शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

भूजल पातळीत ३ मीटरने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:04 IST

मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळी ३ मीटरपर्यंत घटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरसरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणीपातळी कमालीची खालावत असून, मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळी ३ मीटरपर्यंत घटली आहे. पुढील दोन महिने तीव्र उन्हाचे जाणार असल्याने पाणीपातळी आणखी घटणार असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडलेले आहेत. परिणामी, सध्या टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत. जिल्ह्यात सध्या साडेतीनशे टँकरने पाणीपुरवठा होत असून ही संख्या येत्या काही दिवसांत वाढणार आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने जलस्त्रोत असलेल्या ११० विहिरींची पाणीपातळी मोजण्यात आली. मागील पाच वर्षांतील मार्चमधील सरासरी पाणी पातळीच्या तुलनेत ३ टक्क्यींनी घट झाली आहे.मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढते तापमान पाहता उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.एप्रिल मे आणि जूनमध्ये पावसाचे आगमन होईपर्यंत मोठ्या प्रमाणात टंचाई भेडसावणार आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचा पूर्ण उपयोग करणे महत्त्वाचे आहे.दरम्यान, जिल्हाभरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.जलबचतीसाठी सोशल मीडियाचा वापरमार्चमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी ३ मीटरने खालावली आहे. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य लक्षात घेता सामाजिक संघटना विविध उपक्रम राबवत आहेत. तर सोशल मीडियावरही थेंबथेंब वाचविण्यासाठी जलबचतीचा संदेश दिला जात आहे. पाण्याचे जतन करणे, योग्य वापर करणे, अनमोल ठेवा म्हणून पाणी हाताळणे यासाठी इतरांना प्रेरित करण्यासाठी जल अभियान देखील राबविण्यात येत आहे.जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक ४ मीटरने पाणी पातळी खालावली आहे. जाफराबाद, भोकरदन तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे येथील जवळपास सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे भोकरदन व जाफराबाद तालुक्यांत सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाई येथे भासणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ