शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्याविरोधात आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:26 IST

नाशिक येथील कडा विभागाचे अधिक्षक अभियंता तथा प्रशासक यांनी गंगापूर व पालखेड धरणातून जायकवाडी धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग थांबविण्याचा आदेश १ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलेला होता. सदरील आदेशाच्या संदर्भात सोमवारी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणमध्ये सुनावणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नाशिक येथील कडा विभागाचे अधिक्षक अभियंता तथा प्रशासक यांनी गंगापूर व पालखेड धरणातून जायकवाडी धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग थांबविण्याचा आदेश १ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलेला होता. सदरील आदेशाच्या संदर्भात सोमवारी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणमध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती या प्राधिकरणाचे सचिव डॉ. सुरेश कुलकर्णी यांनी तसेच मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी प्रसिध्दी पत्राव्दारे दिली.दरम्यान, या सुनावणीसाठी आता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही उपस्थित राहून बाजू मांडावी लागणार आहे.सदरील प्रकरणी होणारी सुनावणी सोमवारी दुपारी २ वाजता मुंबई येथील जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कार्यालयात घेतली जाणार असल्याचे लाखे पाटील म्हणाले.एकूणच मराठवाड्यातील तीव्र दुष्काळ लक्षात घेता न्यायालयाकडूनही याबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे लाखे पाटील यांनी सांगितले. पाण्याच्या मुद्दयावर राजकारण बाजूला ठेवून आपण पुढाकार घेत असल्याचे ते म्हणाले.धरण समूहातून एकूण २५४.५० द.ल.घ.मी म्हणचेच ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचे स्पष्ट देण्यात आले होते. याशिवाय वरील सर्व धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करणे, तसेच पाणी वहनावर नियंत्रण ठेवणे, पाण्याची नोंद ठेवणे, अहवाल शासनास सादर करणे ही संपूर्ण जबाबदारी मुख्य अभियंता (जलसंपदा) जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक यांची असेल आणि सदर आदेश हे तात्काळ अंमलात आणावेत, असेही २३ आॅक्टोबरच्या आदेशात नमूद केलेले होते, असेही डॉ. संजय लाखे पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी