शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्याविरोधात आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:26 IST

नाशिक येथील कडा विभागाचे अधिक्षक अभियंता तथा प्रशासक यांनी गंगापूर व पालखेड धरणातून जायकवाडी धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग थांबविण्याचा आदेश १ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलेला होता. सदरील आदेशाच्या संदर्भात सोमवारी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणमध्ये सुनावणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नाशिक येथील कडा विभागाचे अधिक्षक अभियंता तथा प्रशासक यांनी गंगापूर व पालखेड धरणातून जायकवाडी धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग थांबविण्याचा आदेश १ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलेला होता. सदरील आदेशाच्या संदर्भात सोमवारी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणमध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती या प्राधिकरणाचे सचिव डॉ. सुरेश कुलकर्णी यांनी तसेच मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी प्रसिध्दी पत्राव्दारे दिली.दरम्यान, या सुनावणीसाठी आता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही उपस्थित राहून बाजू मांडावी लागणार आहे.सदरील प्रकरणी होणारी सुनावणी सोमवारी दुपारी २ वाजता मुंबई येथील जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कार्यालयात घेतली जाणार असल्याचे लाखे पाटील म्हणाले.एकूणच मराठवाड्यातील तीव्र दुष्काळ लक्षात घेता न्यायालयाकडूनही याबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे लाखे पाटील यांनी सांगितले. पाण्याच्या मुद्दयावर राजकारण बाजूला ठेवून आपण पुढाकार घेत असल्याचे ते म्हणाले.धरण समूहातून एकूण २५४.५० द.ल.घ.मी म्हणचेच ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचे स्पष्ट देण्यात आले होते. याशिवाय वरील सर्व धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करणे, तसेच पाणी वहनावर नियंत्रण ठेवणे, पाण्याची नोंद ठेवणे, अहवाल शासनास सादर करणे ही संपूर्ण जबाबदारी मुख्य अभियंता (जलसंपदा) जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक यांची असेल आणि सदर आदेश हे तात्काळ अंमलात आणावेत, असेही २३ आॅक्टोबरच्या आदेशात नमूद केलेले होते, असेही डॉ. संजय लाखे पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी