शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पावन तपोभूमीचा आदर करा-प.पू. प्रतिभाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:36 IST

प. पू. गुरु गणेशलालजी म. सा. यांच्या पदस्पर्शाने जालना पावन भूमी झालेली असून, तिचा आदर करून गुरूगणेश महाराजांनी घालून दिलेल्या तत्त्वज्ञानाचे प्रत्यक्ष जीवनात आचरण करण्याची गरज डॉ. प. पू. श्री प्रतिभाजी म. सा. यांनी बोलून दाखविली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प. पू. गुरु गणेशलालजी म. सा. यांच्या पदस्पर्शाने जालना पावन भूमी झालेली असून, तिचा आदर करून गुरूगणेश महाराजांनी घालून दिलेल्या तत्त्वज्ञानाचे प्रत्यक्ष जीवनात आचरण करण्याची गरज डॉ. प. पू. श्री प्रतिभाजी म. सा. यांनी बोलून दाखविली.सोमवारी गुरूगणेश महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांनी त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. जालन्यासह अन्य राज्यातून भाविकांची मोठी उपस्थिती होती. सकाळी जैन गुरूंनी प्रवचन दिले. यावेळी गुरूगणेश महाराजांचे महत्व आणि त्यांनी केलेल्या तपस्येचे फळ आपण भोगत असल्याचे सांगून जालन्यात गुरूगणेश महाराजांची समाधी असल्याने जालना शहर पावन झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी सकाळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी समाधी स्थळास भेट देऊन दर्शन घेतले. मुुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून पाच कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करुन घेणार असल्याची ग्वाही खोतकर यांनी यावेळी बोलतांना दिली.यावेळी धर्मसभेत प. पू. अर्चनाश्रींजी, आचार्य प. पू. श्री शिवमुनिजी म.सा. यांचे आज्ञानुवर्ती उपप्रदवर्तक प. पू. श्री. विवेकमुनिजी, श्रमण संघीय उपप्रवतक पंडितरत्न प. प. श्री. प्रमोदमुनिजी म. सा. तसेच शासन प्रभाविका प. पू. श्री दिलीपकंवरजी, स्वाध्यायप्रेमी प. पू. उज्वलकंवरजी, आचार्य सम्राट प. पू. श्री आनंदऋषिजींच्या शिष्या प. पू. श्री अर्चनाश्रीजीं म. सा. (मिरा) प. पू. सुशिलकंवरजी, प. पू. किरणसुधाजी, प. पू. श्री गुलाबकंवरजी, प. पू. प्रशांतकंवरजी, प. पू. श्री नमीताजी, प. पू. पुण्यस्मिताजी, प. पू. अनुप्रेक्षाजी, प. पू. दर्शनप्रभाजी आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी मंगलाचरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल यांनीही विचार व्यक्त करून गुरू गणेश महाराजांच्या समाधीचा परिसर विकसित करण्यास यापूर्वीही मदत केली असून, पुढेही करणार असल्याचे ते म्हणाले. उपस्थितांचे आभार श्रावक संघाचे विश्वस्त कचरुलाल कुंकूलोळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष डॉ. गौतमचंद रुणवाल, उपाध्यक्ष नरेंद्र लुणिया, महामंत्री स्वरुपचंद ललवाणी, सहमंत्री भरतकुमार गादिया, कोषाध्यक्ष विजयराज सुराणा, विश्वस्त संजयकुमार मुथा, सुदेशकुमार सकलेचा, डॉ. धरमचंद गादिया, डॉ. कांतीलाल मांडोत, सुरजमल मुथा आदींनी परिश्रम घेतले. सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रमcommunityसमाज