शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भूजल पातळीत ३ मीटरने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:04 IST

मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळी ३ मीटरपर्यंत घटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरसरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणीपातळी कमालीची खालावत असून, मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळी ३ मीटरपर्यंत घटली आहे. पुढील दोन महिने तीव्र उन्हाचे जाणार असल्याने पाणीपातळी आणखी घटणार असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडलेले आहेत. परिणामी, सध्या टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत. जिल्ह्यात सध्या साडेतीनशे टँकरने पाणीपुरवठा होत असून ही संख्या येत्या काही दिवसांत वाढणार आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने जलस्त्रोत असलेल्या ११० विहिरींची पाणीपातळी मोजण्यात आली. मागील पाच वर्षांतील मार्चमधील सरासरी पाणी पातळीच्या तुलनेत ३ टक्क्यींनी घट झाली आहे.मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढते तापमान पाहता उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.एप्रिल मे आणि जूनमध्ये पावसाचे आगमन होईपर्यंत मोठ्या प्रमाणात टंचाई भेडसावणार आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचा पूर्ण उपयोग करणे महत्त्वाचे आहे.दरम्यान, जिल्हाभरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.जलबचतीसाठी सोशल मीडियाचा वापरमार्चमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी ३ मीटरने खालावली आहे. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य लक्षात घेता सामाजिक संघटना विविध उपक्रम राबवत आहेत. तर सोशल मीडियावरही थेंबथेंब वाचविण्यासाठी जलबचतीचा संदेश दिला जात आहे. पाण्याचे जतन करणे, योग्य वापर करणे, अनमोल ठेवा म्हणून पाणी हाताळणे यासाठी इतरांना प्रेरित करण्यासाठी जल अभियान देखील राबविण्यात येत आहे.जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक ४ मीटरने पाणी पातळी खालावली आहे. जाफराबाद, भोकरदन तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे येथील जवळपास सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे भोकरदन व जाफराबाद तालुक्यांत सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाई येथे भासणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ