शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST

जालना : कोरोनाच्या प्रादुर्भावात दहावी- बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत; परंतु गुणदानानंतर सतत अभ्यास करणाऱ्या काही मुलांना कमी गुण पडल्याची ...

जालना : कोरोनाच्या प्रादुर्भावात दहावी- बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत; परंतु गुणदानानंतर सतत अभ्यास करणाऱ्या काही मुलांना कमी गुण पडल्याची ओरड होत आहे. तसेच अभ्यास न करणाऱ्या काहींना अधिक गुण पडल्याची खंत मुले करीत आहेत.

यापूर्वी लेखी परीक्षा झाल्यानंतर गुणदान केले जात होते. त्यात गुण कमी पडले किंवा नापास झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनाची सुविधा होती. या प्रक्रियेतून मुलांच्या शंकांचे निरसन केले जात होते.

परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही

यापूर्वी परीक्षेनंतर एखादा मुलगा नापास झाला किंवा मार्क कमी पडले असे वाटले तर पुनर्मूल्यांकनाचा पर्याय होता.

शासकीय फी भरल्यानंतर त्याला उत्तर पत्रिकेच्या झेरॉक्स व पुनर्मूल्यांकनाचे मार्क मिळत होते.

यंदा परीक्षाच न झाल्याने पुनर्मूल्यांकन होण्याची चिन्हे नाहीत. तरीही शासन याची संधी देणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे?

पहिलीपासून ते दहावी- बारावीपर्यंत अनेक मुले-मुली एकत्रित शिक्षण घेतात. अनेक मुले नेहमी अभ्यासात इतर मित्रांपेक्षा पुढे असतात.

कोरोनात परीक्षा न झाल्याचा फायदा अभ्यास न करणाऱ्या काही मुलांना झाला. मात्र, अभ्यास करूनही अपेक्षित मार्क न मिळाल्याच्याही तक्रारी आहेत.

मी इतका अभ्यास केलेला असताना आणि इतरांपेक्षा हुशार असताना कमी मार्क मिळाल्याची नाराजीही काही मुले, मुली व्यक्त करताना दिसतात.

निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले...

कोरोना महामारीमुळे नियमित वर्ग झाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिक्षण घेता आले नाही. तीन वर्षांच्या सरासरी मूल्यमापनामुळे यंदा हुशार विद्यार्थी, नियमित तासिका आणि अभ्यास करणाऱ्या मुलांचे नुकसान झाले.

- राजेंद्र मोरे, पालक

यंदा बोर्डाच्या परीक्षेत मिळालेले गुण केवळ व्हर्च्युअल समाधान आहे. ही मूल्यांकन पद्धत योग्य नाही. प्रत्यक्ष परीक्षेच्या अनुभूती परीक्षार्थींना येत नाही. पुढील काळात होणाऱ्या परीक्षा यामुळे अवघड जातील.

- के. एन. सोळुंके, पालक

विद्यार्थी म्हणतात...

ऑनलाइन शिक्षणामुळे प्रत्यक्ष शिक्षण अनुभूतीची उणीव भासत होती. आम्ही नियमित अभ्यास केला; परंतु आम्हाला चर्चात्मक अभ्यासाला वाव मिळाला नाही. कोरोनामुळे झालेल्या मूल्यमापनामुळे गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

- अदिती जाधव, विद्यार्थिनी

कोरोनामुळे परीक्षा न झाल्याने मला याचा फटका बसला. मी ९० टक्क्यांपर्यंत जाऊ शकले असते; पण मला ७६ टक्केवारीत समाधान मानावे लागत आहे. सरासरीवरून मूल्यमापन योग्य नाही. नेहमीप्रमाणे प्रत्यक्षात परीक्षा झाल्या असत्या तर चित्र वेगळे दिसले असते.

- अमृता राखुंडे, विद्यार्थिनी