शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

साठवण तलावातून जाणारा समृद्धी महामार्ग अडवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:34 IST

शेतक-यांनी गुरुवारी समृध्दी महामार्गाचे काम बंद पडले. तसेच जो पर्यत मावेजा मिळत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतक-यांनी घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राजेवाडी साठवण तलावातून समृध्दी महामार्ग जात आहे. या तलावात येथील ३० शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. परंतु, या शेतक-यांना योग्य मावेजा मिळाला नाही. त्यानंतर हे शेतकरी न्यायालयात गेले असता, न्यायालयाने गोदावरी विकास महामंडळाला वाढीव मावेजा देण्याचे आदेश दिले होते. परंतु, या शेतक-यांना अद्यापही मावेजा न मिळाल्याने शेतक-यांनी गुरुवारी समृध्दी महामार्गाचे काम बंद पडले. तसेच जो पर्यत मावेजा मिळत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतक-यांनी घेतला आहे.गोदावरी विकास महामंडळातर्फे २००६ साली केळीगव्हाण परिसरातील राजेवाडी येथे ५० एकर जागेवर तलावाची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार तलावात गेलेल्या शेतक-यांची ५३ हजार रुपये एकर नुसार जमीन खरेदी करण्यात आली. परंतु, शेतक-यांनी याला विरोध करत गोदावरी विकास महामंडळाकडे वाढीव मावेजा मागितला. परंतु, महामंडळाने हा मावेजा देण्यास नकार दिला. त्यानंतर सर्वच शेतक-यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायलयानेही गोदावरी विकास महामंडळाने शेतक-यांना योग्य मावेजा देण्याचे आदेश दिले. मात्र, अद्यापही या शेतक-यांना हा मावेजा मिळाला नाही. त्यातच सध्या याच जागेवरुन समृद्धी महामार्ग जात असून, काही दिवसांपूर्वीच शेतक-यांनी समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडले होते. व जोपर्यंत मावेजा मिळत नाही तो परंतु आम्ही महामार्गाचे काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतकºयांनी घेतला आहे. यावेळी विठ्ठल मदन, भगवान मदन, शिवाजी मदन, विष्णू मदन, बप्पासाहेब मदन, रामभाऊ मदन, देवुबा सोनवणे, गोरखनाथ मदन, शिवाजी सोनवणे, जगनाथ सोनवणे, हरिचंद्र मदन, शेषराव मदन, मीनाबाई मदन, राम मदन, सुभाष मदन, ज्ञानदेव मदन यांची उपस्थिती होती. जो पर्यंत १८/२८ प्रमाणे निकाली दाव्याचा मावेजा मिळत नाही तोपर्यंत आम्ही समृद्धी महामार्गाचे काम होऊ देणार नसल्याचे शेतकरी विठ्ठल मदन यांनी सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरीagitationआंदोलन