शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

कुशल मनुष्यबळास आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

डॉ अर्चना भोसले : जालना : सध्याच्या परिस्थितीत आरोग्य क्षेत्र हे सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून सिद्ध झाले ...

डॉ अर्चना भोसले :

जालना : सध्याच्या परिस्थितीत आरोग्य क्षेत्र हे सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून सिद्ध झाले असून, कोरोना साथरोगाच्या जास्त प्रादुर्भावादरम्यान प्रशिक्षित व कौशल्यधारक मनुष्यबळाचा राज्य व देशात मोठा तुटवडा जाणवला. यापुढे कौशल्यधारक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम योजना नुकतीच सुरू केली आहे. आरोग्य क्षेत्रात सेवा करण्याची मोठी संधी असून, कौशल्यधारक मनुष्यबळास आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. यामुळे आरोग्य क्षेत्रामधील विविध कौशल्याचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमात केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना व जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी डॉ. अर्चना भोसले, डॉ. आणेराव, डॉ. आशिष राठोड, डॉ. नितीन पवार, डॉ. संतोष जायभाये, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहायक जिल्हा समन्वयक जया नेमाणे आदींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रमुख अतिथींच्या हस्ते अप्रॉन, एन-९५ मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. त्यानंतर डॉ. अर्चना भोसले मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाने जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे युवक-युवतींना मोफत अल्पकालावधीचे १० विविध अभ्यासक्रमांचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध केले आहे. हे प्रशिक्षण घेऊन रोजगारक्षम होण्यासाठी गरजूंनी पुढे येण्याची गरज आहे. तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने १५ ते ३० जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या ऑनलाइन रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात डॉ. आशिष राठोड यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना कौशल्य आत्मसात करण्याचा सल्ला दिला. पुढे बोलताना ते म्हणाले, फ्लेबॉटोमिस्ट या अभ्यासक्रमाचे फक्त ज्ञान असून चालणार नाही, तर रक्त नमुना घेण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे. होम हेल्थ एड, जेरियाट्रिक केअर एड या दोन कोर्सेसची भविष्यात गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले. आभार मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नितीन पवार यांनी मानले. सूत्रसंचालन सुशील उचले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे चंद्रकांत मुंढे, मंगेश देशमुख, महेश उढाण आणि कौशल्य विकास कार्यालयाचे सुशील उचले, सुरेश बहुरे, अमोल बोरकर, रामदास फुले, सुभाष कदम, कैलास काळे, प्रदीप डोळे, उमेश कोल्हे आदींनी परिश्रम घेतले.