शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पानशेंद्रा शिवारातील शेकडो एकर फुलशेती दुष्काळामुळे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:41 IST

दुष्काळी स्थितीचा फटका तालुक्यातील पानशेंद्रा येथील फुलशेतीला बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळी स्थितीचा फटका तालुक्यातील पानशेंद्रा येथील फुलशेतीला बसला आहे. विहिरी, कूपनलिका कोरड्याठाक पडल्याने मुद्दलवार बंधूंंनी २० एकरावरील फुलशेती नांगरून घेतली. तर पानशेंद्रा व परिसरातील शेकडो एकरवरील फुलशेतीही पाण्याअभावी उद्ध्वस्त झाली आहे.पानशेंद्रा हे गाव फुलशेतीसाठी प्रसिध्द आहे. या लहानशा गावातील काही शेतकरी फुलांची शेती करतात. या गावच्या शिवारात कृष्णराव मुद्दलवार, चंद्रकांत मुद्दलवार व त्यांच्या भावंडांची वडिलोपार्जित जमीन आहे. मुद्दलवार कुटुंबीय २० एकरावर फुलशेती करतात. यात शेवंती, गलांडा, गुलाब, निशिगंध, झेंडू, मोगरा जरबेरा आदी विविध प्रकारच्या फुलांचा समावेश आहे. या शेतातील फुले पुणे, नागपूर, हैदराबाद, मुंबई, इंदौर आदी ठिकाणच्या बाजारात विकली जातात. जालना शहरातील बाजारपेठेतही पानशेंद्रा येथील फुलांची आवक होते.मुद्दलवार यांच्या शेतात चार विहिरी, चार कूपनलिका आहेत. मात्र, दुष्काळामुळे या शेतातील जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. पाण्याअभावी २० एकरावरील फुलशेती मोडीत निघाली आहे. गुलाबाची रोपंही जळून गेली आहेत. पाण्याअभावी फुलांची रोपं, झाडी वाळून गेली आहेत. त्यामुळे मुद्दलवार बंधूंनी शेतात नांगर फिरवून मशागतीची कामे उरकून घेतली आहेत. यंदा चांगला पाऊस झाला तर पुन्हा फुलशेती करण्याचे नियोजन मुद्दलवार बंधूंनी केले आहे.मुद्दलवार यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांची फुलशेतीही दुष्काळामुळे मोडीत निघाली असून, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. फुलांच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारपेठेतील फुलांचे दरही वाढले आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळFarmerशेतकरी