शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

साठवण तलावातून जाणारा समृद्धी महामार्ग अडवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:34 IST

शेतक-यांनी गुरुवारी समृध्दी महामार्गाचे काम बंद पडले. तसेच जो पर्यत मावेजा मिळत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतक-यांनी घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राजेवाडी साठवण तलावातून समृध्दी महामार्ग जात आहे. या तलावात येथील ३० शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. परंतु, या शेतक-यांना योग्य मावेजा मिळाला नाही. त्यानंतर हे शेतकरी न्यायालयात गेले असता, न्यायालयाने गोदावरी विकास महामंडळाला वाढीव मावेजा देण्याचे आदेश दिले होते. परंतु, या शेतक-यांना अद्यापही मावेजा न मिळाल्याने शेतक-यांनी गुरुवारी समृध्दी महामार्गाचे काम बंद पडले. तसेच जो पर्यत मावेजा मिळत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतक-यांनी घेतला आहे.गोदावरी विकास महामंडळातर्फे २००६ साली केळीगव्हाण परिसरातील राजेवाडी येथे ५० एकर जागेवर तलावाची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार तलावात गेलेल्या शेतक-यांची ५३ हजार रुपये एकर नुसार जमीन खरेदी करण्यात आली. परंतु, शेतक-यांनी याला विरोध करत गोदावरी विकास महामंडळाकडे वाढीव मावेजा मागितला. परंतु, महामंडळाने हा मावेजा देण्यास नकार दिला. त्यानंतर सर्वच शेतक-यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायलयानेही गोदावरी विकास महामंडळाने शेतक-यांना योग्य मावेजा देण्याचे आदेश दिले. मात्र, अद्यापही या शेतक-यांना हा मावेजा मिळाला नाही. त्यातच सध्या याच जागेवरुन समृद्धी महामार्ग जात असून, काही दिवसांपूर्वीच शेतक-यांनी समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडले होते. व जोपर्यंत मावेजा मिळत नाही तो परंतु आम्ही महामार्गाचे काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतकºयांनी घेतला आहे. यावेळी विठ्ठल मदन, भगवान मदन, शिवाजी मदन, विष्णू मदन, बप्पासाहेब मदन, रामभाऊ मदन, देवुबा सोनवणे, गोरखनाथ मदन, शिवाजी सोनवणे, जगनाथ सोनवणे, हरिचंद्र मदन, शेषराव मदन, मीनाबाई मदन, राम मदन, सुभाष मदन, ज्ञानदेव मदन यांची उपस्थिती होती. जो पर्यंत १८/२८ प्रमाणे निकाली दाव्याचा मावेजा मिळत नाही तोपर्यंत आम्ही समृद्धी महामार्गाचे काम होऊ देणार नसल्याचे शेतकरी विठ्ठल मदन यांनी सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरीagitationआंदोलन