घाटन उस्मानाबाद येथील विचारवं प्रा. राजा जगताप यांच्याहस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी समीक्षक डॉ. रावसाहेब ढवळे, ज्येष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे, रमेश देहेडकर, अशोक साबळे, डॉ. सुहास सदाव्रते, पतसंस्थेचे अध्यक्ष बबन बोरूडे, विठ्ठल वरपे, परमेश्वर बोरूडे, सचिव कैलास भाले, राम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बसवराज कोरे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रिकांचे कविसंमेलन पार पडले. कविसंमेलनात चला गावाकडं धनी या कवितेतून कवी नारायण खरात यांनी बदलत्या सामाजिक घटनांचा परामर्श मांडला. अ‍ॅड. कैलास रत्नपारखे यांनी ‘भीमा कोरेगाव’ या ऐतिहासिक गावाचा संदर्भत देत वास्तवातील घटनांवर परखड भाष्य केले. कवी जीजा जाधव यांनी सादर केलेल्या ‘सोडा रे आता वृत्ती सोडा’ या कवितेतून माणसातील विविध वृत्ती प्रवृत्तीवर विडंबनात्मक भाष्य केले. प्रा. अशोक खेडकर यांनी सादर केलेल्या या दगडाचा ठाव घेतला पाहिजे या कवितेतून ढोंगी वागण्यावर शब्दातून चांगलेच फटकारले.कवीसंमेलनात प्रा. एकनाथ शिंदे, राहुल गवई, साहिल पाटील, सुधाकर चिंधोटे, सुनील लोणकर, प्रा. माधव जाधव, प्रा. मधुकर जाधव, प्रा. बी. जी. श्रीरामे, संजयकुमार सरदार, मनीष पाटील यांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन प्रा. दिगंबर दाते तर आभार डॉ. विजयकुमार कुमठेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. डी. एम. जानराव, डॉ. के. जी. सूर्यवंशी, संजय हेरकर, इलियास मोहिओद्दीन, नवनाथ लोखंडे, वंदना भालेराव, किरण कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक