शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST

जालना : कोरोनाच्या प्रादुर्भावात दहावी- बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत; परंतु गुणदानानंतर सतत अभ्यास करणाऱ्या काही मुलांना कमी गुण पडल्याची ...

जालना : कोरोनाच्या प्रादुर्भावात दहावी- बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत; परंतु गुणदानानंतर सतत अभ्यास करणाऱ्या काही मुलांना कमी गुण पडल्याची ओरड होत आहे. तसेच अभ्यास न करणाऱ्या काहींना अधिक गुण पडल्याची खंत मुले करीत आहेत.

यापूर्वी लेखी परीक्षा झाल्यानंतर गुणदान केले जात होते. त्यात गुण कमी पडले किंवा नापास झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनाची सुविधा होती. या प्रक्रियेतून मुलांच्या शंकांचे निरसन केले जात होते.

परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही

यापूर्वी परीक्षेनंतर एखादा मुलगा नापास झाला किंवा मार्क कमी पडले असे वाटले तर पुनर्मूल्यांकनाचा पर्याय होता.

शासकीय फी भरल्यानंतर त्याला उत्तर पत्रिकेच्या झेरॉक्स व पुनर्मूल्यांकनाचे मार्क मिळत होते.

यंदा परीक्षाच न झाल्याने पुनर्मूल्यांकन होण्याची चिन्हे नाहीत. तरीही शासन याची संधी देणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे?

पहिलीपासून ते दहावी- बारावीपर्यंत अनेक मुले-मुली एकत्रित शिक्षण घेतात. अनेक मुले नेहमी अभ्यासात इतर मित्रांपेक्षा पुढे असतात.

कोरोनात परीक्षा न झाल्याचा फायदा अभ्यास न करणाऱ्या काही मुलांना झाला. मात्र, अभ्यास करूनही अपेक्षित मार्क न मिळाल्याच्याही तक्रारी आहेत.

मी इतका अभ्यास केलेला असताना आणि इतरांपेक्षा हुशार असताना कमी मार्क मिळाल्याची नाराजीही काही मुले, मुली व्यक्त करताना दिसतात.

निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले...

कोरोना महामारीमुळे नियमित वर्ग झाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिक्षण घेता आले नाही. तीन वर्षांच्या सरासरी मूल्यमापनामुळे यंदा हुशार विद्यार्थी, नियमित तासिका आणि अभ्यास करणाऱ्या मुलांचे नुकसान झाले.

- राजेंद्र मोरे, पालक

यंदा बोर्डाच्या परीक्षेत मिळालेले गुण केवळ व्हर्च्युअल समाधान आहे. ही मूल्यांकन पद्धत योग्य नाही. प्रत्यक्ष परीक्षेच्या अनुभूती परीक्षार्थींना येत नाही. पुढील काळात होणाऱ्या परीक्षा यामुळे अवघड जातील.

- के. एन. सोळुंके, पालक

विद्यार्थी म्हणतात...

ऑनलाइन शिक्षणामुळे प्रत्यक्ष शिक्षण अनुभूतीची उणीव भासत होती. आम्ही नियमित अभ्यास केला; परंतु आम्हाला चर्चात्मक अभ्यासाला वाव मिळाला नाही. कोरोनामुळे झालेल्या मूल्यमापनामुळे गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

- अदिती जाधव, विद्यार्थिनी

कोरोनामुळे परीक्षा न झाल्याने मला याचा फटका बसला. मी ९० टक्क्यांपर्यंत जाऊ शकले असते; पण मला ७६ टक्केवारीत समाधान मानावे लागत आहे. सरासरीवरून मूल्यमापन योग्य नाही. नेहमीप्रमाणे प्रत्यक्षात परीक्षा झाल्या असत्या तर चित्र वेगळे दिसले असते.

- अमृता राखुंडे, विद्यार्थिनी