शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

साठवण तलावातून जाणारा समृद्धी महामार्ग अडवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:34 IST

शेतक-यांनी गुरुवारी समृध्दी महामार्गाचे काम बंद पडले. तसेच जो पर्यत मावेजा मिळत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतक-यांनी घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राजेवाडी साठवण तलावातून समृध्दी महामार्ग जात आहे. या तलावात येथील ३० शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. परंतु, या शेतक-यांना योग्य मावेजा मिळाला नाही. त्यानंतर हे शेतकरी न्यायालयात गेले असता, न्यायालयाने गोदावरी विकास महामंडळाला वाढीव मावेजा देण्याचे आदेश दिले होते. परंतु, या शेतक-यांना अद्यापही मावेजा न मिळाल्याने शेतक-यांनी गुरुवारी समृध्दी महामार्गाचे काम बंद पडले. तसेच जो पर्यत मावेजा मिळत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतक-यांनी घेतला आहे.गोदावरी विकास महामंडळातर्फे २००६ साली केळीगव्हाण परिसरातील राजेवाडी येथे ५० एकर जागेवर तलावाची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार तलावात गेलेल्या शेतक-यांची ५३ हजार रुपये एकर नुसार जमीन खरेदी करण्यात आली. परंतु, शेतक-यांनी याला विरोध करत गोदावरी विकास महामंडळाकडे वाढीव मावेजा मागितला. परंतु, महामंडळाने हा मावेजा देण्यास नकार दिला. त्यानंतर सर्वच शेतक-यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायलयानेही गोदावरी विकास महामंडळाने शेतक-यांना योग्य मावेजा देण्याचे आदेश दिले. मात्र, अद्यापही या शेतक-यांना हा मावेजा मिळाला नाही. त्यातच सध्या याच जागेवरुन समृद्धी महामार्ग जात असून, काही दिवसांपूर्वीच शेतक-यांनी समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडले होते. व जोपर्यंत मावेजा मिळत नाही तो परंतु आम्ही महामार्गाचे काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतकºयांनी घेतला आहे. यावेळी विठ्ठल मदन, भगवान मदन, शिवाजी मदन, विष्णू मदन, बप्पासाहेब मदन, रामभाऊ मदन, देवुबा सोनवणे, गोरखनाथ मदन, शिवाजी सोनवणे, जगनाथ सोनवणे, हरिचंद्र मदन, शेषराव मदन, मीनाबाई मदन, राम मदन, सुभाष मदन, ज्ञानदेव मदन यांची उपस्थिती होती. जो पर्यंत १८/२८ प्रमाणे निकाली दाव्याचा मावेजा मिळत नाही तोपर्यंत आम्ही समृद्धी महामार्गाचे काम होऊ देणार नसल्याचे शेतकरी विठ्ठल मदन यांनी सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरीagitationआंदोलन