शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

५० वर्ष जुन्या मातीच्या घराची भेंड्याची भिंत कोसळून आजी-नातीचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 18:11 IST

परतूर तालुक्यातील धामणगाव येथे एका ५० वर्ष जुन्या घराची मातीची भेंड्याची भिंत कोसळली

आष्टी (जालना ) : परतूर तालुक्यातील धामणगाव येथे एका ५० वर्ष जुन्या घराची मातीची भेंड्याची भिंत कोसळून त्याखाली दबलेल्या आजी आणि नातीचा करुण अंत झाला. प्रभावती अण्णा मठपती (५५), आदिती स्वामी (२) असे  मयतांची नावे आहेत. सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत अन्य सहाजण जखमी झाले आहेत. 

गावकऱ्यांनी शथीर्चे प्रयत्न करत मातीच्या ढिगाऱ्याखालून इतर सहा जणांना बाहेर काढले. अण्णा मठपती यांचे कुटुंब सोमवारी रात्री घरात झोपले असताना पाठीमागील मातीची भेंड्याची भिंत कोसळल्याने यात प्रभावती अण्णा मठपती व त्यांची नात आदिती नागेश स्वामी या दोघी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अण्णा मठपती त्यांच्या मुली रेखा नागेश कामठे, पुजा नागेश स्वामी, नातू शिवप्रसाद कामठे, पुजा हिचे छोटे बाळ व मठपती यांच्या सासू सुमनबाई पाडगावकर हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. घटनास्थळी मंडळ अधिकारी चाऊस व तलाठी इंगोले यांनी भेट देऊन पंचनामा केला.  या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूHomeघर