शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

गाव कारभाऱ्यांचेच हात गैरव्यवहाराने बरबटलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 12:42 AM

चालू वर्षात एक-दोन नव्हे ३० सरपंचांना जिल्हा दंडाधिका-यांनी अपात्र ठरविले आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गावाचा विकास करण्यासाठी ज्यांना सरपंच बनविले त्यांचेच हात भ्रष्टाचाराने बरबटत असल्याचे चित्र जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे दाखल होणा-या तक्रारींवरून दिसून येते. चालू वर्षात एक-दोन नव्हे ३० सरपंचांना जिल्हा दंडाधिका-यांनी अपात्र ठरविले आहे. यात शासकीय निधीतील अपहाराच्या तक्रारींचा भरणा असल्याचे दिसून येते.ग्रामीण भागाचा विकास झाला तर देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. गावाचा कारभार हाकण्यासाठी सरपंचांची निवड केली जाते. शासन निर्णयानुसार आता जनतेतून सरपंच निवडले जात आहेत. सरपंच पदावर बसलेल्या व्यक्तीने विकास कामे करून ग्रामस्थांना मुलभूत सोयी-सुविधा देणे आवश्यक आहे. यात राज्य सरकारने १४ व्या वित्त आयोगांतर्गत सर्व निधी हा थेट ग्रामपंचायतीला वितरित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १४ वित्त आयोगाचा सर्वच निधी हा थेट ग्रामपंचायत कार्यालयाला जमा होतो. या निधीतून गावात विविध विकास करणे गरजे असते. मात्र, ‘खुर्ची’त बसलेल्या काही सरपंचांनी शासकीय नियमांनाच धाब्यावर बसवून कामकाज केल्याचे चित्र आहे. अशा सरपंचांचे पितळ उघडे पाडण्याचे काम विरोधी सदस्य करीत आहेत.मागील वर्षभरात १४ व्या वित्त आयोगाच्या कामात मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिका-यांकडे आल्या आहे. भ्रष्टाचारासह तिसरे अपात्य न दाखवणे, अवैध वाळू उपसा, अतिक्रमण, राजीनामा विहित मुदतीत न देणे यासह इतर तक्रारी जिल्हाधिका-यांकडे दाखल झाल्या होत्या. दाखल तक्रारीच्या सुनावणीनंतर समोर आलेले पुरावे ग्राह्य धरून जिल्हाधिका-यांनी आजवर ३० सरपंचांना अपात्र ठरवले आहे. दरम्यान, इतर काही ग्रामपंचायतीच्या तक्रारी प्रशासनाकडे दाखल झालेल्या आहेत.जिल्हाधिका-यांकडे धडकल्या ४० तक्रारीतिसरे आपत्य न दाखवणे, आर्थिक लाभ, अवैध वाळू उपसा, अतिक्रमण, राजीनामा विहित मुदतीत न देणे यासह इतर कारणावरुन जिल्हाधिका-यांकडे ४० तक्रारी आल्या होत्या. चौकशीनंतर ३० सरपंचांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.या गावच्या सरपंचांवर झाली कारवाईजानफेळ, आनंदवाडी, मांडवा, आंबा, भारज खुर्द, लतीफपूर, कंडारी खु. रोषनगाव, श्रीकृष्णनगर यासह इतर गावातील सरपंच व डोल्हारा या गावातील उपसरपंचावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर वरुड बु. सुखापुरी, भाटेपुरी, मोहपुरी येथील सदस्यांवर विविध कारणांसाठी कारवाई करण्यात आली आहे. कारवाईनंतर अनेकांनी पुढील न्यायालयीन लढाईही सुरू ठेवली असून, तेथील निकाल कोणाच्या बाजुने लागणार याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चाही सुरू असतात.

टॅग्स :sarpanchसरपंचcollectorजिल्हाधिकारीCorruptionभ्रष्टाचार