शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हॉटेलनंतर सिगारेट पिताना पुन्हा वाद उद्भवला अन् त्याने तरूणाच्या छातीत चाकू खुपसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 19:17 IST

अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी फरार आहे

जालना : भांडणाचा राग मनात धरून एका २५ वर्षीय तरूणाच्या छतीत चाकून वार करून खून केल्याची घटना अंबड तालुक्यातील शिरनेर येथे बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. सदानंद आबाजी वैद्य (२५ रा. शिरनेर ता, अंबड) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी गणेश बाबुराव खरात (म्हाडा कॉलनी, अंबड) याच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदानंद वैद्य व  संशयित गणेश खरात यांच्यात हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून बुधवारी सायंकाळी भांडण झाले होते. नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण मिटविले होते. त्यानंतर दोघेही एकमेकांना बोलत होते. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गणेश खरात व सदानंद वैद्य हे सिगारेट आणण्यासाठी गेले. येथे त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. त्यातूनच गणेश खरात याने सदानंद वैद्य याच्या छतीत चाकूने वार करून ठार केले. व घटनास्थळावरून फरार झाला. 

याची माहिती अंबड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन  पंचनामा केला. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पाटील,  सपोनि. पंतगे, पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण आदींनी भेटी दिल्या. या प्रकरणी मयताचे वडील आबाजी भानुदास वैद्य यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाDeathमृत्यू