शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST

जालना : कोरोनाच्या प्रादुर्भावात दहावी- बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत; परंतु गुणदानानंतर सतत अभ्यास करणाऱ्या काही मुलांना कमी गुण पडल्याची ...

जालना : कोरोनाच्या प्रादुर्भावात दहावी- बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत; परंतु गुणदानानंतर सतत अभ्यास करणाऱ्या काही मुलांना कमी गुण पडल्याची ओरड होत आहे. तसेच अभ्यास न करणाऱ्या काहींना अधिक गुण पडल्याची खंत मुले करीत आहेत.

यापूर्वी लेखी परीक्षा झाल्यानंतर गुणदान केले जात होते. त्यात गुण कमी पडले किंवा नापास झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनाची सुविधा होती. या प्रक्रियेतून मुलांच्या शंकांचे निरसन केले जात होते.

परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही

यापूर्वी परीक्षेनंतर एखादा मुलगा नापास झाला किंवा मार्क कमी पडले असे वाटले तर पुनर्मूल्यांकनाचा पर्याय होता.

शासकीय फी भरल्यानंतर त्याला उत्तर पत्रिकेच्या झेरॉक्स व पुनर्मूल्यांकनाचे मार्क मिळत होते.

यंदा परीक्षाच न झाल्याने पुनर्मूल्यांकन होण्याची चिन्हे नाहीत. तरीही शासन याची संधी देणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे?

पहिलीपासून ते दहावी- बारावीपर्यंत अनेक मुले-मुली एकत्रित शिक्षण घेतात. अनेक मुले नेहमी अभ्यासात इतर मित्रांपेक्षा पुढे असतात.

कोरोनात परीक्षा न झाल्याचा फायदा अभ्यास न करणाऱ्या काही मुलांना झाला. मात्र, अभ्यास करूनही अपेक्षित मार्क न मिळाल्याच्याही तक्रारी आहेत.

मी इतका अभ्यास केलेला असताना आणि इतरांपेक्षा हुशार असताना कमी मार्क मिळाल्याची नाराजीही काही मुले, मुली व्यक्त करताना दिसतात.

निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले...

कोरोना महामारीमुळे नियमित वर्ग झाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिक्षण घेता आले नाही. तीन वर्षांच्या सरासरी मूल्यमापनामुळे यंदा हुशार विद्यार्थी, नियमित तासिका आणि अभ्यास करणाऱ्या मुलांचे नुकसान झाले.

- राजेंद्र मोरे, पालक

यंदा बोर्डाच्या परीक्षेत मिळालेले गुण केवळ व्हर्च्युअल समाधान आहे. ही मूल्यांकन पद्धत योग्य नाही. प्रत्यक्ष परीक्षेच्या अनुभूती परीक्षार्थींना येत नाही. पुढील काळात होणाऱ्या परीक्षा यामुळे अवघड जातील.

- के. एन. सोळुंके, पालक

विद्यार्थी म्हणतात...

ऑनलाइन शिक्षणामुळे प्रत्यक्ष शिक्षण अनुभूतीची उणीव भासत होती. आम्ही नियमित अभ्यास केला; परंतु आम्हाला चर्चात्मक अभ्यासाला वाव मिळाला नाही. कोरोनामुळे झालेल्या मूल्यमापनामुळे गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

- अदिती जाधव, विद्यार्थिनी

कोरोनामुळे परीक्षा न झाल्याने मला याचा फटका बसला. मी ९० टक्क्यांपर्यंत जाऊ शकले असते; पण मला ७६ टक्केवारीत समाधान मानावे लागत आहे. सरासरीवरून मूल्यमापन योग्य नाही. नेहमीप्रमाणे प्रत्यक्षात परीक्षा झाल्या असत्या तर चित्र वेगळे दिसले असते.

- अमृता राखुंडे, विद्यार्थिनी