शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

भूजल पातळीत ३ मीटरने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:04 IST

मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळी ३ मीटरपर्यंत घटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरसरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणीपातळी कमालीची खालावत असून, मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळी ३ मीटरपर्यंत घटली आहे. पुढील दोन महिने तीव्र उन्हाचे जाणार असल्याने पाणीपातळी आणखी घटणार असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडलेले आहेत. परिणामी, सध्या टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत. जिल्ह्यात सध्या साडेतीनशे टँकरने पाणीपुरवठा होत असून ही संख्या येत्या काही दिवसांत वाढणार आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने जलस्त्रोत असलेल्या ११० विहिरींची पाणीपातळी मोजण्यात आली. मागील पाच वर्षांतील मार्चमधील सरासरी पाणी पातळीच्या तुलनेत ३ टक्क्यींनी घट झाली आहे.मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढते तापमान पाहता उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.एप्रिल मे आणि जूनमध्ये पावसाचे आगमन होईपर्यंत मोठ्या प्रमाणात टंचाई भेडसावणार आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचा पूर्ण उपयोग करणे महत्त्वाचे आहे.दरम्यान, जिल्हाभरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.जलबचतीसाठी सोशल मीडियाचा वापरमार्चमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी ३ मीटरने खालावली आहे. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य लक्षात घेता सामाजिक संघटना विविध उपक्रम राबवत आहेत. तर सोशल मीडियावरही थेंबथेंब वाचविण्यासाठी जलबचतीचा संदेश दिला जात आहे. पाण्याचे जतन करणे, योग्य वापर करणे, अनमोल ठेवा म्हणून पाणी हाताळणे यासाठी इतरांना प्रेरित करण्यासाठी जल अभियान देखील राबविण्यात येत आहे.जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक ४ मीटरने पाणी पातळी खालावली आहे. जाफराबाद, भोकरदन तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे येथील जवळपास सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे भोकरदन व जाफराबाद तालुक्यांत सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाई येथे भासणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ